शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

व्यसनांच्या विरोधात ६० हजार तरुणांची फौज

By admin | Published: October 20, 2016 4:37 PM

व्यसनांची मागणी कमी झाली,त्याविषयी द्वेष निर्माण झाला तर? त्यासाठीची एक मोहीम..

प्रवीण दाभोळकर
 
भारताला महासत्ता बनवण्याचं स्वप्न एकीकडे आणि त्याचवेळी तारुण्याला पोखरणारी व्यसनांची कीड दुसरीकडे ! हा प्रश्न गंभीर आहे. आपल्या देशात नशा करणाऱ्यांमध्ये अल्पवयीन आणि तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्यांचं प्रमाण जास्त आहे. ज्या वयात शरीर सुदृढ ठेवायचं त्याच वयात व्यसनाच्या विळख्यात ही मुलं ओढली जात आहेत.
तरुणांमधील वाढत्या व्यसनांचं हे प्रमाण लक्षात घेऊन सामाजिक न्याय विभाग आणि नशाबंदी मंडळातर्फे युथ अगेंस्ट लिकर, टोबॅको, ड्रग्ज्सच्या विरोधात (एलटीडी) एक मोहीम उघडण्यात आली आहे. ‘मागणीच बंद केली तर पुरवठाही बंद होईल’ हे ध्यानात ठेवून राज्यातून दरवर्षी ६० हजार विद्यार्थी समाजात व्यसनांसंदर्भात जनजागृती करणार आहेत. 
२०११ साली मुंबई विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू आणि सध्याचे नशाबंदी मंडळाचे अध्यक्ष राजन वेळूकर यांनी ‘यूथ अगेंस्ट एलटीडी’ या मोहिमेची घोषणा केली. मुंबईतल्या महाविद्यालयांपासून या मोहिमेचा श्रीगणेशा झाला. चार वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रातील बहुतांश महाविद्यालयांत विविध उपक्रम राबविण्यात आले. व्यसनमुक्ती करण्याची शपथ घेण्यात आली. व्यसनांबद्दल द्वेष निर्माण झाला तर मागणीही कमी होईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 
महाराष्ट्रातील प. महाराष्ट्र, उ. महाराष्ट्र, कोकण, ठाणे, विदर्भ, मुंबई, मराठवाडा या सात विभागांची निवड करण्यात आली आहे. दहा विद्यापीठांची यासाठी निवड करण्यात आली आहे. त्यातून पंचवीस महाविद्यालये ‘युथ अगेंस्ट एलटीडी’ या प्रकल्पासाठी निवडण्यात येणार आहेत. निवड झालेल्या महाविद्यालयांतून वीस जणांची टीम (सर्व जाती, धर्मातील १० मुले, १० मुली, प्राध्यापक) निवडण्यात येणार आहेत. निवड झालेले विद्यार्थी आणि प्राध्यापकांना रीतसर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पथनाट्य, चित्रपट, चर्चासत्र, मोबाइल मेसेजेसच्या माध्यमातून ही मंडळी समाजापर्यंत पोहोचणार आहेत. स्वत:हून पुढाकार घेणाऱ्या विद्यार्थी, प्राध्यापकांना यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. या चळवळीतले विद्यार्थी आपले महाविद्यालय, सभोवतालचा परिसर, सामाजिक मंडळांमध्ये जाऊन जनजागृती करतील. या संकल्पनेच्या माध्यमातून व्यसनाविरोधातील फ्रेंडशिप डे, व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो. चेहरे रंगवून, पोस्टर्सच्या माध्यमातून सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपुरेंसारख्या लोकप्रिय अभिनेत्यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. 
 
मागणीच नसेल तर पुरवठाही बंद होईल. म्हणून विद्यार्थ्यांद्वारे जनजागृती करून व्यसनांच्या मुळावरच घाव घालण्याचा आमचा मानस आहे. 
- वर्षा विद्या विलास,  सरचिटणीस, नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य 
 
व्यसनांचा धोका
वर्षाला ३३ लाख व्यक्ती दारूमुळे मृत्युमुखी पडतात. भारतात प्रत्येक १६ सेकंदांना एक मूल तंबाखूचे पहिल्यांदा सेवन करते, तर दिवसभरात हा आकडा ५,५०० मुलांपर्यंत जातो. भारतात १४.६ टक्के कुमारवयीन मुले तंबाखूच्या अधीन गेलेली आहेत. १९६० मध्ये दारू पिण्याचे वय २८ वर्षे होते, तर सध्या ते वय १८ वर्षांपर्यंत आले आहे.
 
(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत सहायक उपसंपादक आहेत.)