शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
3
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
4
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
5
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
6
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
7
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
8
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
9
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
10
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
11
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
12
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
13
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
14
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
15
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
16
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
17
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
18
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
19
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
20
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...

शब्दांच्या पिचवरही झहीरच फास्ट

By admin | Updated: October 16, 2015 00:09 IST

जलदगती गोलंदाजांमध्ये गती असणे गरजेचे नाही. गतीसोबत त्या परिस्थितीनुसार खेळात बदल करणे आवश्यक आहे, असे मत झहीर खान याने मांडले

महेश चेमटे ल्ल मुंबई जलदगती गोलंदाजांमध्ये गती असणे गरजेचे नाही. गतीसोबत त्या परिस्थितीनुसार खेळात बदल करणे आवश्यक आहे, असे मत झहीर खान याने मांडले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ‘राम-राम’ ठोकल्यानंतर ‘लोकमत’शी त्याने खास संवाद साधला; तेव्हा तो बोलत होता.भारताने २०११ साली जिंकलेल्या विश्वचषकात त्याचा सिंहाचा वाटा होता. दुखापतींनंतरही मिळवलेला ‘विश्वचषक’ या सर्व गोष्टींवर त्याने टाकलेला दृष्टीक्षेप. तो म्हणाला, प्रत्येक गोष्टीला आज ना उद्या थांबावे लागते. खुप विचार केल्यानंतर मी ठरवले, ‘होय, निवृत्तीसाठी हीच योग्य वेळ आहे.’ हा निर्णय घेण्याआधी मी माझ्या कुटूंबियांना विचारले. माझ्या मित्रांचा म्हणजे सचिन तेंडूलकर, अजित आगरकर, आशिष नेहरा यांच्यासह सर्व मित्रांचा सल्ला घेतला. प्रशिक्षकांना जेव्हा सांगितले, मी निवृत्ती घेण्याच्या विचारात आहे. तेव्हा त्यांनी होकर दर्शविला. त्यांच्या सर्वांच्या पाठिंब्याने मी हा निर्णय घेतला.तुर्तास मी, क्रिकेट नंतर काय? याचा विचार केलेला नाही. आगामी आयपीलमध्ये मी खेळताना दिसेल. क्रिकेट वगळता अन्य गोष्टींचा विचार सध्या तरी नाही. भविष्यात क्लबच्या माध्यामातून मी क्रिकेटशी जोडलेला असेल. दुखापतींतून सावरल्यानंतर मी टेनिस बॉलच्या साहाय्याने सरावास सुरुवात केली. कौंटी क्रिकेटमुळे मी यशस्वी पुनरागमन करु शकलो. मला अनेक दिग्गज गोलंदाजांनी सल्ला दिला की, मी रनअप कमी करावा. त्यांच्या सल्ल्यानुसार मी धावण्यात बदल केला. त्यामुळे मला स्वत:वर नियंत्रण मिळवता आले. शिवाय गोलंदाजीही भेदक करता आली. >> श्रीरामपूर ते भारतीय संघ या प्रवासात मी अनेक चांगले-वाईट अनुभव घेतले. एका गावातील मुलगा एक स्वप्न पाहतो, त्याचा पाठलाग करतो आणि ते स्वप्न प्रत्यक्षात आणतो, असे काहीसे माझ्याबाबत बोलता येईल. रणजी सामन्याने मला खुप काही दिले. त्यावेळी सुधीर नाईक यांनी दिलेला सल्ला आज ही लक्षात आहे, ते म्हणाले, जहीर क्रिकेटचा गंभीरपण विचार कर. मस्करीत खेळणे वेगळे आणि खेळाची मस्करी करणे यात फरक आहे. त्या सल्ल्यामुळे माझ्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळली.>>भारताने विश्वचषक जिंकला तो दिवस आजही आठवतो. संपुर्ण स्टेडिअम प्रेक्षकांनी भरलेले. त्या आधी मोहालीमध्ये पाकिस्तानवर विजय मिळवला होता. वानखेडेवर उतरण्यापुर्वी आम्ही संगळ््यांनी आपले सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन करायचे असे ठरवले. मैदानात ‘वंदे मातरम’ने वातावरणात भरलेला उत्साह या वातावरणात एक वेगळी उर्जा होती. अंतिम सामन्यासाठी कोणता दबाव नव्हता हे जरी खरे असले तरी आम्ही पुर्णपणे विश्रांती ही घेऊ शकत नव्हतो. अखेर तो क्षण आला आणि आम्ही विश्वचषकावर नाव कोरले.