मुळात आपण मोबाइल अति वापरतो आहोत, आपल्याला मोबाइलच्या अतिवापराचा आजार झालाय, हेच कोणी मान्य करत नाही. त्यामुळे त्यावर उपचार मिळायलाही बराच उशीर होतो. मात्र तरीही काही गोष्टी तपासून पाहिल्या तर हे कळू शकेल की, आपल्याला मोबाइलचं व्यसन लागलेलं आहे का? विचारा हे प्रश्न स्वतर्ला.1. आपण क्षणभरही मोबाइलशिवाय राहू शकत नाही का?2. मोबाइल रेंज नसेल तर अस्वस्थता वाढते का? 3. मोबाइलवर इंटरनेट नसेल तर जगाशी संपर्क तुटल्यासारखं वाटतं का?4. आपण सकाळी उठल्या उठल्या, रात्री जाग आली तर झोपेतही मोबाइल तपासतो का?5. आपण कुठेही गेलं की पहिल्यांदा फोटो काढून तो अपलोड करतो का?6. सोशल मीडियावर आपण टाकलेल्या पोस्टवर कमेण्ट नाही आल्या तर मूड ऑफ होतो का? 7. बॅटरी चार्ज नसेल तर आपली चिडचिड होते का?8. मोबाइलवर भरपूर चॅटिंग पण फोनवरही बोलणं किंवा प्रत्यक्ष भेट आणि बोलणं आपल्याला नकोसं होतं का? या सर्वाची उत्तरं हो असतील तर आपल्याला हे व्यसन लागलं आहे, हे समजा. त्यातून बाहेर पडायला हवं, हे स्वतर्ला समजवा.