शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
7
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
8
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
9
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
10
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
11
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
12
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
13
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
14
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
15
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
16
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
17
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
18
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
19
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
20
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप

प्रतिष्ठेच्या अडकित्त्यात नात

By admin | Published: September 03, 2015 8:43 PM

बदलत्या सामाजिक वास्तवाच्या वेढय़ात बहीण- भावाचं नातं गुदमरतंय, त्याला जबाबदार कोण?

- अनंत पाटीलं
 
बदलत्या सामाजिक वास्तवाच्या वेढय़ात बहीण- भावाचं नातं गुदमरतंय, त्याला जबाबदार कोण?
 
प्रेमप्रकरणावरून जातीय हत्त्याकांडांचं प्रमाण
अ.नगर जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक. 
बहिणीनं प्रेमात पडणं,
आणि तेही जातीबाहेर;
हेच मान्य होऊ नये,
असं वातावरण का तयार होतंय?
त्याची कारणं काय?
त्याचाच एक अस्वस्थ रिपोर्ट..
 
तुझा भाऊ कसा वागतो? अधिक काळजीपोटी तुङया जगण्यात ढवळाढवळ तर करत नाही?.. काहीच मिनिटांपूर्वी जगभरातील भल्या-बु:यावर मनभर बोलणा:या एका तरुणीने या प्रश्नावर अचानक अबोला धरला..
मग म्हणाली, नाही कसंय. मला जरा काम आहे. आपण नंतर बोलूया का?.. तिच्या या प्रतिप्रश्नाने मलाही गप्प केलं! 
- अनेक तरुण मुलामुलींशी बोलताना असेच काही अनुभव आले. ज्या नात्याबद्दल कधी प्रश्नही उपस्थित करू नये, अशा एका तरल नात्यातील बदलांचा शोध हाताबाहेर जातोय, ही भावनाच अस्वस्थतेकडे नेणारी होती. 
बहीण-भाऊ! जगातलं सर्वात प्रवाही-तरल नातं. शुद्धतेचं प्रतीक. पण आजकाल सभोवताली घडणा:या काही घटना पाहिल्या की, या नात्यात सुरू झालेली घालमेल समाजरचनेचा तळ ढवळून काढत असल्याची जाणीव होते. 
गेल्या दोन वर्षातील अहमदनगर जिल्ह्यात घडलेल्या काही घटनांनी राज्याचे लक्ष वेधले. प्रेमप्रकरणातून होणा:या हत्त्यांमुळे कधी नव्हे एवढी नगरच्या समाजस्वास्थ्याची चर्चा राज्यभर झाली. पण त्यातील दोन घटना अशा आहेत, ज्यात हत्त्येचे आरोपी आहेत भाऊमंडळी!  त्याशिवाय गावचौक, कॉलेज कॅम्पसमधील ढीगभर हाणामा:या यांच्या संदर्भात केसेस दाखल होताहेत त्या वेगळ्याच. 
काय बिघडतंय याचा स्पष्ट अंदाज मुलामुलींच्या बोलण्यातून थेट येत नाही; पण सर्व आलबेल नाही, हे मात्र नक्की! पण ‘लोक काय म्हणतील’ या मेंदूला घट्टपणो चिकटलेल्या खुळचट संस्कारवाक्याला तर नव्या राजकीय उन्मादाने खतपाणीच घातले आहे. 
