शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

एक करंजी-एक लाडू म्हणत टेम्पो भरभरून पाडय़ांवर जाताय? -जरा थांबा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2018 4:50 PM

शहरातल्या सर्व मित्र-मैत्रिणींना आमची हीच विनंती आहे. पाडय़ावर दिवाळीत जरूर या, पण फराळवाटपखोर म्हणून येऊ नका. आम्हाला बिचारे समजून येऊ नका. दानाचे पुण्य कमवायला येऊ नका. आनंद शेअर करायला या. -जमेल?

ठळक मुद्देफराळापेक्षा माणसांनी एकमेकांच्या जवळ येणं मोलाचं हे विसरू नका. 

मिलिंद थत्ते

दिवाळी हा आपला सर्वाचा सण. प्रत्येकाची सण साजरा करण्याची पद्धत थोडी वेगळी. कुठे गूळ घालून गोड करायची रीत, तर कुठे साखर. कुठे ओलं खोबरं, तर कुठे सुकं खोबरं. कुठे तूप तर कुठे तेल.  दिवाळी साजरी करताना काकडीच्या रसात तांदळाचे पीठ भिजवून केलेली पानात वाफवलेली गोड सावळी भाकरी, घुगर्‍या आणि अर्थातच घरातल्या गावठी कोंबडय़ाची भाजी असा मस्त बेत आमच्या जव्हार-मोखाडय़ाच्या पाडोपाडी असतो. याचवेळी कांदफळे आणि चवळीची भेट घरोघरी लोक देतात. सावळी भाकरी आणि भाजीची ताटेही एकमेकांच्या घरोघरी जातात. दिवाळीआधी घरातला पुरुष बाहेरगावी कामाला गेला असेल तर परत आलेला असतो. त्याने आणलेल्या पैशांतून नवीन कपडय़ांची खरेदीही झालेली असते. शाळांना सुटी असल्यामुळे बाहेरगावी शाळेत गेलेली मुले-मुलीही परत आलेली असतात. गाव कसं भरलेलं असतं, आनंदाचं वातावरण असतं. काही ठिकाणी शेणाचा गोळा कुडावर थापून त्यावर झेंडूच्या फुलांनी शाकारलेले असते. अशी आमची पाडय़ावरची दिवाळी होत असतानाच एखादा टेम्पो येतो.. त्यातून आलेल्या लोकांनी लाडू-करंजी-चिवडा आणि काही काही वस्तू आणलेल्या असतात. आमच्या काही गावांना तर याची सवयच झाली आहे. असा टेम्पो दिसला की छोटी पोरं धावतात, गर्दी करून टेम्पोवाले जे काही देतील ते घेतात. त्यातले काही पदार्थ आम्हाला सवयीचे नसतात, आवडीचे नसतात, मग ते फेकून द्यायचे आणि आवडलेले खायचे. पुढचा टेम्पो किंवा कार आली की त्यात काय आहे हे बघून ठरवायचे, जायचे की नाही! काही कारवाले तर भराभर पाकिटं वाटतात, पोरांना तसंच उभं करून फोटो काढतात, आपला बॅनर लावतात, स्वतर्‍च कॅमेर्‍याकडे बघून हसतात. सगळी मजाच वाटते आम्हाला.. आम्ही दिवाळी कशी करतो हे बघायलाही या पाहुण्यांना उसंत नसते. आमची दारं उघडी असतात, आल्या पाहुण्याचं आम्ही मनापासून स्वागत करतो. आम्ही शेतकरी असल्यामुळे जेवण मोजून वाढत नाही, जो पाहुणा येईल त्याला पोटभर जेऊ घालतो. आम्हाला जे छान वाटतं, खायला आवडतं, ते आमच्या दिवाळीत असतंच. एखादं पाहुणा सवडीनं आला तर आम्ही आमच्या मेजवानीत त्याचंही ताट वाढू की! पण हे फराळवाटे पाहुणे भलतेच घाईत असतात. त्यात त्यांना असं वाटतं की आमच्याकडे त्यांच्या आवडीचे लाडू-करंजी वगैरे नाही म्हणजे जशी काही आम्ही दिवाळीच करत नाही. खरं तर हे पाहुणे चांगल्या मनाने येत असतील, तर त्यांनी थोडा संथ श्वास घ्यावा. आमच्याकडची शुद्ध हवा भरून घ्यावी. आमच्या घरात मांडी घालून घटकाभर बसावं. आमची कांदफळं, दिवाळीतले इतर पदार्थ चाखावेत. आम्हीही त्यांच्याकडचे चाखू. सारे भारतीय माझे बांधव आहेत, हीच तर आपली सर्वाची प्रतिज्ञा आहे. मग दिवाळीसारख्या सणात भावाभावांनी एकत्र येणं, एकत्र  जेवणं, एकमेकांचे आनंद अनुभवणं- यासारखी दुसरी छान गोष्ट काय असू शकते? शहरातल्या सर्व मित्र-मैत्रिणींना आमची हीच विनंती आहे. पाडय़ावर दिवाळीत जरूर या; पण वाटपखोर म्हणून येऊ नका. आम्हाला बिचारे समजून येऊ नका. दानाचे पुण्य कमवायला येऊ नका. आनंद शेअर करायला या. तरुण असाल तर आमच्याबरोबर खेळायला या. छोटे असाल तर आमच्याबरोबर जंगल फिरायला या. कुणाकडे पाहुणे जाताना आपण खाऊ नेतोच की, तसाच थोडा फराळ घेऊनही या. (डबाभर, टेम्पोभर नाही). आणि फराळापेक्षा माणसांनी एकमेकांच्या जवळ येणं मोलाचं हे विसरू नका.     - एक पाडय़ावरचा  रहिवासी