शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा आजही मला फोन येतात; शिंदेंच्या कॅबिनेट मंत्र्याचा मोठा दावा, महायुतीत खळबळ
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
7
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
8
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
9
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
20
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा

करिअर का अडलं? न फिरवल्यामुळे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 16:39 IST

आपल्या प्रगतीचा घोडा अडू द्यायचा नसेल, तर निरंतर शिक्षणानं आपल्याला आपला कौशल्य संच अर्थात स्किलसेट फिरवत ठेवावा लागेल! ते कसं जमायचं?

ठळक मुद्दे निरंतर शिक्षणानं ेआपल्याला कौशल्य संच फिरवत राहायला हवा तो यामुळेच!

-डॉ. भूषण केळकर

दहावीच्या विद्याथ्र्याना आणि त्यापेक्षाही त्यांच्या पालकांना (माझी त्यांना पूर्ण सहानुभूती!) आता प्रिलिम्सचे वेध लागले असणार. आजचीच बातमी आहे की, बदललेल्या अभ्यासक्रमानुसार सराव करताना उत्तरं कशी लिहावी याचं मार्गदर्शन राज्य सरकार बालभारतीच्या अधिकृत ‘यूटय़ूब’ वाहिनीवर करणार आहे. तशी माहिती त्या चॅनलवरच अपलोड केली जाणार आहे!अजून एक बातमी म्हणजे बिटकॉइन किंवा इथेरियम् वगैरे आभासी चलनाविषयी आपण ऐकतोच. (त्याविषयी याच सदरात आपण काही महिन्यांपूर्वी बोललोय) तर आता भारत सरकार स्वतर्‍च त्या प्रकारची डिजिटल करन्सी म्हणजे ‘डिजिटल नोटा’ बाजारात आणण्यासाठी पावलं उचलत आहे. अजून एक बातमी. परवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक विधान केलंय. ते म्हणतात, ‘ड्रोन्समुळे शेतीचा चेहरामोहरा बदलेल!’ पीकपद्धती, औषधांची फवारणी आणि विशेषतर्‍ जलसिंचनात आमूलाग्र बदल ड्रोन्स करू शकतील हे तर खरंच!अक्षरशर्‍ गेल्या दोन दिवसातील या तीन बातम्या आहेत. तिन्ही वेगळ्या क्षेत्रातल्या; पण आपल्या नेहमीच्या जीवनाशी संबंधित. तीनही बातम्यांमधला समान धागा म्हणजे ‘इंडस्ट्री 4.0’! तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याच देशात सर्वसामान्य जीवनावरही परिणाम होतोय. त्या बदलांना आपण सामोरं जातोय..लहानपणी ती एक गोष्ट तुम्ही ऐकलीय ना? भाकरी का करपली, घोडा का अडला अन् विडा का रंगला नाही या तिन्ही प्रश्नांचं उत्तर एकच. ते म्हणजे ‘न फिरवल्यामुळे!’ ‘चेंज इज द ओन्ली परमनण्ट थिंग’ ही इंग्रजी म्हण उगीच लोकप्रिय झालेली नाही.आधीच्या एका लेखात मी कोडॅक या कंपनीविषयी लिहिलं होतं. जगातले 85 टक्के फोटोपेपर बनवणारी ही कंपनी दिवाळखोरीत गेली ती काळाची ‘डिजिटल’ पावलं न ओळखल्यानं. अशी कित्येक उदाहरणं आपण देऊ शकतो. मर्फी रेडिओ, नोकिया फोन, अ‍ॅम्बेसिडर गाडी इ.नुसतं हेच नाही तर आजच्या लेखात आपण हे समजावून घेऊ की नुसतं वस्तू वा कमोडिटीच्या बाबतीत हे घडतंय असं नाही, तर बिझिनेस मॉडेलसुद्धा बदलत आहेत. आता तर इंडस्ट्री 4.0 मध्ये तो वेग कितीतरी वाढतो आहे.हेच बघा ना-हर्टज, अवीस इ. अमेरिकन गाडय़ा भाडेतत्त्वावर देणार्‍या कंपन्या. पण या कंपन्या उबर या कंपनीपुढे फिक्या पडल्या आहेत!  हजारो/लाखो गाडय़ा ज्यांच्या मालकीच्या आहेत अशा या हर्टज व अवीस या कंपन्या. त्याउलट  उबरकडे एकही गाडी स्वतर्‍च्या मालकीची नाही! पण बिझिनेस कुणाचा जोरात आहे?दुसरं उदाहरण- शेरटॅन, हिन्टन, मॅरिअट वगैरे आलिशान हॉटेल्स.  ज्यांच्या मालकीच्या अनेक मालमत्ता आहेत त्यांना प्रचंड टक्कर देत आह एअर बस. ज्यांच्याकडे एक दहा बाय दहाची खोलीसुद्धा स्वतर्‍ची नाही!हे घडतं आहे ते इंडस्ट्री 4.0 मधल्या अनेकविध तंत्रज्ञानाच्या उपविभागांमुळे! आणि म्हणून आपल्या सर्वानाच हे कळणं आवश्यक ठरतं!भारतात यायला वेळ असला तरी आता पेट्रोल/डिझेलवर चालणार्‍या गाडय़ांचं प्रमाण प्रगत जगात कमी होतंय हे नक्की. हायब्रिड तंत्रज्ञान (बॅटरी/सौरऊर्जा/पेट्रोल) वापरून चालणार्‍या गाडय़ा आणि विशेषतर्‍ बॅटरीवरच्या गाडय़ा यामुळे गाडय़ांचं डिझाइन बदलतंय, विलक्षण वेगानं!आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला सोलर अलायन्स या जगातील 120 हून अधिक देशांच्या समूहाचं नेतृत्व मिळवून दिलं. या सौरऊज्रेवर जर गाडय़ांमधल्या बॅटर्‍या चार्ज करू लागलो तर नुसतंच प्रदूषण कमी होईल असं नाही, पण भारताचं मध्यपूव्रेवरील असणार इंधनासाठीचं अवलंबित्व आणि तद्नुषंगिक परकीय चलनाचा खर्च संपेल! त्यासाठी जसं सौरऊर्जा व नॅनो तंत्रज्ञान लागेल तसंच त्यासाठी इंडस्ट्री 4.0चे अनेक उपघटकसुद्धा लागतील.वाचकहो, ज्ञानग्रहणाचा विडा रंगायचा असेल, नोकरीची भाकरी करपायची नसेल, प्रगतीचा घोडा अडू द्यायचा नसेल, तर निरंतर शिक्षणानं ेआपल्याला कौशल्य संच फिरवत राहायला हवा तो यामुळेच!( लेखक आयटी तज्ज्ञ आहेत.).