शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
6
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
7
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
8
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
9
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
10
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
11
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
12
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
13
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
14
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
15
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
16
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
18
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
19
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
20
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
Daily Top 2Weekly Top 5

वास

By admin | Updated: April 22, 2016 09:15 IST

मी ‘मी’ आहे असं वाटतं ते स्वत:कडे आरशात पाहून. पण ती छबी उद्या दुस:याच कोणासारखी दिसली तर कसं वाटेल तसं वाटायचं. कारण स्वत:च्या शरीराचा गंध बदलला. त्या बदललेल्या गंधामुळे घाण वाटायची, आत्मविश्वास कमी व्हायचा, स्वत:विषयी एक तिरस्काराची भावना निर्माण व्हायची, आणि कसकसले वास सतत येत राहायचे.

वेदनांच्या आठवणींचे, त्या दिवसांच्या अस्तित्वाचे, जखमांचे, सारे अशक्त मनाचे खेळ; पण ते खेळ पाठ सोडत नाहीत.
 
 
खडूपेटीचा वास, मग ती नवी असो की जुनी, ती उघडून वास घेण्याची माझी सवय आजही कायम आहे. नव्या पुस्तकांपेक्षा जुन्या पुस्तकांचा वास मला अधिक आवडतो. जुनी पुस्तकं अनुभवी वाटतात. वाचण्याच्या निमित्तानं अनेक हात त्यांना लागले असतात. त्यामुळे कदाचित जुनी पुस्तकं शहाणी, शांत वाटतात. गरम कॉफीचा वास, भाजून तयार होत असलेल्या पोळीचा वास, लाकूड तासताना त्यातून निघणा:या सूरनळी आणि भुशाचा वास..
अशा अनेक वासांच्या अनुभवांनी आपलं आयुष्य पुढे सरकत असतं. हे झाले भौतिक आयुष्यातील वास. पण प्रत्येक घराचाही एक वास असतो, त्याचा स्वत:चा असा. तो वास तिथल्या माणसांचा, घरातल्या वस्तूंचा, तिथे शिजणा:या अन्नाचा आणि विचारांचा असू शकतो. प्रत्येक घरात गेल्यावर तो जाणवतो.
 हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे कॅन्सरवरच्या उपचारांमध्ये वासाबाबतची संवेदना इतकी सेन्सेटिव्ह झाली होती की या आधी न दिसलेल्या आणि जाणवलेल्या अनेक गोष्टींचे गंध मला नव्यानं जाणवायला लागले. आणि हेही जाणवलं की माझ्या  शरीरालाही एक गंध आहे. इतकंच नव्हे तर माझ्या शी आणि शूलाही एक गंध आहे..
किमोथेरपीच्या दरम्यान सततच्या अॅण्टीबायोटिक्स किमोथेरपीच्या औषधांमुळे शूचा रंग-गंध वेगळा असायचा. 
मी ‘मी’ आहे कारण माझा स्वत:चा एक गंध आहे, जो इतरांपेक्षा वेगळा आहे. माझी आरशात दिसणारी छबी उद्या दुस:याच कोणासारखी दिसली तर कसं वाटेल.. 
सेम तसचं वाटायचं या बदललेल्या गंधामुळे. घाण वाटायची. आत्मविश्वास कमी व्हायचा. स्वत:विषयी एक तिरस्काराची भावना निर्माण व्हायची. टॉयलेटमधून बाहेर आल्यावर शांत, समाधानी वाटायचं नाही. 
प्रत्येक वासाबरोबर आपल्या काही आठवणी जोडलेल्या असतात. माझी सर्जरी झाली तेव्हा ती नळी आणि टाके निघेर्पयत रोजच्या अंघोळीसाठी बहीण मदत करायची. तेव्हा मी पिअर्स साबण वापरायचे. आजही त्या साबणाचा वास आला की मला ते बाथरूम, बहिणीचा भीतीनं थरथरणारा हात, मला हात वर करताना होणारी वेदना आणि रडणं हे सगळं आठवतं. तसाच एक वास होता टाटा हॉस्पिटलमधील टॉयलेटमधल्या फिनेलचा. त्या वासानं मला भयानक मळमळायचं. कोणत्याही क्षणी उलटी होईल वाटायचं. तिथे जायला नको म्हणून मी शू दाबून बसून राहायचे. 
आणखी एक न विसरता येणारा वास. आई गेली त्या रात्रीचा वास. तिला सायन हॉस्पिटलमध्ये जाऊन एनिमा दिला होता. कदाचित त्याचा वास, तिला होणा-या उलटय़ांचा वास की मृत्यूचा वास.. तो विचित्र वास ती गेल्यानंतर अनेक महिने येतच होता. ती गेली त्या खोलीत तर तो यायचाच, पण घरातल्या इतर खोल्यांमध्येही तो अधूनमधून जाणवायचा. 
कधी कधी अचानक रस्त्यात, लिफ्टमध्ये, गर्दीच्या ठिकाणी, कधी दबक्या पावलांनी, तर कधी भसकन अंगावर यायचा. 
माझ्या डोळ्यासमोर अंधेरी यायची, दरदरून घाम फुटायचा. आईच्या आठवणीनं डोळे भरून यायचे. अर्थात ते सगळे माझ्या अस्वस्थ आणि अशक्त मनाचेच खेळ होते. दिवस पुढे सरकत गेले तशी जखम हळूहळू भरू लागली आणि तो वास येणं बंद झालं.
 
- शची मराठे
 
shachimarathe23@gmail.com
( कॅन्सरशी यशस्वी लढा देऊन आशावादी जगणं जगणारी शची ही एक मुक्त पत्रकार आहे. आणि न्यूज चॅनलमध्येही तिनं काम केलेलं आहे.)