शहरं
Join us  
Trending Stories
1
आता शिरूरमध्ये पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती! पोलीस पाटलाच्या मुलीचा प्रताप; दोघांना उडवलं, एकाचा मृत्यू
2
“काँग्रेसचा दारुण पराभव होणार असल्यानेच एक्झिट पोल चर्चांमध्ये सहभागी होणार नाही”: अमित शाह
3
पश्चिम बंगालमध्ये मतदानावेळी बॉम्बफेक; सीपीएम, आयएसएफचे कार्यकर्ते जखमी, ईव्हीएमही पाण्यात फेकले  
4
“PM मोदींची ध्यानसाधना देशाला लाभदायक, दुराचारी लोकांना त्याचे महत्त्व नाही”: योगी आदित्यनाथ
5
अजित पवारांची सभा घेतली, राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल
6
अग्रलेख: डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अडचणीत! लाच दिल्याप्रकरणी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी
7
मतदानाच्या सप्तपदीतील शेवटची फेरी आज; ८ राज्यांत ५७ जागांवर दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख: धूर्त सत्ताधीश, निवडणुका आणि ‘एआय’.... विज्ञान : शाप की वरदान?
9
सलमान खानच्या हत्येचा नवा कट उघडकीस, पाकिस्तानमधून मागवणार होते शस्त्रं
10
अन्वयार्थ लेख: सध्या तरुणांचा असलेला भारत देश २०५० मध्ये ‘वृद्ध’ होईल, तेव्हा काय करणार?
11
LPG Price Cut: महिन्याच्या सुरुवातीलाच खूशखबर, स्वस्त झाला LPG Cylinder; पाहा नवे दर
12
Porsche Car Accident : अल्पवयीन कारचालकाची आई शिवानी अग्रवाल अटकेत; बाळाला वाचवण्यासाठी ब्लड सॅम्पल बदलल्याचा पोलिसांना संशय
13
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: माजी संचालिकेचा सहभाग, पोलिसांचा सत्र न्यायालयात दावा
14
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! DA नंतर आता ग्रॅच्युइटीत केली वाढ, पाहा डिटेल्स 
15
अनंत-राधिका विवाहासाठी अंबानींनी १२ जुलै तारीखच का निवडली? खास आहे दिवस, अद्भूत शुभ योग
16
मंगळाचे स्वराशीत गोचर: ६ राशींना अच्छे दिन, जबरदस्त यश-लाभ; मेहनतीचे योग्य फल, मंगलमय काळ!
17
डाेंबिवली MIDC स्फोट प्रकरण: मलय, स्नेहाला न्यायालयीन कोठडी; अधिकाऱ्यांची होणार चौकशी
18
४८ तास उलटूनही ‘तो’ पोकलेन चालक बेपत्ता; ब्लॉक कापण्यासाठी डायमंड कटर मागवले
19
थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; केंद्राच्या हवाल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
20
आजचे राशीभविष्य - 1 जून 2024 : भिन्नलिंगी व्यक्तीचा तुमच्या जीवनावर पगडा असेल, मान-सन्मान मिळेल

सिनेमॅटिक लिबर्टी की खोडसाळपणा?

By admin | Published: April 26, 2017 5:26 PM

सिनेमा आपण नक्की कसा पाहणार ?

