शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

कमॉन विदर्भ!

By meghana.dhoke | Updated: January 11, 2018 08:47 IST

आपण खेळतो आणि आपण जिंकू शकतो, जिंकतो.. या दोन वेगळ्या गोष्टी. दोन वेगळ्या भावना. खेळाची संस्कृतीच नाही, तर खेळाडूंची मानसिकताच बदलून टाकणारा विक्रम तेव्हा घडतो. विदर्भानं रणजी जिंकणं ही त्या बदलाची सुरुवात आहे..

 

शेवट गोड झाला की त्या आनंदात थिजून जावं काही दिवस. विजयाच्या प्रवासातले बारकेबुरके क्षण पुन्हा पुन्हा आठवत राहावेत आणि ‘साजरा’ करत राहावा तो आनंद..असं वाटणं काही चूक नाही. पण ज्या भयानक वेगवान जगात आपण जगतोय तिथं ‘काल’ महत्त्वाचा उरलेलाच नाही. कालचा उत्तुंग विजय कितीही मोठा असला तरी ‘भूतकाळ’ असतो आणि ‘आज’ नवीन आव्हान घेऊन समोर उभा असतो..रणजी विजेत्या विदर्भ क्रिकेट संघाची ही गोष्ट. खरंतर काही महिने सतत साजरा करावा अशी विक्रमी कर्तबगारी या संघानं करून ठेवली आहे.त्याविषयी बोलावं असं बरंच काही आहे. मात्र हा लेख लिहायला घेतला तेव्हा आपल्या ‘फेअरी टेल’ कर्तबगारीचा ऐतिहासिक आनंद आणि कधीकाळी चिकटलेलं ‘अण्डरडॉग’ लेबल घरी ठेवून विदर्भाचा संघ पुढचं आव्हान पेलण्यासाठी मैदानात उतरलाही होता. सेण्ट्रल झोन सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेण्टी स्पर्धेत छत्तीसगढला भिडलाही होता.हे मान्यच करायला हवं की, अतिक्रिकेटच्या चालू वर्तमानकाळात रणजीचं महत्त्व तसं कमी होत चाललं आहे. मात्र तरीही देशात फर्स्टक्लास क्रिकेटची अत्युच्च कर्तबगारी सिद्ध होते ती रणजीतच. देशात तळागाळात, छोट्या शहरांत क्रिकेट झिरपायला लागलं तेव्हा या छोट्या संघासमोर आणि त्यात खेळणाºया खेळाडूंसमोर एक प्रश्न वारंवार आला..रणजी कितीदा जिंकलंय?- याचं उत्तर जे असो ते असो, पण रूढार्थानं त्याचं उत्तर हेच असतं की, साधं रणजी जिंकता येत नाही, चाललेत भारतीय संघात स्थान सांगायला. गुणवत्तेची मातब्बरी मानणाऱ्या या खेळात आजही ‘झोन’चं मोल हे रणजी करंडकाच्या विक्रमावर ठरतंच. उदाहरणार्थ मुंबई. रणजीच्या इतिहासात आजवर ४१ वेळा ‘चॅम्पिअन’ ठरण्याची कमाल मुंबई संघानं करून दाखवली आहे.आणि त्यांच्या त्या विक्रमासमोर अन्य झोन आणि संघ हे खुजेच वाटत राहणार असं वातावरणही क्रिकेट जगानं अनेक वर्षे पाहिलं आहे.विदर्भ क्रिकेटनंही ५० वर्षे झगडल्यानंतर आता पहिल्यांदा रणजी करंडकरावर आपलं नाव कोरलं. आणि रणजीचीच नाही तर क्रिकेट गुणवत्तेची मिरासदारी मोडून काढत आपल्या क्रिकेट जगतातल्या ‘अरायव्हल’ची घोषणा केली.विदर्भानं आजवर भारतीय क्रिकेटला अनेक गुणवान खेळाडू दिले; पण ते खेळाडू खेळत असलेल्या विदर्भ संघाला रणजीच्या फायनलमध्ये खेळण्याचं भाग्य लाभलं नाही.यंदा रणजी खेळणाऱ्या फैज अ‍ॅण्ड कंपनीने इतिहास घडवला तो हा!दिल्लीविरुद्ध मॅच जिंकल्यावर जिवाच्या आकांतानं त्यांनी ‘कम ऑन विदर्भ’ असा जो गजर झाला तो भारतीय क्रिकेटसाठी नवीन होता. इंदूरच्या होळकर स्टेडिअममध्ये विदर्भाकडून खेळणाऱ्या वासिम जाफरने विजयी चौकार मारला आणि सायंकाळी ५ च्या सुमारास सूर्य अस्ताला जात असताना विदर्भ क्रिकेटसाठी एक नवीन पहाट होत होती.