शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
3
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
4
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
5
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
6
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
7
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
8
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
9
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
10
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
11
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
14
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
15
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
16
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
17
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
18
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
19
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
20
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 

घरात बसा ऑनलाइन दिसा ! ऑनलाइन असण्याचा ताण छळतो आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 14:41 IST

लॉकडाऊनच्या या काळात तुमचा ताण, मित्रमैत्रिणींशी भांडण वाढलं आहे का?

नितांत महाजन

लॉकडाऊन की अनलॉक? बाहेर जायला परवानगी आहे की नाही? जायचं तर केव्हा? कॉलेज तर बंदच. त्यामुळे यंदा कॉलेजात जाऊन कुणी मित्रमैत्रिणी भेटणंही शक्यच नाही. तो/ती स्पेशल भेटणंही अशक्यच. कुणाच्या घरीही जाता येत नाही.कुठं बाहेर, चौकात, घराच्या खाली भेटावं तर तेही थोडाच वेळ, लांब लांब उभं राहून. घरचे बाहेर जाऊ नको म्हणतात. बाहेर गेलं आणि गप्पा मारत राहिलंच उभं तर पोलीसकाका रागवण्याचं भय.एकूण काय दोस्तीत पार व्हिलन बनला आहे हा कोरोना. आता तीन महिने होऊन गेले, तेच सुरूआहे. घरात बसा आणि ऑनलाइन दिसा.पण ऑनलाइन दिसलं की दिसलं की हल्ली भांडणंही सुरूहोत आहेत. ‘इज कोविड चेंजिंग अवर रिलेशनशिप’ याविषयावर अनेकजण अभ्यास करत आहेत. गुगलून पाहत आहेत. तोडगे शोधत आहेत.काहीजणांचं तर म्हणणं आहे की अनेकांच्या मानसिक स्वास्थ्यावर त्याचा परिणाम होत आहे.आणि त्यातून आधीच ताणाचं झालेलं आयुष्य अधिकच तापाचं झालेलं आहे.त्यामुळे ऑनलाइन असणं, दिसणं, बोलणं, न बोलणं, जास्त कमी बोलणं, सोशल मीडियातलं शेअरिंग, कमेण्ट, पोस्ट, फोटो, टाइमपास यातूनही काही तरुण जोडप्यांमध्ये मनमुटाव आणि गैरसमज होत आहेत. हा जास्तीचा ताण लॉकडाऊनच्या काळात कशामुळे वाढतो याची ही एक सोपी यादी.

1) अनेकजण तासन्तास ऑनलाइन असतात, गेम खेळतात, व्हॉट्सअॅप चॅट करतात; पण कुणाला फोन करायला त्यांना वेळ नसतो. खरं तर अनेकजण ते मुद्दाम टाळतात असं नाही; पण तेच ते फोनवर बोलून, एकाच एका माणसाशी बोलूनही काहींना बोअर व्हायला लागलेलं आहे. म्हणून ते फोनकॉल टाळतात, आवश्यक तेवढंच बोलतात. पण त्यामुळे बाकीच्यांचे त्यांच्याविषयी गैरसमज होऊ लागतात.2) काहीजण फोनच उचलत नाहीत. ते बिझी असतात असं नाही; पण त्यांना बोलणंच बोअर झालं आहे, आणि ते शांतपणो त्यांचं काहीतरी करत असू शकतात असं बाकीच्यांना पटत नाही. कामच नाही तर ऑनलाइत तरी दिस असे आग्रह होतात, तेही काहींना कंटाळवाणो वाटू शकतात.3) मोबाइल डेटा मारला की संपतो अशीही अनेकांची तक्रार आहे कारण काहीच काम नसल्याने बरेच जण फक्त डेटा जाळतात, आणि काहीबाही पाहत बसतात.4) अनेकांचा असाही समज आहे की, सध्या जगभरात लोकांना वेळ आहे तर आपण फोन केला किंवा मेसेज केला तर तो बाकीच्यांनी त्वरित उचलायला हवा. फोन अॅन्सर होत नाही, हे काहींना ताणाचं कारण वाटतं आहे.5) मुलींची विशेषत: अपेक्षा असते की जरा रोमॅण्टिक गप्पा त्यानं मारल्या तर बरं; पण त्याला काही सुचत नाही, तेव्हाही भांडण अटळ.6) कॉल वेटिंगवर असणं, तो तासन्तास वेटिंगवर असणं हे अनेकांच्या भांडणाचं मूळ असू शकतं.7) व्हॉट्सअॅपवरचा मॅसेज पाहिल्याच्या निळ्या खुणा दिसतात; पण रिप्लाय येत नाही, यानंही अनेकांचं डोकं फिरतं.8) आपलं सगळं जगणं एका फोनशीच जोडून घेण्याचा त्रस आणि ताणही अनेकांना जाणवतो आहे.