शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
2
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
3
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
4
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
5
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
6
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
7
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
8
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
9
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
10
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
11
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
12
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
13
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
14
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
15
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
16
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
18
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
19
बेडग-कर्नाटक मार्गावर हत्याराचा धाक दाखवून सात लाख लूटले, गाडीची केली तोडफोड
20
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह

शब्दांच्या पिचवरही झहीरच फास्ट

By admin | Updated: October 16, 2015 00:09 IST

जलदगती गोलंदाजांमध्ये गती असणे गरजेचे नाही. गतीसोबत त्या परिस्थितीनुसार खेळात बदल करणे आवश्यक आहे, असे मत झहीर खान याने मांडले

महेश चेमटे ल्ल मुंबई जलदगती गोलंदाजांमध्ये गती असणे गरजेचे नाही. गतीसोबत त्या परिस्थितीनुसार खेळात बदल करणे आवश्यक आहे, असे मत झहीर खान याने मांडले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ‘राम-राम’ ठोकल्यानंतर ‘लोकमत’शी त्याने खास संवाद साधला; तेव्हा तो बोलत होता.भारताने २०११ साली जिंकलेल्या विश्वचषकात त्याचा सिंहाचा वाटा होता. दुखापतींनंतरही मिळवलेला ‘विश्वचषक’ या सर्व गोष्टींवर त्याने टाकलेला दृष्टीक्षेप. तो म्हणाला, प्रत्येक गोष्टीला आज ना उद्या थांबावे लागते. खुप विचार केल्यानंतर मी ठरवले, ‘होय, निवृत्तीसाठी हीच योग्य वेळ आहे.’ हा निर्णय घेण्याआधी मी माझ्या कुटूंबियांना विचारले. माझ्या मित्रांचा म्हणजे सचिन तेंडूलकर, अजित आगरकर, आशिष नेहरा यांच्यासह सर्व मित्रांचा सल्ला घेतला. प्रशिक्षकांना जेव्हा सांगितले, मी निवृत्ती घेण्याच्या विचारात आहे. तेव्हा त्यांनी होकर दर्शविला. त्यांच्या सर्वांच्या पाठिंब्याने मी हा निर्णय घेतला.तुर्तास मी, क्रिकेट नंतर काय? याचा विचार केलेला नाही. आगामी आयपीलमध्ये मी खेळताना दिसेल. क्रिकेट वगळता अन्य गोष्टींचा विचार सध्या तरी नाही. भविष्यात क्लबच्या माध्यामातून मी क्रिकेटशी जोडलेला असेल. दुखापतींतून सावरल्यानंतर मी टेनिस बॉलच्या साहाय्याने सरावास सुरुवात केली. कौंटी क्रिकेटमुळे मी यशस्वी पुनरागमन करु शकलो. मला अनेक दिग्गज गोलंदाजांनी सल्ला दिला की, मी रनअप कमी करावा. त्यांच्या सल्ल्यानुसार मी धावण्यात बदल केला. त्यामुळे मला स्वत:वर नियंत्रण मिळवता आले. शिवाय गोलंदाजीही भेदक करता आली. >> श्रीरामपूर ते भारतीय संघ या प्रवासात मी अनेक चांगले-वाईट अनुभव घेतले. एका गावातील मुलगा एक स्वप्न पाहतो, त्याचा पाठलाग करतो आणि ते स्वप्न प्रत्यक्षात आणतो, असे काहीसे माझ्याबाबत बोलता येईल. रणजी सामन्याने मला खुप काही दिले. त्यावेळी सुधीर नाईक यांनी दिलेला सल्ला आज ही लक्षात आहे, ते म्हणाले, जहीर क्रिकेटचा गंभीरपण विचार कर. मस्करीत खेळणे वेगळे आणि खेळाची मस्करी करणे यात फरक आहे. त्या सल्ल्यामुळे माझ्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळली.>>भारताने विश्वचषक जिंकला तो दिवस आजही आठवतो. संपुर्ण स्टेडिअम प्रेक्षकांनी भरलेले. त्या आधी मोहालीमध्ये पाकिस्तानवर विजय मिळवला होता. वानखेडेवर उतरण्यापुर्वी आम्ही संगळ््यांनी आपले सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन करायचे असे ठरवले. मैदानात ‘वंदे मातरम’ने वातावरणात भरलेला उत्साह या वातावरणात एक वेगळी उर्जा होती. अंतिम सामन्यासाठी कोणता दबाव नव्हता हे जरी खरे असले तरी आम्ही पुर्णपणे विश्रांती ही घेऊ शकत नव्हतो. अखेर तो क्षण आला आणि आम्ही विश्वचषकावर नाव कोरले.