शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

भला, उसकी लाइफ मेरी लाइफ से बेहतर कैसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 07:05 IST

तुमचं छान, आमचंही छान. इतरांबरोबर तुलना करण्याच्या भावनेचा फैसला

ठळक मुद्दे इतरांच्या आयुष्यात आपण भिंग लावून बसायची गरज नाही.

प्राची  पाठक

‘तो बघ किती पुढे गेलाय’. ‘ती बघ कसं मस्त करिअर करतेय’.‘त्याला मिळाली बाबा तिकडे अ‍ॅडमिशन, तूच राहून गेलास’. ‘तिने पटकावलाच तो जॉब’. ‘त्यांची लग्नं होऊन जातील, तुम्ही बसा इथेच’.अशा तुलनात्मक गोष्टींची सुरु वात आपल्या घरातल्याच लोकांनी केलेली असते. कधी कळत, कधी नकळत. अगदी शिक्षकसुद्धा सहजच कोणाची कोणाशी तुलना करून जातात. मग आपल्याला वाटायला लागतं, यार, यांचं तर सगळंच झकास आहे. कसं बुवा यांचं कायमच लकी असतं सगळं? आपल्याला वाटायला लागतं, ते आपल्यापेक्षा भारी आहेत आणि आपण मात्न एकदम कंडम ! आपण ज्यांना अगदी जवळचे समजतो, तेच काहीवेळा आपल्याला अगदी टोकाचे बोलून जातात. तेदेखील दुसर्‍याचे काहीतरी दाखवत ! दुसरीकडे आपल्या आतसुद्धा कळत-नकळत तुलना करण्याचा मोह, लोचा झालेला असतोच. त्यात सर्वात जास्त त्नासदायक असतं, ते दुसर्‍याचे चटचट बदलणारे लै भारी डीपी बघत राहणं. त्यांचे रोजरोज पडणारे स्टेट्स शांतपणे पाहत राहणं. त्यांच्या सोशल मीडियावरच्या पोस्ट्समधला आनंद पचवत राहणं. मनात अनेक शंका येतात. हे काय करत असतील? कुठून त्यांना पैसे मिळत असतील? इतके भारी कसे काय कायमच राहत असतील?  या प्रश्नांची उत्तरं आपल्याला ताबडतोब हवी असतात. कधी कधी तर ती उत्तरं आपल्याला पाहिजे तशीच हवी असतात.  तिथेही आपण समोरच्या विषयीचा माझा अंदाज कसा बरोब्बर ठरला, या आपल्याच इगोला कुरवाळायची एक संधी शोधत असतो. 

* काय करता येईल?

लोकांचं छान, मस्त मजेत चाललं आहे आणि आपणच कसे एकदम कंडम, आपल्या आयुष्यात काहीच चांगलं, मनासारखं घडत नाही, या भावनांना आपण आधी आपल्या आयुष्यातून बाजूला सारू या. या सर्व भावनांना एकदाच काय ते बजावून टाकू, की तुम्ही निघा आता आमच्या मर्गातून.एक लक्षात ठेवायला हवं. आपले दुसर्‍या विषयीचे अंदाज, त्यांच्याकडून आपल्या गॅजेट्समध्ये नकळत येऊन पडणारी माहिती, यावर आपलं आयुष्य तरून जाणार नाहीये. इतरांच्या आयुष्यात आपण भिंग लावून बसायची गरज नाही. आपण आपल्याच झोळीत जरा डोकावून बघू. आपलं काय सुरू आहे, त्यावर जास्तीत जास्त फोकस ठेवायचा सराव नव्याने करायला शिकू. काय? 

* त्याने काय होईल?1- इतर काय करताहेत, त्यांचं कसं छान चाललंय, यापेक्षा आपण काय करतोय आणि आपल्याला काय करायचंय, यावर फोकस करता येईल.2- आपल्या जमेच्या आणि वजाबाकीच्या गोष्टी कळतील आणि त्यावर काम करणं सोपं जाईल.3- नकारात्मक दृष्टिकोन दूर होऊन पॉझिटिव्हली पाहायला शिकता येईल. 4- दुसर्‍यांकडे पाहून त्यावर आपलं आयुष्य बेतण्याची घातक सवय मोडेल.