शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

मांडवा गावात वीटभट्टीवर काम करणार्‍या आईवडिलांचा मुलगा, ऑलिम्पिकचं स्वप्न  पाहतो तेव्हा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 16:00 IST

अविनाशशी त्याच्या गावातूनच फोनवर संपर्क केला तर तो खूश होता. म्हणाला, ऑलिम्पिकमध्ये भारताचा झेंडा फडकवण्यासाठी मी खूप मेहनत घेईन. प्रयत्नांत कसूर करणार नाही. भारताला पदक मिळवून देणार ही माझी मनात बांधलेली पक्की गाठ आहे.

ठळक मुद्देजिंकण्याच्या प्रवासाची ही त्याच्यासाठीही सुरुवात आहे!

- अविनाश कदम

अविनाश ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला, बातमी आली.आणि त्याच्या गावात, त्याच्या घरीच पोहचलो.बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील मांडवा हे गाव. घरी त्याचेवडील मुकुंद साबळे, आई वैशाली साबळे भेटल्या. वीटभट्टीवर काम करणारे हे मायबाप, त्यांच्या लेकानं ऑलिम्पिकर्पयत मजल मारली आहे. हातावर पोट असणार्‍या या कुटुंबासाठीच नाही तर गावासाठी ही केवढी मोठी गोष्ट.आष्टीपासून आठ किलोमीटर अंतरावर मांडवा हे छोटंसं गाव आहे. या गावातील धनगर वस्तीत हे कुटुंब राहतं.  आईवडील, भाऊ योगेश, विवाहित बहीण रोहिणी असं हे कुटुंब. वीटभट्टीवर मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत या जोडप्यानं आपल्या मुलांचं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून जिवाचं रान केलं. अविनाश गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चौथीर्पयत शिकला. त्यानंतर पुढील माध्यमिक शिक्षण धानोरा येथे त्यानं घेतलं. तिथं शिकत असताना त्यांला क्रीडा प्रबोधिनीत प्रवेश मिळाला. बालेवाडी पुणे येथे प्रवेश झाल्यानंतर त्याला प्रशिक्षण चांगलं मिळालं. बारावीनंतर तो भारतीय सेना दलात भरती झाला. त्याला लहानपणापासून रनिंगची आवड होती. तो कडा येथे महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी गावातून कधी कधी रनिंग करत कॉलेजला जात होता. पुढे आपण मॅरेथॉन स्पर्धेत काही तरी नावलौकिक करून दाखवायचे अशी जिद्द मनात बाळगून त्यानं अनेक स्पर्धात पदकं जिंकली. गावच्या सरपंच मनीषा मुटकुळे सांगतात, आमच्या गावातील अविनाशने जबरदस्त कामगिरी केली याचा गावाला अभिमान आहे. गावचा मुलगा देशाचं प्रतिनिधित्व करणार याचा आनंद आहे.अविनाशशी त्याच्या गावातूनच फोनवर संपर्क केला तर तो खूश होता. म्हणाला, ऑलिम्पिकमध्ये भारताचा झेंडा फडकवण्यासाठी मी खूप मेहनत घेईन. प्रयत्नांत कसूर करणार नाही. भारताला पदक मिळवून देणार ही माझी मनात बांधलेली पक्की गाठ आहे.त्याचं हे कौतुक, त्याचं यश त्याचे आजोबा साहेबराव शांतपणे पाहत असतात. सांगतात, नातावानं आज नाव काढलं. माझा नातू खरंच इतक्या लांब जाईल असं मला वाटत नव्हतं; परंतु खरच पोराने आज गावात नव्हे तर देशात नाव कमावलं. तोच अभिमान त्याच्या आईवडिलांच्या नजरेत चमकतो. ते सांगतात, आमच्या मुलानं असंच जिंकत राहावं. माझा मुलगा टीव्हीवर दिसावा ही आमची खूप दिवसाची इच्छा आज पूण झाली. त्याच्या शिक्षकांनाही आज हा यशाचा दिवस उजाडला याचा आनंद आहे. वस्ती शाळेवर शिक्षण घेत असताना त्याला मार्गदर्शन करणारे हनुमंत मुटकुळे शिक्षक सांगतात, अत्यंत गरीब परिस्थितीतून अविनाशने हे यश मिळवलं आहे.  त्यानं शाळेत असताना आपल्या वहीवर लिहून ठेवलं होतं, मी जिंकणारच !’त्या जिंकण्याच्या प्रवासाची ही त्याच्यासाठीही सुरुवात आहे!