शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

आॅस्ट्रेलियाला सतावत आहे कोहलीच्या पुनरागमनाची चिंता

By admin | Updated: March 1, 2017 06:10 IST

विराट कोहली दमदार पुनरागमन करेल, अशी चिंता सतावत असल्याचे आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने म्हटले आहे.

पुणे : आॅस्ट्रेलियाला भारतीय कर्णधार विराट कोहली दमदार पुनरागमन करेल, अशी चिंता सतावत असल्याचे आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने म्हटले आहे. कोहली दोन्ही डावांत झटपट बाद झाल्यामुळे आॅस्ट्रेलियाला पहिल्या कसोटी सामन्यात एकतर्फी विजय मिळवता आला. पुणे कसोटी सामन्यात कोहलीला पहिल्या डावात खातेही उघडता आले नव्हते तर दुसऱ्या डावात केवळ १३ धावा काढून बाद झाला. भारताला या कसोटी सामन्यात ३३३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. आॅस्ट्रेलियाने जवळजवळ १३ वर्षांनंतर भारतात पहिला कसोटी विजय नोंदवला. स्टार्कने पहिल्या डावात कोहलीला बाद केले होते. मंगळवारी पत्रकारांसोबत बोलताना स्टार्क म्हणाला, ‘कोहली जागतिक दर्जाचा खेळाडू आहे, याची सर्वांना कल्पना आहे. त्याने यंदाच्या मोसमात यापूर्वीच खोऱ्याने धावा फटकावल्या आहेत. आम्हाला विराटच्या पुनरागमनाची चिंता करावी लागणार आहे. मालिकेतील उर्वरित लढतींमध्येही त्याची विकेट महत्त्वाची ठरणार आहे. या मालिकेत विजय मिळविण्यासाठी त्याला आणखी सहा वेळा बाद करावे लागणार आहे.’ कोहलीला बाद करण्यापूर्वी स्टार्कने चेतेश्वर पुजाराला माघारी परतवले होते, पण भारतीय कर्णधाराला बाद करणे अधिक महत्त्वाचे होते, असे त्याने सांगितले. स्टार्क म्हणाला, ‘आम्हाला कल्पना आहे, की तो दमदार पुनरागमन करेल, पण पुजाराच्या तुलनेत त्याला बाद करणे अधिक महत्त्वाचे होते.’(वृत्तसंस्था)आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर बेंगळुरू संघातर्फे कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा स्टार्क म्हणाला, ‘पहिल्या कसोटी सामन्यात सर्वकाही आमच्या मनाप्रमाणे घडले, पण केवळ एका सामन्याच्या बळावर मालिका जिंकता येणार नाही, याची कल्पना आहे. अद्याप तीन महत्त्वाचे सामने शिल्लक आहेत.’