- निकिता राणे
तुम्ही नास्ता करता का?रोज करता का?- नसाल करत तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. जे लोक नास्ता करत नाहीत त्यांचं वजन झपाट्यानं वाढतं, ते लवकर लठ्ठ होतात. आणि त्यांचा कंबरेचा घेरही इतरांपेक्षा जास्त मोठा असतो..हे ऐकून धक्का बसेल; पण आपलं वजन जर वाढलेलं असेल तर त्याचं कारण आपण कायमच न केलेल्या नास्त्यात आहे हे समजून घ्या. मुख्य म्हणजे नास्ता केला, भरपूर खाल्लं म्हणून हे वजन वाढलं असं नाही तर उपाशी राहिल्यानं वाढलं हे जास्त दुर्दैवी आहे...आठवून पहा, आपल्याला रोजच घाई असते. सकाळी उशिरा उठायचं, मग आवरायची घाई. वेळेवर पोहचायची घाई, सकाळी खावंसंच वाटत नाही हा स्वत:च मनाशी केलेला भ्रम अशी अनेक कारणं असतात. त्यातून नास्ता करणं मात्र राहून जातं.पण अमेरिकेतल्या मायो क्लिनिकने २०१५ ते २०१७ या वर्षांत केलेल्या ओबेसिटीच्या अभ्यासाचा निष्कर्ष मात्र काहीतरी वेगळंच सांगतो. या अभ्यासात ओबेसिटीची कारणं आणि लोकांच्या सवयी असाही एक अभ्यास झाला. त्यात असं दिसून आलं की, जे लोक नास्ता करतात त्यांचं वजन झपाट्यानं वाढत नाही, त्यांच्या कंबरेचे घेरही झरझर वाढत नाहीत. उलट जे नास्ता करतच नाहीत ते वेगानं जाड होतात. बराच वेळ उपाशी राहणं आणि मग एकदम भरपेट जेवणं यातून शरीरात चरबीसंचय वेगानं होत असावा असा या अभ्यासाचा तर्क आहे.यात पुन्हा स्त्रीपुरुष असा भेद नाही. म्हणजे जाड होण्याचा वेग स्त्रीपुरुष दोघांचाही सारखाच दिसतो.त्यामुळे आता हे क्लिनिक ब्रेकफास्ट करा, सकाळी उठल्यावर अर्धा तासापेक्षा जास्त वेळ उपाशी राहू नका, असा प्रचार करतं आहे.यावरून आपल्या वजनवाढीचा विचार करायचा तर ज्यानं त्यानं स्वत:लाच विचारलं पाहिजे की, आपण सकाळी नास्ता करतो का?नास्ता न केल्याचा संबंध मूड बिघडण्याशी, मूड स्विंगशी असतोच; पण तो वजनवाढीशीही असतो हे लक्षात ठेवलेलं बरं.