शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

स्वच्छता मित्र व्हा

By admin | Updated: September 25, 2014 17:12 IST

पुण्यातील जनवाणी संस्थेचा शून्य कचरा उपक्रम, हेच तर सांगतोय !

पर्यावरणासाठी काम करायचं म्हणजे नक्की काय आणि कसं करावं हे समजत नाही.  जनवाणी या स्वयंसेवी संस्थेने मात्र अशी काम करण्याची तयारी असणार्‍या तरुण मित्रमैत्रिणींना घेऊन काही काम सुरू केलं आहे.
 शहरातील कचर्‍याचा गंभीर होत चाललेला प्रश्न, वाढते प्रदूषण, वाहतुकीची कोंडी, वाढत्या शहरीकरणामुळे निर्माण होणार्‍या अनेक समस्या. याच प्रश्नांवर अभ्यासपूर्ण तोडगा देण्याचे काम जनवाणी गेल्या आठ वर्षांपासून करत आहे. पर्यावरण, ट्राफिक-ट्रान्सपोर्ट, हेरिटेज, एनर्जी, अर्बन प्लानिंग आणि गव्हर्नस यांसारख्या महत्त्वाच्या आणि निकडीच्या समस्यांवर जनवाणी काम करते.
 शहरातील कचरा समस्येवर तात्पुरत्या स्वरूपाचा तोडगा न काढता कायमस्वरूपी उत्तर शोधण्यासाठी व  पर्यावरण वाचवण्यासाठी जनवाणी संस्थेने शून्य कचरा प्रकल्प नावाचा प्रकल्प हाती घेतला. कात्रज प्रभागात हे मॉडेल यशस्वी झाल्यानंतर सध्या पुणे महानगरपालिकेसोबत हा प्रकल्प शहरातील वीस प्रभागात सुरू आहे.  
आता तुम्ही म्हणाल की हे काय नवीन? कचरा तर निर्माण होणारच, मग ‘शून्य कचरा’ म्हणजे आपण वस्तू वापरणंच बंद करायचं का? नाही, तर आपण तयार केलेला कचरा आपणच जिरवायचा. त्यासाठी ओला व सुका कचर्‍याचे वर्गीकरण करायचे, ओल्या कचर्‍यापासून बायोगॅस निर्मिती, खत तयार करायचे तर सुक्या कचर्‍याची विक्री करून त्याचे रिसायकलिंग करायचे. अशाप्रकारे आपल्या प्रभागातील कचरा आपल्या परिसरातच जिरवायचा 
अर्थात ‘जनवाणी’साठी हे काम उभारणे सोपे नव्हते. लोकांचा दृष्टिकोन आणि मानसिकता बदलणे हे अवघड काम आहे. यासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांमध्ये तरुणांची मोठी साथ मिळाली. आयटी हब असलेल्या पुण्यातील विविध कॉपोर्रेट सीएसआर खाली मदतीला आले. या कंपन्यांमध्ये काम करणार्‍या तरुणांनी स्वच्छता मित्र, पथनाट्य, सोशल मीडिया या माध्यमातून काम करण्यास सुरूवात केली.  
स्वच्छतामित्र तरूण आपापल्या भागात जागृतीचे काम करू लागले. ‘स्वच्छतामित्र’ म्हणजे काय तर तुम्ही ज्या भागात राहता त्या भागात कचरावेचक वेळेवर  येतात का, परिसरातील नागरिक कचरा वर्गीकरण करून देतात का या गोष्टींवर लक्ष ठेवणारा स्वयंसेवक. जर कचरा खूप साठला असेल तर फोन करून त्याची माहिती देणे, वेळो-वेळी आपल्या परिसरात कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती करणे, त्यासाठी विविध उपक्रम राबविणे हे काम ‘स्वच्छतामित्र’ करत असतो. पर्यावरणाबाबत लोकांना अधिक जागृत करण्यासाठी पथनाट्याच्या माध्यमातून ही टीम काम करत असते. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची थिअटरची पार्श्‍वभूमी नसतानाही अत्यंत सुंदर अशा प्रकारचे पथनाट्याचे सादरीकरण या टीमकडून केले जाते. 
कॉलेजलाईफ मस्त एन्जॉय करायचं सोडून एवढा सगळा खटाटोप कशासाठी, ही तर सरकारची जबाबदारी आहे..असा विचार न करता तुम्ही अगदी तुमच्या कॉलेजमध्येही काम करू शकता, स्वच्छ आणि ‘शून्य कचरा कॉलेज’सारखे प्रकल्प राबवू शकता. तुम्हाला मदत हवी असेल तर ‘जनवाणी’ची   www.janwani.org ही वेबसाईट जरूर पहा.
- प्राजक्ता ढेकळे