शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
5
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
6
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
7
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
10
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
11
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
12
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
13
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
14
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
15
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
16
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
17
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
18
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
19
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
20
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 

आपुलकी

By admin | Updated: June 8, 2017 12:23 IST

आयटीतले तरुण दोस्त.त्यांनी २०११ मध्ये ठरवलं कीआपण नुस्ती चर्चा करण्यापेक्षाशेतकऱ्यांना मदत होईल असं काही करू..त्यातून सुरू झालं एकवेगळंच काम..

 - अभिजित फालके

मी मूळचा विदर्भातला. २००३ मध्ये पुण्यात आलो. आयटी सेक्टरमध्ये काम करतो. आता पुण्यात राहतो. त्याआधी भारताबाहेरही काही काळ राहिलो. मात्र वाटत होतं की आपण विदर्भातले, तिथं शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न मोठा. त्यासाठी आपण काही करायला हवं. बायकोशी बोललो, सहकारी व मित्रांशी बोललो. आणि २०१२ मध्ये आमच्या आपुलकी संस्थेचं काम सुरू केलं. २० इंजिनिअर मुलांनी एकत्र येवून हे काम सुरु केलं. आज साधारण ८००० जण आमच्या आपुलकी संस्थेचे सदस्य आहेत. आता गेली पाच वर्षे आम्ही शेती क्षेत्रात काम करतो आहोत. ना आम्ही सरकारी अनुदान घेतो, ना आमचं कुठं आॅफिस आहे, ना पगारी लोक. सारे जण आपल्या व्यापातून वेळ काढून हे काम करतात.

हे काम सुरू करताना मनात एवढंच होतं की, आपली आपल्या मातीशी बांधिलकी आहे. आपण त्यासाठी काम करायला हवं. अर्थात आपण काही उपक्रम करू हे ठरवताना ते काम किती दिवस करू, त्यात किती सातत्य राखू असा संभ्रम मनाशी होताच. आमचा अनुभव आयटीचा, शेतीक्षेत्राचा काहीही अनुभव नव्हताच.

म्हणून सुरुवातीला आम्ही उडान नावाची एक कार्यशाळा शेतकऱ्यांसाठी घेतली. पूर्णत: नि:शुल्क. निवास-भोजनाची व्यवस्थाही आम्ही केली. या प्रशिक्षणात पाण्याच्या स्रोतांचे संरक्षण, पाण्याचा वापर, सॉइल टेस्टिंग, शेतमालाचं मार्केटिंग, तंत्रज्ञानाची मदत, त्याचा वापर यासंदर्भात माहिती दिली. ६००० शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

या कार्यशाळेत आम्ही शेतकऱ्यांना विचारलं होतं की तुमच्या मुख्य अडचणी कोणत्या? शेतमालाला भाव मिळणं, शेतीत पायाभूत सुविधा नसणं, विजेचे प्रश्न, साठवणुकीच्या सोयी नाहीत, पाण्याच्या सोयी नाहीत. त्यासाठीचा पैसा या मुख्य तक्रारी तर होत्याच, पण त्यासोबत शेतीकामासाठी मजूर मिळत नसणं, कमी मनुष्यबळ उपलब्ध होणं ही एक मोठी अडचण समोर आली. ती अडचण अनेक शेतकऱ्यांनी सांगितली. शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाची, शेतीत आॅटोमेशनची गरज मोठ्या प्रमाणात आहे हे लक्षात आलं. त्यावर उपाय म्हणून आम्ही सचिन तेंडुलकर यांच्याशी संपर्क केला. सचिनने केलेल्या आर्थिक मदतीतून अमरावती जिल्ह्यातील मोर्डी या गावी रमेश तेंडुलकर अ‍ॅग्रीकल्चर टूल बॅँक आम्ही सुरू केली. त्यासाठी महिंद्रा कंपनीनेही सहकार्य केलं. हे केंद्र ना नफा ना तोटा तत्त्वावर चालतं.

अल्पदरात शेतीची कामं यातून करुन दिली जातात. सचिन तेंडुलकरच्याच खासदार निधीतून उस्मानाबाद जिल्ह्यातील भोगजी गाव दत्तक घेतलं आहे, तिथंही अशी कामं सुरू आहेत. आजवर आम्ही २९ शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून त्यांचा सातबारा कोरा करून घेतला.ही सारी कामं करताना एक लक्षात आलं की शेतकऱ्याला शेतीसोबत जोडधंदाही हवा. म्हणून आत्महत्याग्रस्त भागात आम्ही आटा चक्की, शेळीपालन, कुक्कुटपालन असे उद्योग प्रशिक्षण महिलांसाठीही राबवले.

असे अनेक उपक्रम आम्ही करतो आहोत. त्यातून शिकतो आहोत. एक मात्र नक्की की शेतीचे प्रश्न मोठे आहेत. जिथं सरकार पुरं पडत नाही तिथं आपण किती पुरं पडणार? पण तरीही आपण आपले प्रयत्न करत राहायचे. आमचा एक्सपर्टाइज आयटी क्षेत्रातला आहे तो वापरून, डाटा प्रोसेस करून आम्ही त्यातून काही उपक्रम करत असतो.

शेतमालाचं मार्केटिंग कसं करायचं याची माहिती शेतकऱ्यांना देतो. त्यासाठीची प्रशिक्षणं घेतो. लंडनला आम्ही विदर्भातल्या हळदीचं प्रदर्शन लावलं होतं. पुण्यात संत्रा महोत्सव भरवला होता. तिथं ६४ लाख रुपयांची संत्री विक्री झाली. नोटाबंदीच्या काळातच आम्ही पुण्यात हा संत्री महोत्सव भरवला होता. आयटी क्षेत्रात डायरेक्ट हापूस आंबा विक्री केली, त्यातून साधारण २३ लाख रुपये शेतकऱ्यांना कमावून दिले. हे करताना मग त्यासाठीची पोर्टल बनवली. त्याचा प्रचार-प्रसार, आॅनलाइन आॅर्डर घेऊन शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणं असे अनेक उपक्रम आम्ही याकाळात केले.त्यातून शिकलो एकच, की करण्यासारखं खूप आहे. आपण एकत्रित प्रयत्नांतून बरंच काही करू शकतो.fabhijeet1980@gmail.com