शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
4
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
5
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
6
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
7
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
8
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
9
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
10
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
11
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
12
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
13
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
14
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
15
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
16
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
17
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
18
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
19
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
20
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनांच्या विरोधात ६० हजार तरुणांची फौज

By admin | Updated: October 20, 2016 17:08 IST

व्यसनांची मागणी कमी झाली,त्याविषयी द्वेष निर्माण झाला तर? त्यासाठीची एक मोहीम..

प्रवीण दाभोळकर
 
भारताला महासत्ता बनवण्याचं स्वप्न एकीकडे आणि त्याचवेळी तारुण्याला पोखरणारी व्यसनांची कीड दुसरीकडे ! हा प्रश्न गंभीर आहे. आपल्या देशात नशा करणाऱ्यांमध्ये अल्पवयीन आणि तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्यांचं प्रमाण जास्त आहे. ज्या वयात शरीर सुदृढ ठेवायचं त्याच वयात व्यसनाच्या विळख्यात ही मुलं ओढली जात आहेत.
तरुणांमधील वाढत्या व्यसनांचं हे प्रमाण लक्षात घेऊन सामाजिक न्याय विभाग आणि नशाबंदी मंडळातर्फे युथ अगेंस्ट लिकर, टोबॅको, ड्रग्ज्सच्या विरोधात (एलटीडी) एक मोहीम उघडण्यात आली आहे. ‘मागणीच बंद केली तर पुरवठाही बंद होईल’ हे ध्यानात ठेवून राज्यातून दरवर्षी ६० हजार विद्यार्थी समाजात व्यसनांसंदर्भात जनजागृती करणार आहेत. 
२०११ साली मुंबई विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू आणि सध्याचे नशाबंदी मंडळाचे अध्यक्ष राजन वेळूकर यांनी ‘यूथ अगेंस्ट एलटीडी’ या मोहिमेची घोषणा केली. मुंबईतल्या महाविद्यालयांपासून या मोहिमेचा श्रीगणेशा झाला. चार वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रातील बहुतांश महाविद्यालयांत विविध उपक्रम राबविण्यात आले. व्यसनमुक्ती करण्याची शपथ घेण्यात आली. व्यसनांबद्दल द्वेष निर्माण झाला तर मागणीही कमी होईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 
महाराष्ट्रातील प. महाराष्ट्र, उ. महाराष्ट्र, कोकण, ठाणे, विदर्भ, मुंबई, मराठवाडा या सात विभागांची निवड करण्यात आली आहे. दहा विद्यापीठांची यासाठी निवड करण्यात आली आहे. त्यातून पंचवीस महाविद्यालये ‘युथ अगेंस्ट एलटीडी’ या प्रकल्पासाठी निवडण्यात येणार आहेत. निवड झालेल्या महाविद्यालयांतून वीस जणांची टीम (सर्व जाती, धर्मातील १० मुले, १० मुली, प्राध्यापक) निवडण्यात येणार आहेत. निवड झालेले विद्यार्थी आणि प्राध्यापकांना रीतसर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पथनाट्य, चित्रपट, चर्चासत्र, मोबाइल मेसेजेसच्या माध्यमातून ही मंडळी समाजापर्यंत पोहोचणार आहेत. स्वत:हून पुढाकार घेणाऱ्या विद्यार्थी, प्राध्यापकांना यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. या चळवळीतले विद्यार्थी आपले महाविद्यालय, सभोवतालचा परिसर, सामाजिक मंडळांमध्ये जाऊन जनजागृती करतील. या संकल्पनेच्या माध्यमातून व्यसनाविरोधातील फ्रेंडशिप डे, व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो. चेहरे रंगवून, पोस्टर्सच्या माध्यमातून सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपुरेंसारख्या लोकप्रिय अभिनेत्यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. 
 
मागणीच नसेल तर पुरवठाही बंद होईल. म्हणून विद्यार्थ्यांद्वारे जनजागृती करून व्यसनांच्या मुळावरच घाव घालण्याचा आमचा मानस आहे. 
- वर्षा विद्या विलास,  सरचिटणीस, नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य 
 
व्यसनांचा धोका
वर्षाला ३३ लाख व्यक्ती दारूमुळे मृत्युमुखी पडतात. भारतात प्रत्येक १६ सेकंदांना एक मूल तंबाखूचे पहिल्यांदा सेवन करते, तर दिवसभरात हा आकडा ५,५०० मुलांपर्यंत जातो. भारतात १४.६ टक्के कुमारवयीन मुले तंबाखूच्या अधीन गेलेली आहेत. १९६० मध्ये दारू पिण्याचे वय २८ वर्षे होते, तर सध्या ते वय १८ वर्षांपर्यंत आले आहे.
 
(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत सहायक उपसंपादक आहेत.)