नियती ही असते. ३९ वर्षांचा जाफर आजवर मुंबईकडून खेळला. ही त्याची नववी रणजी फायनल. मात्र विजयी चौकार मारायची संधी कधी मिळाली नव्हती, ती विदर्भानं दिली, तीही वयाच्या या टप्प्यात आणि ऐतिहासिक.महानगरी क्रिकेटकडून ‘स्मॉल टाउन’कडे होणारा हा भारतीय क्रिकेटचा प्रवासच विदर्भाच्या विजयानं अधोरेखित केला. नाहीतर फैज फैजल, रजनीश गुर्बानी, १९ वर्षे वयाचा मध्यमगती बॉलर आदित्य ठाकरे हे सारे सर्वदूर भारतात कुणाला माहिती होते? ही मुलं रणजी जिंकतील असं एरव्ही कुणाला सांगितलं असतं तर ‘अण्डर डॉग’ म्हणूनही त्यांना कुणी फारसं गांभीर्यानं घेतलं नसतं.पण ते घडलं. कारण ही गुणवान मुलं झपाटल्यासारखी खेळली म्हणून..पण तेवढंच या यशाचं कारण नाही.‘आपण काय जिंकणार? आपण खेळतोय तेच फार आहे’ या भावनेपासून ‘आपण जिंकू शकतो’ ते ‘आपणच जिंकणार’ या भावनेपर्यंत झालेला हा प्रवास आहे.‘आपणच जिंकणार’ ही जिद्द जागवली ती या संघाचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनी. पंडित हे मुंबई क्रिकेटमधलं जानमानं नाव. रणजीविजेत्या मुंबई संघाचे ते तीनदा प्रशिक्षक होते, चारदा फायनलपर्यंतही मुंबई संघ पोहचला होता. मागच्या वर्षी गुजरातबरोबरचा अंतिम सामना हरल्यानं मुंबईनं पंडितांना नारळ दिला. आणि विदर्भानं त्यांच्यासाठी दार उघडलं.बदल इथून सुरू झाला. जे विदर्भात पन्नास वर्षे घडलं नाही ते यावर्षी घडलं. त्याचा आरंभ, ‘आपला संघ जिंकू शकतो’ यावर विश्वास ठेवायला पंडितांनी या संघाला भाग पाडलं. संघ जिंकला तर बक्षिसाच्या रकमेचं काय करणार, असं पंडितांनी विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रशांत वैद्य यांना या मौसमाच्या सुरुवातीला विचारलं होतं. त्यावर कुठली इनामी रक्कम हे वैद्यांच्या क्षणभर लक्षात आलं नाही हा किस्सा सध्या गाजतोय. मात्र पंडित ठाम होते की, आपण जिंकू शकतो.अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत चंद्रकांत पंडित सांगतात तो जिंकण्या-हरण्याच्या दृष्टीचा फरक. ‘या विजयानं हा विदर्भ संघच बदलणार नाही, तर विदर्भात खेड्यापाड्यात क्रिकेट खेळणाऱ्या १४-१६ वर्षांच्या मुलांनाही असं वाटू लागेल की आपण जिंकू शकतो. आपण खेळतो आणि आपण हा खेळ जिंकू शकतो, जिंकतो या दोन भावनांमधला फरक हा एक फार मोठा सांस्कृतिक बदल आहे. आणि तो बदल विदर्भातल्या क्रिकेटमध्ये घडण्याची शक्यता या विजयानं निर्माण केली आहे!’ते म्हणतात ते खरंय. म्हणून तर फैज फैजल, रजनीश गुर्बानी, आदित्य ठाकरे, शुभम कापसे, रवि ठाकूर, सुनिकेत बार्इंगवार नावाचे हे खेळाडू आता मॅच विनर म्हणून चर्चेत आहेत. लवकरच आयपीएलचा लिलाव सुरू होईल आणि नवीन मालामाल संधीही या मुलांच्या स्वागताला उभी राहील..पंडित म्हणतात तसं, आपण जिंकू शकतो, जिंकतो..या एका भावनेनं बदलाला आरंभ होतो..रणजी जिंकण्याचा हा एक विक्रम त्या बदलाची सुरुवात आहे..फक्त विदर्भासाठीच नाही, तर झारखंड, छत्तीसगड या शेजारी राज्यांसाठीही! तिथल्या तरुण खेळाडूंसाठीही..