अ.नगर जिल्ह्यातील काही निरीक्षणो आहेत. सहकाराच्या विकासामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागही विकसित झाला. सुबत्ता आली, सुबत्तेसोबत येणारं जगही आलं! मोबाइल, फेसबुक वगैरे तर आता सामान्य झालंय. यासोबतच मेंदूत हजारो वर्षापूर्वी गाडून टाकलेली सरंजामशाहीची बीजं डोकं वर काढू लागल्याची लक्षणोही आहेत. त्याला बदलणा:या राजकारणाने यासाठी पूरक परिस्थिती तयार करून ठेवली आहे. काहीही केलं तरी चालतं ही नवी मानसिकताही बाळसं धरूलागली आहे, ती यातूनच! पुरुषी अहंकार गोंजारणारी ही व्यवस्था दिवसेंदिवस अधिकच बळकट होताना दिसते. याचा थेट परिणाम कौटुंबिक नात्यांवर उमटताना दिसतो. 
अधिकार स्वातंत्र्य हा सध्या आवडीचा विषय आहे. प्रत्येकाला आपली स्पेस हवी आहे. अर्थात तो त्याचा अधिकारही आहे. मात्र, आपण प्रगत समाजरचनेच्या टप्प्यार्पयत पोहचण्यासाठी सुरू केलेला प्रवास कधीच भरकटला आहे. किंबहुना हाच प्रवास उलटय़ा दिशेने सुरू झालेला दिसतो. प्रत्येकाला हवी असलेली स्पेस नवा अॅटिटय़ूड जन्माला घालतो अन् त्यातूनच संघर्षाची ठिणगी पडू लागली आहे. 
बहीण-भावाच्या नात्यातही याच बाबींनी शुष्कपणा आणण्यास सुरुवात केली आहे. एकप्रकारे अधिकार स्वातंत्र्याचा नवा संघर्ष या नात्यातही डोकावत आहे. आपल्या बहिणीवर कोणीतरी प्रेम करतो, हेच खपवून घेतले जात नाही. ‘त्याचा’ थेट खून करण्यार्पयत मारली जाणारी मजल काय सांगते? या घटनांतून जे समाजाभिसरण होत आहे, त्याची फलनिष्पत्ती अधिकच घातक आहे. भाऊ या विश्वासाच्या नात्याची जागा हेराने घेतली, ती याच कारणाने! बहिणीचा मोबाइल तपासणो, किती वेळ कोणाशी बोलते, याचा हिशेब मागणो हे प्रकार यातूनच घडत आहेत. ‘तिकडे’ जे घडले, ते आपल्याकडे घडू नये, ही भावना या नात्यावर अधिकच आघात करणारी ठरत आहे. भावाकडून लादली जाणारी बंधनं आणि ही बंधनं झुगारण्यासाठी बहिणींचा सुरू झालेला खटाटोप अनेक ठिकाणी प्रत्ययास येतो. 
एकप्रकारे समाज पुढारला, आधुनिक झाला; मात्र मध्ययुगीन पगडा हटायला तयार नाही. किंबहुना त्याचे फास अधिक घट्ट होत आहेत. वाढत जाणारी सामाजिक असुरक्षितता बहीण-भावाच्या नात्यावरही ओरखडे पाडत आहे. आणि तेच अधिक घातक, अधिक अस्वस्थ करणारं आहे!
 
 
 
मध्ययुगीन समाजमूल्यांचा पगडा काळाप्रमाणो आधुनिक व्हावा, बदलावा अशी अपेक्षा होती; मात्र तसे होताना दिसत नाही. या मूल्यांचे वेिषण करण्याची तसदीही घेतली जात नाही. ग्रामीण भागात तर ती जगण्याची रीत आहे, म्हणून बिंबवलं जातं. नव्या-जुन्याचा संघर्षही यातूनच वाढीस लागला आहे. नात्यातील हा संघर्ष उच्च मध्यमवर्ग आणि मध्यमवर्गात अधिक आढळतो. अ.नगरसारख्या शहरात महाविद्यालयांच्या परिसरात हाणामा:या होण्याचे प्रमाणही वाढले आहे. प्रारंभी दोन टोळक्यांतील असलेला हा संघर्ष, तपास केल्यावर ब:याचदा बहीण-भावाच्या नात्यावर येऊन पोहचतो, ते गंभीर आहे.
- डॉ. वसंत देसले
मानसशास्त्रचे अभ्यासक