शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

आए कुछ अब्र..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 09:13 IST

तिला जोडीदार हवाय; पण चारचौघींसारखं स्थळ पाहून कुणाला तरी नवरा म्हणून वरणं नकोय..पण मग नक्की हवंय काय तिला..?

१९९० हे वर्ष ‘आर्थिक उदारीकरणा’चं वर्ष म्हणून ओळखलं जातं. पण यामुळे आपल्या देशातलं आर्थिक आघाडीवरचंच चित्रं बदललं असं नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवरही बदलाचे वारे वाहू लागले. स्त्री- पुरुषांच्या आयुष्यातही खूप काही बदलत होतं. विशेषत: स्त्रियांचं आयुष्य. आतापर्यंत मुलींचं शिकणं लग्नासाठी अनुरूप होण्याच्या कसोटीत उतरण्यापुरतं महत्त्वाचं होतं. उदारीकरणाच्या वाऱ्यानं मात्र मुलींचं शिक्षण, त्यांचं पायावर उभं राहाणं, नोकरी करून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणं याला विशेष महत्त्वं आलं.‘आए कुछ अब्र’ हा मराठी लघुपट १९९० नंतरच्या काळात नोकरी करणा-या, पण अविवाहित असलेल्या स्त्रीची गोष्ट सांगतो. ही खरं तर गोष्ट नाहीच. हा एक प्रवास आहे एका शोधाचा. हा शोध आहे तिच्या मनातल्या अपेक्षित जोडीदाराचा.

शिक्षण झालं, वय लग्नायोग्य झालं म्हणून घरातील वडीलमंडळी सांगतील तिथं लग्न करण्याची पद्धत तिला अगदीच अमान्य आहे. मुलाकडचे म्हणतात म्हणून परंपरा पाळायच्या, मुलाकडच्यांची अपेक्षा म्हणून साडी नेसून कपाळावर गोल टिकली लावून समोर यायचं, घरंदाज मुलीसारखं वागायचं या आणि असल्या कसोट्यांवरचं लग्न आणि अशा जुनाट अपेक्षा ठेवणारा जोडीदारच तिला नको आहे. तो मिळत नाही म्हणून वयाची तिशी उलटून गेली तरी ती अविवाहितच आहे. वडिलांना ती डोईजड झालीये. रोजचे वादविवाद नको, होतात म्हणून मग ती आॅफिसच्या जवळ घर घेऊन स्वतंत्र राहाते. ती अतिशय संवेदनशील आहे. तिला आपल्याला समजून घेणारा, स्वतंत्र अवकाश देणारा जोडीदार हवा आहे. अर्थात, त्याला नव-याचं लेबलच लावायला हवं असं मात्र तिला वाटत नसतं.

ती स्वतंत्र जगते आहे, आई-वडिलांपासून दूर राहाते आहे, कसली बंधनं नाहीत की कसले नियम नाहीत; पण तरीही ती समाधानी आणि आनंदी नाही. तिच्या या शोधाच्या प्रवासात तिला अनेकजण भेटतात. त्यात काही तिला पसंत नसतात तर काहींना ती. अनेकांकडून आलेल्या थेट नकारानं ती खचते; पण शोध सुरूच ठेवते. आपल्याला जोडीदार म्हणून काय हवं आहे हे ती सतत तिच्या पातळीवर तपासत राहते. आपल्याला केवळ शरीरसंबंधांपुरता जोडीदार हवा का, असाही तिला प्रश्न पडतो. एकदा असा अनुभव ती घेऊनही पाहाते. या प्रवासात तिला कळतं की आपल्या जोडीदाराचा शोध केवळ लैंगिक गरजेपुरता नसून त्या पलीकडचा आहे.

या शोधातलाच एक मोहन. खूप दिवस त्याच्या सोबत असल्यानं तिला तोच खरा जोडीदार वाटू लागतो. कदाचित तिची मैत्रीण शिरीन म्हणते तसा तिचा तो भ्रमही असू शकतो; पण या भ्रमात असतानाच मोहनचा मृत्यू होतो. जोडीदार शोधाच्या या प्रवासात तिला शेवटी एकजण भेटतोही. स्वतंत्र विचारांचा, आपली मतं दुस-यांवर न लादणारा, समोरच्याच्या मनाचा विचार करणारा आणि एकटा. अगदी तिच्यासारखाच. कुंद वातावरण एका स्वच्छ सकाळी मागे पडावं तसं काही घडतं. तिच्या अपेक्षांचे, तिला हवेहवेसे ढग तिच्या घरापर्यंत येतात. तो तिला भेटायला तिच्या घरी येतो. तो सोबत असतो. पेटीवर त्याने सूर लावलेले असतात. आणि मोहनच्या सहवासात तिच्या मनात रूतून बसलेली फैय्याज अहमद फैज यांची ‘आए कुछ अब्र’ गझल ती गायला लागते. आणि फिल्म या सुरेल नोटवर संपते. आपल्याला वाटतं तिचा जोडीदाराचा शोध संपला असेल कदाचित. पण, तरीही जे वाटतं ते ठाम नसतंच.

खरं तर या फिल्मचे दिग्दर्शक, पटकाथाकार आणि सिनेमॅटोग्राफर असलेल्या मयूरेश गोटखिंडीकर यालाही ‘आता तिचा शोध संपला आणि ते सुखानं एकत्र नांदू लागले’ असा थेट शेवट करायचा नव्हताच. एका स्वतंत्र विचाराच्या स्त्रीची गोष्ट सांगताना त्याला ती आपल्या स्वत:च्या नजरेतून मांडायची नव्हतीच. तो ती तिच्याच नजरेतून मांडण्याचा प्रयत्न करत होता. आणि म्हणूनच जर-तरच्या सीमारेषेवर फिल्मचा शेवट होतो. मेघना पेठे या मराठी कथालेखिकेच्या दीर्घ कथेवर ही शॉर्ट फिल्म आधारित आहे. २८ मिनिटांच्या या फिल्ममध्ये बदाबदा गोष्टी घडत नाहीत. जे घडतं, तो एक शोधच असतो असं मात्र वाटत राहातं..फिल्म पाहण्यासाठी https://youtu.be/bNmlGU0SvT4  

 

टॅग्स :Theatreनाटक