शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
3
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
4
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
5
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
6
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
7
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
8
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
9
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
10
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
11
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
12
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
13
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
14
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
15
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
18
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
19
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
20
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...

जिवाभावाचा भाऊ व्हिलन कसा असेल?

By admin | Updated: August 27, 2015 18:34 IST

निमित्त होतं एका बातमीचं, भावानं बहिणीचा खून केल्याचं, ती आपलं ऐकत नाही अशा क्षुल्लक कारणातून हा खून झाला.त्यातून काही प्रश्न समोर आले की...

 निमित्त होतं एका बातमीचं, भावानं बहिणीचा खून केल्याचं, ती आपलं ऐकत नाही अशा क्षुल्लक कारणातून हा खून झाला.

त्यातून काही प्रश्न समोर आले की, खरंच मुलं घरात बहिणींवर दादागिरी करतात का? की हे चित्र बदललंय? दादाताईची मैत्रीच झाली आहे?
‘घरोघरची दादागिरी’ या त्या वाचकचर्चेला मुलींपेक्षा मुलांचाच प्रतिसाद अधिक आला हे विशेष!
एरवी मुली इमोशनल कहाण्या भरभरून लिहितात. पण यावेळेस तरुण मुलांची पत्रं जास्त होती. कदाचित मुलांना या विषयावर बोलायचंच होतं. त्यातून त्यांना कधी नव्हे ती ही संधी मिळाली!
ही सारी पत्रं वाचताना लक्षात येतं की, आजही मुलांचं आपल्या बहिणींवर जिवापाड प्रेम आहे. आपल्या बहिणीसाठी आपण काय वाट्टेल ते करू शकतो, करायलाच हवं ही भावना आहे!
पण त्या भावनेला जबाबदारीचं ओझं चिकटलेलं आहे. बहिणीचं लगA होत नाही तोर्पयत ती आपली म्हणजे वडिलांची आणि आपली जबाबदारी आहे असाच एकूण मुलांचा सूर!
ती जबाबदारी त्यांच्या डोक्यावर समाज देतो, नातेवाईक देतात, घरातली आर्थिक परिस्थिती देते आणि पूर्वापार भावानं अमुक पद्धतीनंच वागायचं असतं हा समजही देतो.
त्या ओङयाखाली म्हणा किंवा त्या भावनेतून मिळणा:या आपण सुपीरिअर आहोत या भावनेपोटी म्हणा, तरुण मुलं स्वत:ला एकदम बहिणीचा पाठीराखा याच भूमिकेतून पाहतात. आपण बहिणीचे रक्षक आहोत, तिची जबाबदारी, बरंवाईट, घराण्याची इज्जत हे सारं आपल्यावरच आहे, असा भावनिक भार स्वत:हून उचलतात.
त्यात त्यांच्या डोक्यावर असतं समवयीन मित्रंचं ओझं.
मित्र म्हणतात, तुझी बहीण बघ, तिच्याकडे लक्ष ठेव. ती अमक्याशी बोलते. तिला तुझा धाक नाही, तुझं घरात काही चालत नाही, अशानं तुमचं नाक कापलं जाईल. किंवा, तुझी बहीण जास्त अॅडव्हान्स आहे.
हे सारं ऐकणं मुलांना आजही  फार अपमानास्पद वाटतं असं ही पत्रं सांगतात.
त्यामुळे घरात तरुण जबाबदार मुलासारखं वागत ते बहिणींच्या रक्षणासाठी पहारे लावतात.
अनेक भाऊ पत्रत लिहितात, जातं काय समानतेच्या बाता मारायला, पण जग कसंय? बहिणीला काही झालं किंवा तिचं काही बरंवाईट झालं तर कोण जबाबदार? घरचे मला विचारतील की, तू काय करत होतास? त्यावेळी काय उत्तर द्यायचं?
ैआणि त्यातून आपण बहिणीपेक्षा ‘सरस’ असल्याच्या भूमिकेतून सारे भाऊ तिला मदत तरी करतात, सल्ले तरी देतात, ओरडतात, लक्ष ठेवतात, मागेमागे असतात, मित्रंना लक्ष ठेवायला सांगतात.
हेतू चांगला असतो. पण परिणाम?
बहिणी वैतागतात. अबोले धरतात.
त्यांना नको होते ही दादागिरी!
स्वतंत्र आणि शिक्षित होत चाललेल्या बहिणींना वाटतं की, आपण समर्थ आहोत. आपण आपली काळजी घेऊ शकतो. पण हेच भावांना पटत नाही.
भांडण होतंय ते या वळणावर!
काळाच्या एका विचित्र टप्प्यावर हे नातं येऊन ठेपलंय हे नक्की!
 
