शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

मुळात तुम्हाला एमबीए करायची गरजच काय?

By admin | Updated: May 28, 2015 14:59 IST

एमबीए ही एक अत्यंत ‘बेसिक’ डिग्री आहे. तिच्यावर करिअरचे इमले बांधले जाऊ शकत नाहीत!एमबीए करू का?

कुणी म्हणतं एमबीए कर, त्यातून झटपट करिअरला लिफ्ट मिळेल, कुणी म्हणतं एमबीए करू नकोस, त्याची किंमत आता बीए एवढीच! एमबीए करूनही काही उपयोग नाही?

मी नक्की करू काय? एमबीए करू की नकोच?
 
 आयआयएम-अहमदाबाद नावाच्या अत्यंत प्रतिष्ठित संस्थेत जर तुम्हाला अॅडमिशन मिळत असेल, तर मी एमबीए करू का, हा प्रश्नच निकालात निघतो.
पण ज्यांना अशा बडय़ा दर्जेदार संस्थेत अॅडमिशन मिळत नाही, ज्यांची बौद्धिक कामगिरीही जेमतेम आहे, बाकी काहीच दिसत नाही म्हणून मग कुठल्याही ‘डी’ग्रेड कॉलेजात एमबीएला प्रवेश घ्यावा का? -तर नाही. तिथं एमबीए करून काहीच उपयोग नाही आणि काहीच जमलं नाही म्हणून एमबीए करावं, असं तर अजिबात नाही.
पण, त्यातल्या त्यात जी मुलं हुशार आहेत, पण आयआयएम दर्जाची नाहीत त्यांनी काय करावं?
त्यांनी एमबीए करताना किमान एवढं तरी लक्षात ठेवलं पाहिजे की, त्या कॉलेजने तुम्हाला तुमच्या पोटेन्शियल एम्प्लॉयर्सना तरी भेटवलं पाहिजे. बॅँका, लाइफ इन्श्युरन्स कंपन्या, फायनान्स कंपन्या हे जग तरी तुम्हाला दिसलं पाहिजे. तसं होणार नसेल, तर तुमच्या एमबीए करण्याला काहीच अर्थ नाही.
दुसरं सगळ्यात महत्त्वाचं हे लक्षात ठेवायला हवं की, एमबीए ही एक अत्यंत बेसिक डिग्री आहे. बीए, बीकॉम, बीएस्सीसारखी एक बेसिक डिग्री. त्यामुळे आपण फार मोठं काही शिकतोय, असं समजू नका. एमबीए करण्याचे फक्त काही फायदे आहेत, असं समजा..
1) तिथं प्रवेश घेतल्यावर तुमच्यापेक्षाही ‘सुपीरिअर’ असणा:या काही हुशार मुला-मुलींशी तुमची ओळख होईल. आपण नक्की कुठं उभे आहोत, याचं थोडं भान येईल.
2) एमबीएला शिकवणा:या चांगल्या शिक्षकांशी ओळख होईल.
3) कार्पोरेट इंडियाशी थोडीबहुत ओळख होईल, त्यातले काही कॅम्पस रिक्रुटमेण्टसाठीही कदाचित ते तुमच्या कॉलेजता येतील!
त्यामुळे तुम्ही एमबीए करणारच असाल तर हे सारं लक्षात ठेवा. 
आणि एमबीएला जायचंच असेल तर तुम्हाला उत्तम मार्क तरी मिळायला हवेत. (नाहीतर तुमच्या वडिलांकडे पैसे तरी हवेत, त्या जोरावर बडय़ा कॉलेजात अॅडमिशन घेता येईल.)
 
एमबीए करायचंच असं ठरवलंय, निर्णय पक्का झालाय, पण प्रश्न एकच, चांगलं कॉलेज कसं निवडायचं, नक्की कुठं अॅडमिशन घ्यायचं, कुठल्या दिशेनं जायचंच नाही?
 
1) ‘मला एमबीए का करायचंय?’ हाच प्रश्न मुळात स्वत:ला ठाकूनठोकून विचारा. बीए, बीएस्सी, बीकॉम असं काहीतरी करायचं आणि मग ऐनवेळेस ठरवायचं की, चला आता पुढे काहीतरी करायचं तर एमबीए करू! मला तर अशाही काही मुली माहिती आहेत, ज्यांनी लग्न टाळायचं म्हणून फक्त एमबीएला अॅडमिशन घेतले. या अशा कारणांसाठी एमबीए करूच नका, त्याचा काही उपयोग नाही.
विचार करायचाच असेल तर पॉङिाटिव्हली करा.  आपल्याला त्या क्षेत्रत काहीतरी काम करायचंय, करिअर घडवायचंय हे पक्कंअसेल तरच एमबीएच्या वाटय़ाला जा!
 
2) एमबीए झाल्यावर कुठं काम करायची तुमची इच्छा आहे, हा प्रश्नही आत्यंतिक महत्त्वाचा. तुम्हाला फायनान्समध्ये अत्यंत उच्च स्तरावर काम करण्याची महत्त्वाकांक्षा असेल, तर न्यूयॉर्क, लंडन, हॉँगकॉँग, सिंगापूर, दुबई या शहरात इंटरनॅशनल करिअर आहे. आणि तिथे पोहोचायचं असेल, तर तुम्हाला आंतरराष्ट्रीय ओळख असलेल्या कॉलेजातून एमबीए करायला हवं. तुम्हाला भारतात बॅँकेतच नोकरी करायची असेल तर एमबीए कशाला करता, त्यासाठी बॅँकाच्या परीक्षा द्या.  
मुद्दा काय, आपल्याला कुठे आणि काय काम करायचंय हे ठरवून एमबीएसाठी कॉलेज निवडा!
 
3) एमबीएची डिग्री तुम्हाला फोकस करायला शिकवते. नुसतं फायनान्समध्ये करिअर असं म्हणून नाही चालत, तर कार्पोरेट फायनान्स, ब्रोकरेज, इन्व्हेस्टमेण्ट बॅकिंग, नक्की कशात काम करायचंय हे ठरवावं लागतं. त्याप्रमाणो कॉलेज निवडायला हवं. त्यामुळे आपल्याला करायचं काय हे ठरवून मग त्यात स्पेशलायङोशन असलेलं कॉलेज निवडा!
 
4) कुठल्याही कॉलेजात जाऊन एमबीएची डिग्री आणली असेल तर त्या डिग्रीला बाजारात काही किंमत नाही हे लक्षात ठेवा!
पी. व्ही. सुब्रमण्यम
सुप्रसिद्ध अर्थसल्लागार आणि विश्लेषक