शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

गौगॅस...शेणापासून गॅस बनवण्याचा एक नवा उद्योग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 10:05 IST

शेणापासून गॅस बनवण्याचा एक नवा उद्योग

- मयूर देवकर

कौशिकच्या घरी ना शेती, ना तो कधी खेड्यात राहिला. पण हैदराबादच्या कृषी विद्यापीठातून कृषी अभियांत्रिकी केल्यानं तो शेती आणि ग्रामीण जीवनाशी कायमचा जोडला गेला. शेती आणि शेतकºयांची दुर्दशा पाहून चलबिचल सुरु झाली. दरम्यान, त्यानं दिल्लीच्या ‘द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट’मध्ये रीन्यूएबल एनर्जी विषयात एम.टेक.साठी प्रवेश घेतला. तिथं त्याला त्याच्यासारखेच ग्रामीण विकासाच्या ध्येयानं प्रेरित झालेले दोन मित्र भेटले. पीयूष सोहनी आणि शंकर रामकृष्णन.एका ‘एनजीओ’सोबत काम करताना ते सिरोही नावाच्या एका खेड्यात गेले. दिल्लीपासून फक्त ३५ किमी दूर असलेल्या या गावात ९० टक्के घरांत साधा स्वयंपाकासाठीचा गॅस नव्हता. ७० टक्के घरांमध्ये उपजीविकेची साधनं नव्हती. आपल्या शिक्षणाचा ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी उपयोग झाला पाहिजे, असं डोक्यात चक्र सुरू झालं.मध्यंतरी ‘हस्क पॉवर सिस्टिम’मध्ये इंटर्नशिप करत असताना कौशिकची ग्यानेश पांडेशी भेट झाली. ग्यानेश अमेरिका सोडून बिहारच्या गावांमध्ये वीज आणण्यासाठी काम करतो. त्याच्याच सल्ल्यानुसार एम.टेक .पूर्ण झाल्यावर या तीन दोस्तांनी तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जीवनस्तर उंचावण्यासाठी एक कंपनी स्थापन केली. त्यासाठी पीयूष आणि शंकरची स्कॉलरशिप आणि आयआयटी मद्रास रिसर्च पार्कच्या विलोग्रो इनोव्हेशन फाउंडेशनची दहा लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली.किशोर सांगतो, ‘ग्रामीण भागातील सुमारे आठ कोटी कुटुंबांकडे गुरे-ढोरे आहेत. त्यापैकी अर्ध्या जणांच्या घरी दररोजच्या स्वयंपाकासाठी लागणाºया बायोगॅसची निर्मिती करण्याइतपत जागा आणि शेणखत आहे. तरीदेखील भारतातील ८६ टक्के लोक सरपण आणि शेणाच्या गोवºया इंधन म्हणून वापरतात. मग आम्ही ठरवलं की कमी खर्चात बायोगॅस निर्मितीचं तंत्र विकसित करायचं !’२०१३ साली या तिघांनी स्टार्टअप सुरू केलं. त्याला नाव दिलं, ‘सस्टेनअर्थ एनर्जी सोल्यूशन्स’. हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटका यासारख्या गुरांची संख्या जास्त असणाºया दहा राज्यांचा सहा-सात महिने सखोल अभ्यास केला. त्यातून लक्षात आलं की, बायोगॅस तयार करण्याचे नवे तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज नाही. जे आहे ते वापरणं अवघड असल्याने लोकं त्याकडे दुर्लक्ष करतात. लोकांना पटकन विकत घेऊन लगेच वापरता येणारी, जास्त किचकट नसणारी वस्तू आवडत असते हे लक्षात घेऊन त्यांनी एक प्री-फॅब्रिकेटेड फ्लेक्सिबल बॅगसारखा बायोगॅस प्लँट तयार केला. कोणाच्याही मदतीशिवाय दोनच दिवसांत तो बसवता येतो. २०१५ साली त्यांनी ‘गौगॅस’ नावाचा पहिला प्रकल्प तिरुपतीजवळील एका खेड्यातील शेतकºयाकडे बसवला. तिथून त्यांचं हे गौगॅसचं काम जोरात सुरु झालं. सध्या कौशिक आणि टीम मेक्सिकोच्या ‘सिस्टिमा बायोबोल्सा’ कंपनीसोबत मिळून काम करते.कौशिक म्हणतो, एकीकडे आपण मेट्रोमधून फिरतो, सर्व सुखसुविधांवर जगतोय आणि खेड्यांमध्ये लोक अन्न, पाणी, वस्त्र, ऊर्जा, आरोग्य, शिक्षण अशा मूलभूत सुविधांपासूनही वंचित आहेत. समाजातील ही दरी भरून काढणं आपली नैतिक जबाबदारी आहे’.

भविष्यात स्कोप काय?आॅर्गेनिकची चलती असणाºया नव्या जगात अशा ‘देशी’ उद्योगांना स्कोप आहे. फक्त नजर नवी हवी.

कौशल्य काय हवीत?खरं तर इच्छाशक्ती हवी आपणआपल्या अवतीभोवतीची साधनं कल्पकेनं वापरण्याची?डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग, बी.टेक. झालेल्यांनी थोडा कल्पक विचार केलातर अशा आयडिया सुचू शकतात.