शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
2
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
3
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
4
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
5
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
6
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
7
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
8
Share Market Updates 7 August: ट्रम्प टॅरिफ बॉम्बमुळे शेअर बाजार कोसळला, Sensex ८०००० अंकांच्या खाली
9
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
10
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
11
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी
12
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
13
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
14
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
15
Raksha Bandhan 2025 Wishes: रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages, Status आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
16
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
17
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
18
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
19
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
20
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू

गौगॅस...शेणापासून गॅस बनवण्याचा एक नवा उद्योग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 10:05 IST

शेणापासून गॅस बनवण्याचा एक नवा उद्योग

- मयूर देवकर

कौशिकच्या घरी ना शेती, ना तो कधी खेड्यात राहिला. पण हैदराबादच्या कृषी विद्यापीठातून कृषी अभियांत्रिकी केल्यानं तो शेती आणि ग्रामीण जीवनाशी कायमचा जोडला गेला. शेती आणि शेतकºयांची दुर्दशा पाहून चलबिचल सुरु झाली. दरम्यान, त्यानं दिल्लीच्या ‘द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट’मध्ये रीन्यूएबल एनर्जी विषयात एम.टेक.साठी प्रवेश घेतला. तिथं त्याला त्याच्यासारखेच ग्रामीण विकासाच्या ध्येयानं प्रेरित झालेले दोन मित्र भेटले. पीयूष सोहनी आणि शंकर रामकृष्णन.एका ‘एनजीओ’सोबत काम करताना ते सिरोही नावाच्या एका खेड्यात गेले. दिल्लीपासून फक्त ३५ किमी दूर असलेल्या या गावात ९० टक्के घरांत साधा स्वयंपाकासाठीचा गॅस नव्हता. ७० टक्के घरांमध्ये उपजीविकेची साधनं नव्हती. आपल्या शिक्षणाचा ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी उपयोग झाला पाहिजे, असं डोक्यात चक्र सुरू झालं.मध्यंतरी ‘हस्क पॉवर सिस्टिम’मध्ये इंटर्नशिप करत असताना कौशिकची ग्यानेश पांडेशी भेट झाली. ग्यानेश अमेरिका सोडून बिहारच्या गावांमध्ये वीज आणण्यासाठी काम करतो. त्याच्याच सल्ल्यानुसार एम.टेक .पूर्ण झाल्यावर या तीन दोस्तांनी तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जीवनस्तर उंचावण्यासाठी एक कंपनी स्थापन केली. त्यासाठी पीयूष आणि शंकरची स्कॉलरशिप आणि आयआयटी मद्रास रिसर्च पार्कच्या विलोग्रो इनोव्हेशन फाउंडेशनची दहा लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली.किशोर सांगतो, ‘ग्रामीण भागातील सुमारे आठ कोटी कुटुंबांकडे गुरे-ढोरे आहेत. त्यापैकी अर्ध्या जणांच्या घरी दररोजच्या स्वयंपाकासाठी लागणाºया बायोगॅसची निर्मिती करण्याइतपत जागा आणि शेणखत आहे. तरीदेखील भारतातील ८६ टक्के लोक सरपण आणि शेणाच्या गोवºया इंधन म्हणून वापरतात. मग आम्ही ठरवलं की कमी खर्चात बायोगॅस निर्मितीचं तंत्र विकसित करायचं !’२०१३ साली या तिघांनी स्टार्टअप सुरू केलं. त्याला नाव दिलं, ‘सस्टेनअर्थ एनर्जी सोल्यूशन्स’. हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटका यासारख्या गुरांची संख्या जास्त असणाºया दहा राज्यांचा सहा-सात महिने सखोल अभ्यास केला. त्यातून लक्षात आलं की, बायोगॅस तयार करण्याचे नवे तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज नाही. जे आहे ते वापरणं अवघड असल्याने लोकं त्याकडे दुर्लक्ष करतात. लोकांना पटकन विकत घेऊन लगेच वापरता येणारी, जास्त किचकट नसणारी वस्तू आवडत असते हे लक्षात घेऊन त्यांनी एक प्री-फॅब्रिकेटेड फ्लेक्सिबल बॅगसारखा बायोगॅस प्लँट तयार केला. कोणाच्याही मदतीशिवाय दोनच दिवसांत तो बसवता येतो. २०१५ साली त्यांनी ‘गौगॅस’ नावाचा पहिला प्रकल्प तिरुपतीजवळील एका खेड्यातील शेतकºयाकडे बसवला. तिथून त्यांचं हे गौगॅसचं काम जोरात सुरु झालं. सध्या कौशिक आणि टीम मेक्सिकोच्या ‘सिस्टिमा बायोबोल्सा’ कंपनीसोबत मिळून काम करते.कौशिक म्हणतो, एकीकडे आपण मेट्रोमधून फिरतो, सर्व सुखसुविधांवर जगतोय आणि खेड्यांमध्ये लोक अन्न, पाणी, वस्त्र, ऊर्जा, आरोग्य, शिक्षण अशा मूलभूत सुविधांपासूनही वंचित आहेत. समाजातील ही दरी भरून काढणं आपली नैतिक जबाबदारी आहे’.

भविष्यात स्कोप काय?आॅर्गेनिकची चलती असणाºया नव्या जगात अशा ‘देशी’ उद्योगांना स्कोप आहे. फक्त नजर नवी हवी.

कौशल्य काय हवीत?खरं तर इच्छाशक्ती हवी आपणआपल्या अवतीभोवतीची साधनं कल्पकेनं वापरण्याची?डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग, बी.टेक. झालेल्यांनी थोडा कल्पक विचार केलातर अशा आयडिया सुचू शकतात.