शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

दुष्काळातल्या मित्रंनो, सॉरी!!

By admin | Updated: June 11, 2015 14:50 IST

खेडय़ापाडय़ातून आलेले आमचे तरुण मित्रमैत्रिणी दुष्काळापायी होरपळताहेत, आणि त्यांची आमची धड ओळखही नाही, याचीच आता लाज वाटते!

‘खेडय़ापाडय़ात श्रीमंत करिअर’ हा ऑक्सिजनचा अंक वाचला!
आणि वाटलं कुठल्या जगात राहतेय मी, मला तर हे सारं काही माहितीच नाही!
मुळात मला खेडीच माहिती नाहीत, खेडय़ातला भारत माहिती नाही, आणि प्रश्नही माहिती नाहीत.
ते माहिती करून घ्यावेत असं कधी कुणी सांगितलं नाही, कधी वाटलंही नाही!
मी कायमच पुण्यात, एफसी रोडवर. मराठवाडय़ातून आलेले आमचे मित्रमैत्रिणी जेव्हा दुष्काळाबद्दल बोलतात तेव्हा त्याचं काही गम्यही वाटत नाही.
अनेकदा तर काही मित्रंना आम्ही चिडवलंपण की, काय तू तुमच्या गावाकडे एवढा दुष्काळ आणि इथं काय करतोय रूपालीत, जा हंडे वाहायला, पाणी भरायला!
आणि तो मित्रही काहीही युक्तिवाद न करता सारं काही ऐकून हसून सोडून द्यायचा. जसं काही त्यानंही नातंच तोडून टाकलं होतं त्याच्या गावाशी, तिथल्या दुष्काळाशी!
एकदा बोलता बोलता तो म्हणाला, ‘कवटाळून करू काय ती दु:ख! इथं सारी सुखं, सारी चमकधमक आणि तिथं नुस्ता खकाणा. मला कंटाळा आलाय त्या खकाण्याचा आणि त्या रिकाम्या डबडय़ांचा!’
त्यादिवशी त्याचा त्रगाही मला काही कळला नाही!
एकदा मात्र चुकून गमतीत आम्ही त्याचं वडिलांशी सुरू असलेलं बोलणं चोरून ऐकलं!
हा त्यांना कळवळून सांगत होता, नका पाठवू पैसे, मी कायपण करीन, मी काहीतरी करीन सोय, तुम्ही माझी काळजी करू नका.
ओशाळं होऊन आम्ही त्याला विचारलं की नेमकं काय झालंय?
तेव्हा तो सांगत होता, बहिणीच्या लग्नापायी डोक्यावर घेतलेलं कर्ज आहे. यंदा काहीच उत्पन्न नाही, एक गाय होती फक्त, तीही मेली. आता वडिलांकडे रोख पैसा हातात येईल अशी काही सोयच नाही.
काय तोंडानं त्यांना सांगू की मला पैसे पाठवा?’
तो ढसढसा रडला तेव्हा माझ्यासारख्यांना कळलं की दुष्काळ काय असतो? गरिबी काय असते आणि लढाई काय असते?
त्याच काळात तुमचा ग्रामीण उद्योजकतेवरचा अंक वाचला. 
वाटलं, असं काहीतरी खेडय़ापाडय़ात जाऊन आमच्यासारख्याच तरुण मुलांनी करायला हवं!
कसं करायचं नि काय करायचं, हे मला आत्ता माहिती नाही!
मला आज एवढंच माहिती आहे की, माझ्या अवतीभोवती माझे असे काही मित्र आहे ज्यांच्या जगण्यात एकाएकी दुष्काळ पडलाय. आणि ते कोरडेठाक होत चाललेत!
दुर्दैव हेच की, त्यांच्यासाठी मी काहीच करू शकत नाहीये.
 
- मिहिरा गुंजाळ, पुणो