शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

मनातलं बोलावं असं कुणीच नाही आयुष्यात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 07:10 IST

स्वत:च्याच ट्रॅपमधून मोकळं होण्याची सुरुवात.

ठळक मुद्दे मनातलं बोलता येत नाही, बोलत नाही, म्हणून आपण स्वतर्‍लाच खात राहतो, कुढत राहतो. हे कुढणं बंद होईल.

प्राची  पाठक 

आपण बोलतो, भरमसाठ गप्पा मारतो; पण म्हणजे नेमकं  काय करतो, हे कोणालाच नीट सांगता येत नाही. त्यातल्या किती गोष्टी आपण वरवरच्या बोलत असतो? नुसतंच काहीतरी बोलायचं म्हणून किती बोलतो? वेळ मारून न्यायला किती बोलतो? आपल्या मनात चालणार्‍या अनेक गोष्टींचा कसलाही थांगपत्ता लागू न देता इतर अनेक सतराशेसाठ गोष्टींवर बोलायचं स्किल अनेकांनी आत्मसात केलेलं असतं. कुणी घरीदारी जेवढय़ास तेवढं बोलणं पसंत करतात. कारण बोलणं म्हणजे त्यापलीकडे काही असतं, हे त्यांना माहीतच नसतं.नुसत्याच हवापाण्याच्या गप्पा मारणं म्हणजेही बोलणं नाही. त्यात मनातल्या अडीअडचणींचं शेअरिंग असतं का, हा मूळ मुद्दा आहे. तिशीर्पयतचा काळ हा अनेक मानसिक समस्यांनी डोकं वर काढायचा काळ असतो. याच काळात आपल्याला काहीच न बोलायची किंवा सोयीस्कर गप्प बसायची अथवा सहन करायची सवय लागते. आजूबाजूला प्रचंड स्पर्धा असते. आयुष्यात काहीतरी करून दाखवायचा ताण आपल्यावर असतो. या ताणामुळेदेखील कित्येकदा मनातलं बोलणं टाळलं जातं. मग परिस्थिती आणखी चिघळत जाते. आजूबाजूला अनेक लोक आहेत. फोनमध्ये स्टोअर केलेले कॉन्टॅक्टस ओसंडून वाहत आहेत. चॅट्सचे स्क्र ोल वाढत चालले आहेत, तरीही मनातलं बोलायला आणि ते शांतपणे ऐकून घ्यायला कोणी नाही ! ऐकून घेतलं तरी त्यावर शिक्के न मारणारे लोक दुर्मीळ. मनातलं न बोलण्यामागे हीच खरी भीती असते की आपल्या बोलण्याचा कोण कसा अर्थ लावेल?दुसर्‍याशी संवाद साधायची गाडी रु ळावरून घसरायला लागते ती इथे. 

* काय करता येईल? आपल्याला समजून घेईल असा एकतरी कान शोधणं, ही आपली खरी परीक्षा असते ! त्या परीक्षेला आपल्याला आधी बसावं लागेल. आपल्याला नेमकं काय जाचतं आहे, ते दुसर्‍यावर न थोपवता नीट सांगता येणं ही एक कला आहे. आधी थोडं अवघड जाईल; पण नक्की जमेल. मात्र दुसर्‍याकडून आपल्या आयुष्यातल्या प्रश्नांवर चटचट रेडिमेड उत्तरं मिळतील, असं गृहीत न धरता बोलायची सवय करावी लागेल आणि लगेच लोकं आपल्याशी बोलायला लागतील हा समजही बाजूला ठेवावा लागेल. मनातलं बोलायचा सराव करावा लागतो आणि त्याचीही सवय व्हावी लागते, हे आपल्याला हळूहळू समजेल. 

* त्याने काय होईल?1- आपल्या भावभावना समजून घेणारी हक्काची मंडळी आपल्या आसपासच दिसू लागतील. आपण एकटे पडणार नाही. 2- मनातलं बोलता येत नाही, बोलत नाही, म्हणून आपण स्वतर्‍लाच खात राहतो, कुढत राहतो. हे कुढणं बंद होईल.4- मोकळं झाल्यामुळे अंगावरचं ओझं एकदम उतरल्यासारखं वाटेल आणि मन प्रफुल्लित होईल.5- नवनवीन गोष्टी करून पाहण्याची, इतरांकडून शिकण्याची संधी उपलब्ध होईल.7- विश्वास ठेवण्याजोग्या अनेक व्यक्ती आजूबाजूला आहेत हे कळेल.