-  राहुल बोर्डे

शेगाव
 
भारतीय चित्रपट  सृष्टीला आज 100 वर्ष उलटून गेली आहेत. राजा हरिश्चंद्र या मूकपटाने सुरु वात झालेल्या सिनेसृष्टीत आज घडीला वर्षाला 700 पेक्षाही जास्त चित्रपट दर वर्षी प्रदर्शित होतात. सिनेमा हे इंग्रजांचे मनोरंजनाचे साधन आणि भारतीयांना काय आवडणार या आशंकेने सुरुवात झालेली भारतीय चित्रपट सृष्टी आज जगातील हॉलिवूड नंतरची 2 नंबरची मोठी चित्रपट सृष्टी बनली आहे. आधी मूकपट, नंतर ब्लॅक अँड व्हाईट आणि नंतर रंगीत असा काळानुसार भारतीय सिनेमापण विकसीत होत गेला. काळानुसार जसा सिनेमा विकसीत होत गेला तशी सिनेमाची कथा/पटकथा देखील विकसीत होत गेली. 1913 पासून 2000 पर्यंत चित्रपटचा मुळ विषय हा साधारण पणे धार्मिक किंवा प्रेम पट किंवा मग देश भक्तीवर आधारित असायचा. 2000 सालापर्यंत अगदी बोटावर मोजण्याएवढेच काही चित्नपट आले असतील ज्यांचे विषय हे पठडीबाज प्रेमपटापेक्षा वेगळे राहिले. जसे कि मदर इंडिया, मिस्टर इंडिया, शोले, बर्निग ट्रेन, डॉन. 
पण 2000 साली आलेल्या लगान या चित्रपटाने भारतीय चित्रपट सृष्टीला एक नवे वळण आणि एक नवीन  उंची मिळवून दिली.  प्रेमाव्यतिरिक इतर विषयावर देखील चित्रपट काढता येतो आणि तो प्रचंड यशस्वी सुद्धा होऊ शकतो हा या चित्नपटाने घालून दिलेला नवा पायंडा. लगान नंतर सत्य घटनेवर आधारित चित्रपटांचा एक नवीन ट्रेंड भारतीय चित्रपट सृष्टीत सुरु  झाला.
कुतूहल हा एक असा मानवी स्वभाव आहे जो आपल्यामध्ये माहित नसलेल्या गोष्टीबद्दल जाणून घेण्याची ओढ निर्माण करतो. लगान नंतर गुरु , बॅण्डीट क्वीन, शूट आऊट अ‍ॅट लोखंडवाला, लक्ष, नो वन किल्ल्ड जेसिका, बाजीराव मस्तानी, रुस्तम, नीरजा, तलवार, गाझी अटॅक, रईस, दंगल असे सत्य घटनेवर अनेक चित्रपट येऊन गेले आणि या पैकी बहुतांश सुपरिहट पण झाले. या पुढे देखील सत्य घटनेवर आधारित चित्रपट येतच राहतील. 
पण गेल्या काही वर्षांपासून  आपण एक नवीन वाद निर्माण झालेला बघितलाय. बर्‍याच प्रेक्षकांच्या मतानुसार हा वाद दिग्दर्शकाने मूळ घटनेत आपल्या सोयीने केलेल्या बदला मुळे होतो. बरेचदा वेळेस दिग्दर्शक/निर्माते असा वाद निर्माण झाला कि ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ असा गोंडस शब्द वापरून वाद मिटवायचा प्रयत्न करतात. सत्य घटनेवर आधारित चित्रपट काढताना त्याचा फार काटेकोर पणे अभ्यास करावा लागतो. कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची पण काळजी घ्यावी लागते. 
पण जेव्हा दिग्दर्शक/निर्माता सिनेमॅटिक लिबर्टीचा वापर करायला लागतो तेव्हा प्रश्न हा निर्माण होतो कि हा वापर नेमका चित्रपट प्रभावी करण्यासाठी आहे कि निव्वळ खोडसाळ पणा करून प्रसिद्धी मिळवण्यासाठी? 
हल्ली प्रदर्शित झालेल्या चित्रपटा तील काही प्रसंग पाहिले तर याचा नेमका अर्थ काय काढायचा हे कळायला भाग नाही. बाजीराव मस्तानी चित्रपटा तील काशी बाई आणि मस्तानी यांनी सोबत नृत्य केलेला दाखवलेला प्रसंग सिनेमॅटिक लिबर्टी म्हणायचं कि खोडसाळपणा? 
दंगल चित्रपटा तील महावीर फोगट यांना सामन्याआधी कोंडून ठेवलेल्या प्रसंगावरून देखील बराच वाद निर्माण झाला होता. 
एअर लिफ्ट मध्ये  परराष्ट्र मंत्रालयाच्या  दाखवलेल्या भूमिकेवरून देखील असाच वाद निर्माण झाला होता.
 काही दिवसाखाली पद्मावती या चित्रपटाच्या  सेटची एका संघटनेने मोडतोड केल्याची बातमी ऐकली होती. या संघटनेच्या म्हणण्यानुसार राणी पद्मावती आणि अल्लाउद्दीन खिल्जी यांच्यावर चित्रित करण्यात आलेला कथित प्रसंग.
 याला सिनेमॅटिक लिबर्टी मानायचा की खोडसाळपणा? 
चित्रपट हे एक मनोरंजनाचं साधन आहे. ती एक कला आहे. कला दाखवताना अर्थार्जनासाठी कला विकावी देखील लागते हे जरी सत्य असले तरी व्यवसाय करताना हेतू शुद्ध ठेवणं हे महत्वाचं आहे. आपण जे दाखवतो त्याचा हेतू जर शुद्ध असेल तर प्रेक्षक देखील त्या कलेला भरभरून दाद देतात. लिबर्टीच्या नावाखाली जर चुकीच्या गोष्टी प्रेक्षकांच्या माथी मारायला लागल्या तर सत्य घटना आणि त्याचा इतिहास या दोन्हीचा पण विपर्यास व्हायला लागतो. एकाद्या खोडसाळ लिबर्टी मुळे कदाचित प्रसिद्धी तर मिळू शकते पण कलेचा दर्जा खालावायला लागतो.
स्वातंत्र्याचीही जबाबदारी घ्यायला हवी!