शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

करिअर का अडलं? न फिरवल्यामुळे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 16:39 IST

आपल्या प्रगतीचा घोडा अडू द्यायचा नसेल, तर निरंतर शिक्षणानं आपल्याला आपला कौशल्य संच अर्थात स्किलसेट फिरवत ठेवावा लागेल! ते कसं जमायचं?

ठळक मुद्दे निरंतर शिक्षणानं ेआपल्याला कौशल्य संच फिरवत राहायला हवा तो यामुळेच!

-डॉ. भूषण केळकर

दहावीच्या विद्याथ्र्याना आणि त्यापेक्षाही त्यांच्या पालकांना (माझी त्यांना पूर्ण सहानुभूती!) आता प्रिलिम्सचे वेध लागले असणार. आजचीच बातमी आहे की, बदललेल्या अभ्यासक्रमानुसार सराव करताना उत्तरं कशी लिहावी याचं मार्गदर्शन राज्य सरकार बालभारतीच्या अधिकृत ‘यूटय़ूब’ वाहिनीवर करणार आहे. तशी माहिती त्या चॅनलवरच अपलोड केली जाणार आहे!अजून एक बातमी म्हणजे बिटकॉइन किंवा इथेरियम् वगैरे आभासी चलनाविषयी आपण ऐकतोच. (त्याविषयी याच सदरात आपण काही महिन्यांपूर्वी बोललोय) तर आता भारत सरकार स्वतर्‍च त्या प्रकारची डिजिटल करन्सी म्हणजे ‘डिजिटल नोटा’ बाजारात आणण्यासाठी पावलं उचलत आहे. अजून एक बातमी. परवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक विधान केलंय. ते म्हणतात, ‘ड्रोन्समुळे शेतीचा चेहरामोहरा बदलेल!’ पीकपद्धती, औषधांची फवारणी आणि विशेषतर्‍ जलसिंचनात आमूलाग्र बदल ड्रोन्स करू शकतील हे तर खरंच!अक्षरशर्‍ गेल्या दोन दिवसातील या तीन बातम्या आहेत. तिन्ही वेगळ्या क्षेत्रातल्या; पण आपल्या नेहमीच्या जीवनाशी संबंधित. तीनही बातम्यांमधला समान धागा म्हणजे ‘इंडस्ट्री 4.0’! तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याच देशात सर्वसामान्य जीवनावरही परिणाम होतोय. त्या बदलांना आपण सामोरं जातोय..लहानपणी ती एक गोष्ट तुम्ही ऐकलीय ना? भाकरी का करपली, घोडा का अडला अन् विडा का रंगला नाही या तिन्ही प्रश्नांचं उत्तर एकच. ते म्हणजे ‘न फिरवल्यामुळे!’ ‘चेंज इज द ओन्ली परमनण्ट थिंग’ ही इंग्रजी म्हण उगीच लोकप्रिय झालेली नाही.आधीच्या एका लेखात मी कोडॅक या कंपनीविषयी लिहिलं होतं. जगातले 85 टक्के फोटोपेपर बनवणारी ही कंपनी दिवाळखोरीत गेली ती काळाची ‘डिजिटल’ पावलं न ओळखल्यानं. अशी कित्येक उदाहरणं आपण देऊ शकतो. मर्फी रेडिओ, नोकिया फोन, अ‍ॅम्बेसिडर गाडी इ.नुसतं हेच नाही तर आजच्या लेखात आपण हे समजावून घेऊ की नुसतं वस्तू वा कमोडिटीच्या बाबतीत हे घडतंय असं नाही, तर बिझिनेस मॉडेलसुद्धा बदलत आहेत. आता तर इंडस्ट्री 4.0 मध्ये तो वेग कितीतरी वाढतो आहे.हेच बघा ना-हर्टज, अवीस इ. अमेरिकन गाडय़ा भाडेतत्त्वावर देणार्‍या कंपन्या. पण या कंपन्या उबर या कंपनीपुढे फिक्या पडल्या आहेत!  हजारो/लाखो गाडय़ा ज्यांच्या मालकीच्या आहेत अशा या हर्टज व अवीस या कंपन्या. त्याउलट  उबरकडे एकही गाडी स्वतर्‍च्या मालकीची नाही! पण बिझिनेस कुणाचा जोरात आहे?दुसरं उदाहरण- शेरटॅन, हिन्टन, मॅरिअट वगैरे आलिशान हॉटेल्स.  ज्यांच्या मालकीच्या अनेक मालमत्ता आहेत त्यांना प्रचंड टक्कर देत आह एअर बस. ज्यांच्याकडे एक दहा बाय दहाची खोलीसुद्धा स्वतर्‍ची नाही!हे घडतं आहे ते इंडस्ट्री 4.0 मधल्या अनेकविध तंत्रज्ञानाच्या उपविभागांमुळे! आणि म्हणून आपल्या सर्वानाच हे कळणं आवश्यक ठरतं!भारतात यायला वेळ असला तरी आता पेट्रोल/डिझेलवर चालणार्‍या गाडय़ांचं प्रमाण प्रगत जगात कमी होतंय हे नक्की. हायब्रिड तंत्रज्ञान (बॅटरी/सौरऊर्जा/पेट्रोल) वापरून चालणार्‍या गाडय़ा आणि विशेषतर्‍ बॅटरीवरच्या गाडय़ा यामुळे गाडय़ांचं डिझाइन बदलतंय, विलक्षण वेगानं!आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला सोलर अलायन्स या जगातील 120 हून अधिक देशांच्या समूहाचं नेतृत्व मिळवून दिलं. या सौरऊज्रेवर जर गाडय़ांमधल्या बॅटर्‍या चार्ज करू लागलो तर नुसतंच प्रदूषण कमी होईल असं नाही, पण भारताचं मध्यपूव्रेवरील असणार इंधनासाठीचं अवलंबित्व आणि तद्नुषंगिक परकीय चलनाचा खर्च संपेल! त्यासाठी जसं सौरऊर्जा व नॅनो तंत्रज्ञान लागेल तसंच त्यासाठी इंडस्ट्री 4.0चे अनेक उपघटकसुद्धा लागतील.वाचकहो, ज्ञानग्रहणाचा विडा रंगायचा असेल, नोकरीची भाकरी करपायची नसेल, प्रगतीचा घोडा अडू द्यायचा नसेल, तर निरंतर शिक्षणानं ेआपल्याला कौशल्य संच फिरवत राहायला हवा तो यामुळेच!( लेखक आयटी तज्ज्ञ आहेत.).