शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

करिअर का अडलं? न फिरवल्यामुळे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 16:39 IST

आपल्या प्रगतीचा घोडा अडू द्यायचा नसेल, तर निरंतर शिक्षणानं आपल्याला आपला कौशल्य संच अर्थात स्किलसेट फिरवत ठेवावा लागेल! ते कसं जमायचं?

ठळक मुद्दे निरंतर शिक्षणानं ेआपल्याला कौशल्य संच फिरवत राहायला हवा तो यामुळेच!

-डॉ. भूषण केळकर

दहावीच्या विद्याथ्र्याना आणि त्यापेक्षाही त्यांच्या पालकांना (माझी त्यांना पूर्ण सहानुभूती!) आता प्रिलिम्सचे वेध लागले असणार. आजचीच बातमी आहे की, बदललेल्या अभ्यासक्रमानुसार सराव करताना उत्तरं कशी लिहावी याचं मार्गदर्शन राज्य सरकार बालभारतीच्या अधिकृत ‘यूटय़ूब’ वाहिनीवर करणार आहे. तशी माहिती त्या चॅनलवरच अपलोड केली जाणार आहे!अजून एक बातमी म्हणजे बिटकॉइन किंवा इथेरियम् वगैरे आभासी चलनाविषयी आपण ऐकतोच. (त्याविषयी याच सदरात आपण काही महिन्यांपूर्वी बोललोय) तर आता भारत सरकार स्वतर्‍च त्या प्रकारची डिजिटल करन्सी म्हणजे ‘डिजिटल नोटा’ बाजारात आणण्यासाठी पावलं उचलत आहे. अजून एक बातमी. परवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक विधान केलंय. ते म्हणतात, ‘ड्रोन्समुळे शेतीचा चेहरामोहरा बदलेल!’ पीकपद्धती, औषधांची फवारणी आणि विशेषतर्‍ जलसिंचनात आमूलाग्र बदल ड्रोन्स करू शकतील हे तर खरंच!अक्षरशर्‍ गेल्या दोन दिवसातील या तीन बातम्या आहेत. तिन्ही वेगळ्या क्षेत्रातल्या; पण आपल्या नेहमीच्या जीवनाशी संबंधित. तीनही बातम्यांमधला समान धागा म्हणजे ‘इंडस्ट्री 4.0’! तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याच देशात सर्वसामान्य जीवनावरही परिणाम होतोय. त्या बदलांना आपण सामोरं जातोय..लहानपणी ती एक गोष्ट तुम्ही ऐकलीय ना? भाकरी का करपली, घोडा का अडला अन् विडा का रंगला नाही या तिन्ही प्रश्नांचं उत्तर एकच. ते म्हणजे ‘न फिरवल्यामुळे!’ ‘चेंज इज द ओन्ली परमनण्ट थिंग’ ही इंग्रजी म्हण उगीच लोकप्रिय झालेली नाही.आधीच्या एका लेखात मी कोडॅक या कंपनीविषयी लिहिलं होतं. जगातले 85 टक्के फोटोपेपर बनवणारी ही कंपनी दिवाळखोरीत गेली ती काळाची ‘डिजिटल’ पावलं न ओळखल्यानं. अशी कित्येक उदाहरणं आपण देऊ शकतो. मर्फी रेडिओ, नोकिया फोन, अ‍ॅम्बेसिडर गाडी इ.नुसतं हेच नाही तर आजच्या लेखात आपण हे समजावून घेऊ की नुसतं वस्तू वा कमोडिटीच्या बाबतीत हे घडतंय असं नाही, तर बिझिनेस मॉडेलसुद्धा बदलत आहेत. आता तर इंडस्ट्री 4.0 मध्ये तो वेग कितीतरी वाढतो आहे.हेच बघा ना-हर्टज, अवीस इ. अमेरिकन गाडय़ा भाडेतत्त्वावर देणार्‍या कंपन्या. पण या कंपन्या उबर या कंपनीपुढे फिक्या पडल्या आहेत!  हजारो/लाखो गाडय़ा ज्यांच्या मालकीच्या आहेत अशा या हर्टज व अवीस या कंपन्या. त्याउलट  उबरकडे एकही गाडी स्वतर्‍च्या मालकीची नाही! पण बिझिनेस कुणाचा जोरात आहे?दुसरं उदाहरण- शेरटॅन, हिन्टन, मॅरिअट वगैरे आलिशान हॉटेल्स.  ज्यांच्या मालकीच्या अनेक मालमत्ता आहेत त्यांना प्रचंड टक्कर देत आह एअर बस. ज्यांच्याकडे एक दहा बाय दहाची खोलीसुद्धा स्वतर्‍ची नाही!हे घडतं आहे ते इंडस्ट्री 4.0 मधल्या अनेकविध तंत्रज्ञानाच्या उपविभागांमुळे! आणि म्हणून आपल्या सर्वानाच हे कळणं आवश्यक ठरतं!भारतात यायला वेळ असला तरी आता पेट्रोल/डिझेलवर चालणार्‍या गाडय़ांचं प्रमाण प्रगत जगात कमी होतंय हे नक्की. हायब्रिड तंत्रज्ञान (बॅटरी/सौरऊर्जा/पेट्रोल) वापरून चालणार्‍या गाडय़ा आणि विशेषतर्‍ बॅटरीवरच्या गाडय़ा यामुळे गाडय़ांचं डिझाइन बदलतंय, विलक्षण वेगानं!आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला सोलर अलायन्स या जगातील 120 हून अधिक देशांच्या समूहाचं नेतृत्व मिळवून दिलं. या सौरऊज्रेवर जर गाडय़ांमधल्या बॅटर्‍या चार्ज करू लागलो तर नुसतंच प्रदूषण कमी होईल असं नाही, पण भारताचं मध्यपूव्रेवरील असणार इंधनासाठीचं अवलंबित्व आणि तद्नुषंगिक परकीय चलनाचा खर्च संपेल! त्यासाठी जसं सौरऊर्जा व नॅनो तंत्रज्ञान लागेल तसंच त्यासाठी इंडस्ट्री 4.0चे अनेक उपघटकसुद्धा लागतील.वाचकहो, ज्ञानग्रहणाचा विडा रंगायचा असेल, नोकरीची भाकरी करपायची नसेल, प्रगतीचा घोडा अडू द्यायचा नसेल, तर निरंतर शिक्षणानं ेआपल्याला कौशल्य संच फिरवत राहायला हवा तो यामुळेच!( लेखक आयटी तज्ज्ञ आहेत.).