आईबाबा चुकवतात सगळं?
मुलामुलींमधे भांडणं आईबाबाच लावतात, असाही एक दावा..
अनेक पत्रंतून हा एक नवीनच मुद्दा समोर आला. आईबाबा भावा-बहिणीत भांडणं लावतात. काही घरात एक तर मुलीचे जास्त लाड होतात. मुलांना धारेवर धरलं जातं.
काही घरात उलटंच.
आईबाबाच भावांना विशेष हक्क देतात. मुलगी कॉलेजात गेली की मुलाला सांगतात, हिच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी तुझी!
मुलीला सतत सांगतात, तो भाऊ आहे. त्याची काळजी घे. तोच तुझं पुढे माहेर. त्यातून मग एकमेकांविषयी आकस तयार होतो. त्यात मार्काची स्पर्धा, दिसण्याची स्पर्धा, कौतुक हे सारं तेल ओतत राहतं.
काही घरात तर काका-मामा हे मुलींना एकदम कमीच लेखतात. मुलांना बरोबरीनं वागवतात.
मग तरुण मुलांनाही वाटतं की, आपल्या बहिणीची अक्कल चुलीपाशीच. तिनं जास्त बोलू नये.
मग भांडण अटळ!
अनेक मुलींनी लिहिलं आहे की, केवळ आपल्याला पसंत नाही म्हणून आमच्या भावांनी आमच्या प्रेमात बिब्बा घातला. आणि स्वत: मात्र मुली फिरवतो.
पण आईबाबा त्यालाच सपोर्ट करतात.
आईवडिलांच्या दुटप्पी भूमिकेचे अनेक किस्से या पत्रत वाचायला मिळतात. त्यातून एका घरात राहून महिनोन्महिने अबोले अनेक भाऊबहीण धरतात.
पण या प्रश्नावर इलाज काही त्यांना सापडत नाही.
 
पङोसिव्ह भाऊ आणि जातपात
प्रेमात पडताना मुलींना सगळ्यात जास्त भीती वाटते ती भावाच्या संतापाची!
 
अनेक मुलींनी लिहिलं आहे की, आम्हाला कुणी आवडलं तरी प्रेमाबिमात आम्ही पडत नाही. कारण आम्हाला माहितीच आहे की, आमचा भाऊ आमचा तरी खून करील नाही तर त्याचा तरी!
प्रत्यक्षात तसं होत नसलं तरी या मुलींना भावाचा धाक आहे. खेडय़ापाडय़ात जातीपातीचं वास्तवच ही पत्रं सांगतात. आणि मुलंही लिहितात की, जातीच्या बाहेर बहिणीनं पळून जाऊन लगA केलं तर गावात तोंड दाखवता येत नाही. त्यामुळे तिनं असं काही करूच नये म्हणून धाकात ठेवावं लागतं. लक्षही ठेवावं लागतं. ती कुणाशी बोलते, काय बोलते, कुणाला फोन करते, मैत्रिणी कशा आहेत हे सारं आम्ही पाहतो. असं करू नये हे कळतं पण इलाज नाही. समाजवास्तव असं आहे की, भाऊ म्हणून आपल्या घरात असं काही होणं हेच आम्हाला फार अपमानास्पद वाटतं.
एका मुलानं तर पत्र लिहिलंय की, माझी बहीण पळून गेली. त्या मुलाला माझा विरोध नव्हता. पण आम्हाला गावात राहणं अवघड झालं इतके लोक बोलायचे. म्हणून मी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्त्येचा प्रयत्न केला होता. मलाच सगळे म्हणायचे की, तू बहिणीकडे लक्ष दिलं नाहीस!
अशा विचित्र ख:याखोटय़ा परिस्थितीत अडकलेले भाऊ मग प्रवाहपतीत होत बहिणींवर पहारे लावतात, असं ही पत्रं सांगतात.