शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
3
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
4
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
5
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
6
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
7
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
8
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
9
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
10
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
11
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
12
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
13
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
14
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
15
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
16
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
17
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
18
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
19
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
20
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...

लॉकडाउनमध्ये शरीराचं आरोग्य सांभाळत असाल, पण सायबर फिटनेसचं काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 13:58 IST

लॉकडाउनमध्ये सायबर सुरक्षितता पाळा, त्यासाठी सायबर साक्षर व्हा आणि पुढचा टप्पा म्हणजे आपला सायबर फिटनेस उत्तम ठेवा, नाहीतर.

ठळक मुद्देसायबर विश्वात वावरताना प्रत्येकाने सायबर विश्वासंदर्भात जागरूक राहणो अपरिहार्य आहे.

लॉकडाउन आहे.हातात इंटरनेट आहे. म्हटलं तर सगळ्या जगाशी आपला कनेक्ट आहे.मात्र त्यातून कळत-नकळतपणो काहींची पाऊलं सायबर गुन्हेगारीकडे वळू लागली आहेत.आपल्या लक्षातही येत नाही आणि आपण गुन्हा करून बसतो असं होतंय का यावरही आपण बारकाइनं लक्ष ठेवायला हवं.लॉकडाउनच्या काळात इंटरनेटवर आपण प्रचंड अवलंबून झालो आहोत.ते आपलं कम्युनिकेशनचं साधन आहे. त्यात रिअल-टाइम, डायनॅमिक डेटा यामुळे अनेक यूजर्स ते म्हणजेच सर्वस्व असं म्हणून त्यातच हरवले आहेत.बरं त्याला भौतिक मर्यादा नाही, वापराला स्थळ-काळ-वेळेचं बंधन नाही.त्यामुळे इंटरनेटवर जास्त वेळ जाऊ लागला.मात्र ते करताना आपल्याला नेटवर आलेली माहिती नेमकी कुठून आली? त्याचा स्नेत काय? या माहितीचा खरेपणा काय? माहिती नेमकी किती खरी, त्यात किती गोष्टींशी छेडखानी करण्यात आली आहे?हे सारे प्रश्न आपण स्वत:ला विचारणं, वाचलेल्या माहितीचा चिकित्सक पद्धतीने विचार करणं, तपासून घेणं, जरा मिनिटभर थांबून ती माहिती प्रोसेस करणं इतकं सोपं काम करण्याची तसदीसुद्धा अनेकजण घेत नाहीत.आपण एखादी पोस्ट व्हायरल करताना जास्तीत जास्त लाइक कमेंट कशा पद्धतीने मिळवता येतील याचाच विचार करतो.मात्र तरुण मुलांनी वेळची या विळख्यातून बाहेर पडण्याची आज नितांत गरज निर्माण झाली आहे. ते न केल्यानं समाजात अफवा पसरवतात.  गैरसमज निर्माण करणारा मजकूर, व्हिडीओ यातून धार्मिक तेढ, सायबर बदनामी असे प्रकार केले जातात.त्यातून अनेकांची आयुष्य करपून जातात.सोशल मीडिया हाताळण्याची  संवेदनशीलता, कौशल्य नसल्यानं इतरच कशाला आपलंही नुकसान होऊ शकतं याचाही विचार करण्याची गरज आहे.सायबर साक्षरता आणि सायबर फिटनेस या दोन गोष्टी लॉकडाउनच्या काळात शिकून घ्या.ते नाही केलं तर आपल्या मनाचं आरोग्य तर बिघडेल, आपण समाजाला आाणि सोशल मीडिया आपल्याला घातक ठरू शकेल.त्यासाठी या गोष्टींकडे लक्ष द्या.   1. संगणक, लॅपटॉप, स्मार्टफोन आणि टॅब्लेटसारख्या डिजिटल उपकरणाद्वारे एखाद्याची बदनामी करणं किंवा अफवा पसरवून  समाजातील शांतता भंग करून तेढ निर्माण करणं ही सायबर गुंडगिरी आहे, हे लक्षात ठेवा.2. व्हॉट्सअॅप, फेसबुक इतर अॅप्सच्या माध्यमातून  एखाद्या व्यक्तीबद्दल, घटनेबद्दल, विशिष्ट समूहाबद्दल नकारात्मक, चुकीची माहिती प्रसारित केली जाते त्यातून समाजाचा एकोपा, सोहार्द धोक्यात येऊ शकतं. तसं करणं, कळत-नकळत हा गुन्हा आहे.3. एखाद्या व्यक्तीबद्दल, समाजाबद्दल बनावट वेबपेज, व्हिडीओ, मजकूर, कमेण्ट्स व्हायरल करून ऑनलाइन धार्मिक, वांशिक, पारंपरिक किंवा राजकीय द्वेष पसरवणं हा समाजकंटकांचा हेतू असू शकतो. त्यासाठी आपले अकाउण्टही वापरले जाऊ शकतात. मॉर्फीगचे प्रकार घडतात.त्यामुळे आलेली माहिती ताडून पहा. आपल्या खासगीपणाची पूर्ण काळजी घ्या.4. शक्यतोवर अनावश्यक माहिती मजकूर फॉरवर्ड, व्हायरल करणं टाळा, उत्साहाच्या भरात आपण एखाद्या सायबर गुन्ह्यात अडकू शकतो हे लक्षात घ्या.                     5. सोशल मीडिया हे आवश्यक माहितीच्या आदानप्रदानासाठी आहे, द्वेष पसरविण्यासाठी नाही हे आधी ध्यानात घ्या. व्हॉट्सअॅप,  फेसबुकवर येणारी प्रत्येक पोस्ट, मजकूर, व्हिडीओ विश्वासार्ह असतो असे नसते. अफवा, फेक पोस्ट मागे एखादी विकृत भावना असू शकते.                                               6. सोशल मीडियावर काही पोस्ट, अफवा, तेढ निर्माण करणारे मजकूर प्रकाशित करण्याआधी कायद्यातील तरतुदी लक्षात घ्या.7.  सायबर विश्वात वावरताना प्रत्येकाने सायबर विश्वासंदर्भात जागरूक राहणो अपरिहार्य बनले आहे.

 

1.महाराष्ट्र राज्यात आतार्पयत, आक्षेपार्ह व्हॉट्सअॅप मेसेजेस फॉरवर्ड केल्याप्रकरणी 127 गुन्हे तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्याप्रकरणी 113 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 2. टिकटॉक व्हिडीओ शेअर प्रकरणी 1क् गुन्हे व ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी 5 गुन्हे दाखल झाले आहेत.3.इन्स्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी चार गुन्हे दाखल व अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, यू-टय़ूब) गैरवापर केल्याप्रकरणी 48 गुन्हे दाखल झाले आहेत.  4.कोविड-19 विषाणूसंदर्भाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये शांतता व एकोपा अबाधित राखण्यासाठी सोशल मीडियावर अधिक बारकाईने लक्ष ठेवले जाते आहे.5.इलेक्ट्रॉनिक, डिजिटल पुरावा सिद्ध झाल्यास आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होऊ शकते.