शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
4
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
5
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
6
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
7
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
8
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
9
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
10
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
11
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
12
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
13
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
14
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
15
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
16
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
17
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
18
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
19
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
20
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर

घरात बसा ऑनलाइन दिसा ! ऑनलाइन असण्याचा ताण छळतो आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 14:41 IST

लॉकडाऊनच्या या काळात तुमचा ताण, मित्रमैत्रिणींशी भांडण वाढलं आहे का?

नितांत महाजन

लॉकडाऊन की अनलॉक? बाहेर जायला परवानगी आहे की नाही? जायचं तर केव्हा? कॉलेज तर बंदच. त्यामुळे यंदा कॉलेजात जाऊन कुणी मित्रमैत्रिणी भेटणंही शक्यच नाही. तो/ती स्पेशल भेटणंही अशक्यच. कुणाच्या घरीही जाता येत नाही.कुठं बाहेर, चौकात, घराच्या खाली भेटावं तर तेही थोडाच वेळ, लांब लांब उभं राहून. घरचे बाहेर जाऊ नको म्हणतात. बाहेर गेलं आणि गप्पा मारत राहिलंच उभं तर पोलीसकाका रागवण्याचं भय.एकूण काय दोस्तीत पार व्हिलन बनला आहे हा कोरोना. आता तीन महिने होऊन गेले, तेच सुरूआहे. घरात बसा आणि ऑनलाइन दिसा.पण ऑनलाइन दिसलं की दिसलं की हल्ली भांडणंही सुरूहोत आहेत. ‘इज कोविड चेंजिंग अवर रिलेशनशिप’ याविषयावर अनेकजण अभ्यास करत आहेत. गुगलून पाहत आहेत. तोडगे शोधत आहेत.काहीजणांचं तर म्हणणं आहे की अनेकांच्या मानसिक स्वास्थ्यावर त्याचा परिणाम होत आहे.आणि त्यातून आधीच ताणाचं झालेलं आयुष्य अधिकच तापाचं झालेलं आहे.त्यामुळे ऑनलाइन असणं, दिसणं, बोलणं, न बोलणं, जास्त कमी बोलणं, सोशल मीडियातलं शेअरिंग, कमेण्ट, पोस्ट, फोटो, टाइमपास यातूनही काही तरुण जोडप्यांमध्ये मनमुटाव आणि गैरसमज होत आहेत. हा जास्तीचा ताण लॉकडाऊनच्या काळात कशामुळे वाढतो याची ही एक सोपी यादी.

1) अनेकजण तासन्तास ऑनलाइन असतात, गेम खेळतात, व्हॉट्सअॅप चॅट करतात; पण कुणाला फोन करायला त्यांना वेळ नसतो. खरं तर अनेकजण ते मुद्दाम टाळतात असं नाही; पण तेच ते फोनवर बोलून, एकाच एका माणसाशी बोलूनही काहींना बोअर व्हायला लागलेलं आहे. म्हणून ते फोनकॉल टाळतात, आवश्यक तेवढंच बोलतात. पण त्यामुळे बाकीच्यांचे त्यांच्याविषयी गैरसमज होऊ लागतात.2) काहीजण फोनच उचलत नाहीत. ते बिझी असतात असं नाही; पण त्यांना बोलणंच बोअर झालं आहे, आणि ते शांतपणो त्यांचं काहीतरी करत असू शकतात असं बाकीच्यांना पटत नाही. कामच नाही तर ऑनलाइत तरी दिस असे आग्रह होतात, तेही काहींना कंटाळवाणो वाटू शकतात.3) मोबाइल डेटा मारला की संपतो अशीही अनेकांची तक्रार आहे कारण काहीच काम नसल्याने बरेच जण फक्त डेटा जाळतात, आणि काहीबाही पाहत बसतात.4) अनेकांचा असाही समज आहे की, सध्या जगभरात लोकांना वेळ आहे तर आपण फोन केला किंवा मेसेज केला तर तो बाकीच्यांनी त्वरित उचलायला हवा. फोन अॅन्सर होत नाही, हे काहींना ताणाचं कारण वाटतं आहे.5) मुलींची विशेषत: अपेक्षा असते की जरा रोमॅण्टिक गप्पा त्यानं मारल्या तर बरं; पण त्याला काही सुचत नाही, तेव्हाही भांडण अटळ.6) कॉल वेटिंगवर असणं, तो तासन्तास वेटिंगवर असणं हे अनेकांच्या भांडणाचं मूळ असू शकतं.7) व्हॉट्सअॅपवरचा मॅसेज पाहिल्याच्या निळ्या खुणा दिसतात; पण रिप्लाय येत नाही, यानंही अनेकांचं डोकं फिरतं.8) आपलं सगळं जगणं एका फोनशीच जोडून घेण्याचा त्रस आणि ताणही अनेकांना जाणवतो आहे.