शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दर ३ सेकंदाला आत्महत्येचा १ प्रयत्न

By admin | Updated: April 6, 2017 20:46 IST

बोला, मनमोकळं करा, इट्स ओके टू बी नॉट टू बी ओके हे सांगा स्वत:ला आणि मदत मागा कारण जगणं जास्त सुंदर आहे!

बोला, मनमोकळं करा, इट्स ओके टू बी नॉट टू बी ओके हे सांगा स्वत:ला आणि मदत मागा कारण जगणं जास्त सुंदर आहे!नाशिक, प्रतिनिधीआजच्या सोशली कनेक्ट असण्याच्या जगात ‘बोलायलाच’ कुणी मिळू नये, आयुष्य संपवण्याच्या शेवटच्या क्षणांतही सोबत कुणी नाही ही भावना किती भयंकर आहे. आणि दुर्देव असं की जागतिक आरोग्य संस्थेच्या आकडेवारीनुसार जगभरात दर ४० सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करते आहे. आणि भारतातही हे चित्र बरं नाही, भारतात तर दर तीन सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्येचा प्रयत्न करते आहे. आणि १५ ते ३५ या वयोगटातील तरुणांची संख्या त्यात अधिक आहे.आसरा या संस्थेनं आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार भारतात दरवर्षी १ लाख लोक आत्महत्या करतात. आणि मुंबईत तर दिवसाला ३ जणं आत्महत्या करुन आपला जीव गमवत आहेत. आणि आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांची संख्या तर प्रचंड मोठी आहे. त्यात सहा लाख लोकांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला असतो, त्यातले काही आपलं आयुष्य नव्यानं उभं करण्याचा प्रयत्न करत असतात.ही नुसती आकडेवारी वाचली तरी अंगावर भयंकर काटा येतो. एकदम मरुनच जावंसं वाटतं, तरुण जीवांना, ते ही ऐन तारुण्यात? उमेदीच्या दिवसात?आणि त्याहून भयंकर दुर्देव हे की, आत्महत्याच करावी असं टोकावर पोहचलेलं असताना त्या टोकावरही काहीक्षण बोलावं असं कुणीच नसतं अवतीभोवती?मानसशास्त्रज्ञ वारंवार सांगतात की, आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीशी संवाद साधला, त्याला बोलतं ठेवलं, त्याचं मन मोकळं होवू दिलं तर अनेकजण त्या टोकावरुन परत फिरतात. जगातले कुठलेच प्रश्न आपण मेल्यानं सुटत नाही, पण जगलो तर आपण एक आनंदी आयुष्य स्वत:साठी जगू शकतो.मात्र तसं होत नाही. अनेकदा आत्महत्या करीन म्हणणाऱ्यांकडे दुर्लक्ष होतं, असं काही करणार नाही तो किंवा ती नुस्त्या वल्गना करतात असं म्हटलं जातं. दुसरं म्हणजे टोकाचं नैराश्य. ते नैराश्य कसं हाताळायचं यासंदर्भात कुणी बोलत नाही. कुणावर मन मोकळं केलं जात नाही. आपल्या अवतीभोवतीची व्यक्ती गमावल्यावर अनेकजण म्हणतात की, त्याच्या मनात इतकं डाचत होतं, तो इतका निराश होता हे आम्हाला कळलंच नाही.ते कळत नाही, कारण आपण विश्वासानं एकमेकांशी बोलत नाही.ते बोला..बोलून मोकळे व्हा.इट्स ओके, टू नॉट बी ओके..मदत मागा..अनेक संस्था सुसाईड प्रिव्हेन्शन हेल्पलाईन चालवतात, नुस्तं गुगल केलं तरी अनेक हेल्पलाईनचे दुरध्वनी मिळू शकतात.त्यावर संपर्क करा, त्या हेल्पलाईन २४ तास उपलब्ध असतात.त्यातलीच एक आसरा हेल्पलाईन. 
 
अधिक माहिती www.aasra.info
इथं मिळू शकेल.हेल्पलाईन क्रमांक ०२२-२७५४६६६९