शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

दर ३ सेकंदाला आत्महत्येचा १ प्रयत्न

By admin | Updated: April 6, 2017 20:46 IST

बोला, मनमोकळं करा, इट्स ओके टू बी नॉट टू बी ओके हे सांगा स्वत:ला आणि मदत मागा कारण जगणं जास्त सुंदर आहे!

बोला, मनमोकळं करा, इट्स ओके टू बी नॉट टू बी ओके हे सांगा स्वत:ला आणि मदत मागा कारण जगणं जास्त सुंदर आहे!नाशिक, प्रतिनिधीआजच्या सोशली कनेक्ट असण्याच्या जगात ‘बोलायलाच’ कुणी मिळू नये, आयुष्य संपवण्याच्या शेवटच्या क्षणांतही सोबत कुणी नाही ही भावना किती भयंकर आहे. आणि दुर्देव असं की जागतिक आरोग्य संस्थेच्या आकडेवारीनुसार जगभरात दर ४० सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करते आहे. आणि भारतातही हे चित्र बरं नाही, भारतात तर दर तीन सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्येचा प्रयत्न करते आहे. आणि १५ ते ३५ या वयोगटातील तरुणांची संख्या त्यात अधिक आहे.आसरा या संस्थेनं आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार भारतात दरवर्षी १ लाख लोक आत्महत्या करतात. आणि मुंबईत तर दिवसाला ३ जणं आत्महत्या करुन आपला जीव गमवत आहेत. आणि आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांची संख्या तर प्रचंड मोठी आहे. त्यात सहा लाख लोकांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला असतो, त्यातले काही आपलं आयुष्य नव्यानं उभं करण्याचा प्रयत्न करत असतात.ही नुसती आकडेवारी वाचली तरी अंगावर भयंकर काटा येतो. एकदम मरुनच जावंसं वाटतं, तरुण जीवांना, ते ही ऐन तारुण्यात? उमेदीच्या दिवसात?आणि त्याहून भयंकर दुर्देव हे की, आत्महत्याच करावी असं टोकावर पोहचलेलं असताना त्या टोकावरही काहीक्षण बोलावं असं कुणीच नसतं अवतीभोवती?मानसशास्त्रज्ञ वारंवार सांगतात की, आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीशी संवाद साधला, त्याला बोलतं ठेवलं, त्याचं मन मोकळं होवू दिलं तर अनेकजण त्या टोकावरुन परत फिरतात. जगातले कुठलेच प्रश्न आपण मेल्यानं सुटत नाही, पण जगलो तर आपण एक आनंदी आयुष्य स्वत:साठी जगू शकतो.मात्र तसं होत नाही. अनेकदा आत्महत्या करीन म्हणणाऱ्यांकडे दुर्लक्ष होतं, असं काही करणार नाही तो किंवा ती नुस्त्या वल्गना करतात असं म्हटलं जातं. दुसरं म्हणजे टोकाचं नैराश्य. ते नैराश्य कसं हाताळायचं यासंदर्भात कुणी बोलत नाही. कुणावर मन मोकळं केलं जात नाही. आपल्या अवतीभोवतीची व्यक्ती गमावल्यावर अनेकजण म्हणतात की, त्याच्या मनात इतकं डाचत होतं, तो इतका निराश होता हे आम्हाला कळलंच नाही.ते कळत नाही, कारण आपण विश्वासानं एकमेकांशी बोलत नाही.ते बोला..बोलून मोकळे व्हा.इट्स ओके, टू नॉट बी ओके..मदत मागा..अनेक संस्था सुसाईड प्रिव्हेन्शन हेल्पलाईन चालवतात, नुस्तं गुगल केलं तरी अनेक हेल्पलाईनचे दुरध्वनी मिळू शकतात.त्यावर संपर्क करा, त्या हेल्पलाईन २४ तास उपलब्ध असतात.त्यातलीच एक आसरा हेल्पलाईन. 
 
अधिक माहिती www.aasra.info
इथं मिळू शकेल.हेल्पलाईन क्रमांक ०२२-२७५४६६६९