शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
3
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
4
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
5
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
6
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
7
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
8
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
9
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
10
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
11
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
12
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
13
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
14
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
15
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
16
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
17
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
18
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
19
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
20
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी

आपलं जगणं बसल्या जागी ‘हॅपनिंग’ आहे म्हणणारं व्यसन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 08:00 IST

भारतीय नागरिक दिवसाला सरासरी ७ तास स्मार्ट फोन वापरतात इंटरनेटचा वापर ७५ टक्के वाढला आहे, तर ८४ टक्के लोक म्हणतात की, झोपेतून उठल्यावर पहिली १५ मिनिटं आम्ही मोबाइलच पाहतो. हे स्क्रीनचं व्यसन आपल्याला कुठं नेणार?

-प्राची पाठक

आपल्या घरातल्या लोकांना आपण उठता बसता गुड मॉर्निंग, गुड अफ्टरनून, गुड नाईट वगैरे म्हणतो का? पण सोशल मीडियात सतत गुड मॉर्निंग, गुड नाईटवाले फॉरवर्ड्स लोक एकमेकांना पाठवतात, कारण ते आयते मिळतात, आले की ढकल पुढे. एरवी कधीही सेलिब्रेट न केलेल्या सणांचे, दिवसांचे देखील शुभेच्छा मेसेज वाट्टेल तसे फॉरवर्ड होतात. त्यात फॉरवर्ड्समध्ये आलेली सर्व माहिती आपण खरी मानायला लागतो. त्यातल्या तमाम थिअरीजवर विश्वास ठेवू लागतो आणि त्यात कमालीचे गुरफटत जातो, हेही अनेकदा लक्षातही येत नाही.

इंटरनेट, सोशल मीडिया, ओटीटी प्लॅटफॉर्म्स. खऱ्या-खोट्या, अर्धसत्य, अर्धवट, आपल्या कोणत्याही विचारांना सोयीस्कर अशा माहितीचं इतकं प्रचंड मोठं जाळं आपल्याभोवती आहे की सतत नवीन काहीतरी त्यात बघायला, वाचायला मिळेल असं आपल्याला वाटतं. जगातली सोशल मीडियावर फिरणारी सगळी माहिती जणू आपल्याला शोषून घ्यायची आहे. दणादण व्हाट्स ॲप स्टेट्स अपलोड करायचे आहेत. फिरायला जाण्यापेक्षा वेगवगळ्या ठिकाणी जाऊन स्वतःचेच आणि आपल्या ग्रुप्सचे फॅशनेबल फोटोज काढून घ्यायचे आहेत. सेल्फीच्या आपण इतके आहारी गेलो आहोत की, जीवाची पर्वादेखील न करता वेगवेगळ्या जीवघेण्या स्पॉट्सवर ॲडव्हेंचर करत आपल्याला सेल्फी काढत सुटायचे आहे! रेसिपी खाण्यासाठी करायच्या आहेत की, फोटो काढून फ्लॉण्ट करण्यासाठी याचा विचार करण्याइतकी फुरसतही उरलेली नाही, असं चित्र आहे.

सकाळी उठल्यावर आधी आपल्या मोबाइलमध्ये डोकावणं ही आपली सवय झालेली आहे. जणू जगातले सगळ्यांत महत्त्वाचे असे मेसेजेस आपल्यालाच दररोज येत असतात. ते वाचले नाहीत, पाहिले नाहीत, त्यांना रिस्पॉन्स दिला नाही, तर फार मोठ्ठं आकाश कोसळणार आहे. बसल्या बसल्या काहीही न करता आपलं जगणं हॅपनिंग आहे, असा फिल जो तो स्वत:ला देत सुटला आहे.

कोरोना काळात तर लॉकडाऊनशिवाय आपण जगणंच जणू विसरलो.

शाळा, कॉलेज ऑनलाइन, वर्क फ्रॉम होमही आलंच; पण खरा विचार केला तर अशी किती काळ असते ऑनलाइन शिक्षणाची वेळ. तो वेळ सोडून घरोघर हीच ओरड आहे की, पोरं फोनच्या बाहेर यायलाच तयार नाहीत. रिकाम्या हातांना काही काम नाही ही हतबलता मान्य करता एका लिमिटपर्यंत हे सर्व गरजेचं आणि ठीकच आहे, असंही म्हणावं लागतंच; पण दिवसातला किती वेळ आपण इलेक्ट्रॉनिक स्क्रीन्सला चिकटलो आहोत, ह्याचं भान खूपच आवश्यक आहे.

प्रत्येकाला वाटत असतं की मी तर फक्त गरजेपुरतंच नेट-फोन- सोशल मीडिया वापरतो. माहिती मिळवत आहोत, कामासाठी वापरत आहोत; पण ते खरंच तसं आहे का, हा प्रश्न स्वतःला प्रत्येकानं विचारायला हवा. बसल्याजागी सतत नेट सर्फ करत बसणं, सोशल मीडियावर, कॉल्सवर कित्येक तास वेळ घालवणं हे आपल्या हाताच्या स्नायूंना, शरीराच्या पोश्चरला, मेंदूला, मनाला, डोळ्यांना आणि कानालाही अपायकारक ठरू शकतं, ह्याचं भान आपण बाळगतो का, हेही विचारूच घेऊ स्वतःला!

या व्यसनाचं काय?

अनियंत्रित दारू पिणं, सिगारेटचं व्यसन असणं, ही व्यसनं सहज कळून येतात. त्याबद्दल आपल्या आजूबाजूचे चार लोक जागरूक असतात. त्यांच्या आहारी आपण जाऊ नये, म्हणून खबरदारी घेत असतात; पण स्मार्ट फोनचं, स्क्रीन्सचं देखील कमालीचं व्यसन आपल्याला लागत चाललेलं आहे, ह्याचं भान मात्र आपल्याला राहत नाही. ह्यात गंमत अशी आहे की, त्याची जाणीव करून देऊ शकणारे बहुतांश लोक देखील त्याच सर्व स्क्रीन्सच्या जाळ्यात अडकले आहेत. कोणी कोणाला सांगायचं, हाच मुळात प्रश्न आहे!

( प्राची मानसशास्त्रासह पर्यावरण आणि सूक्ष्मजीवशास्त्राची अभ्यासक आहे.)

prachi333@hotmail.com