शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

विश्वचषक फुटबॉल पात्रता स्पर्धा: भारतापुढे आज कतारचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 06:31 IST

सुनील छेत्रीवर मुख्य मदार

दोहा : पहिल्याच सामन्यात निराशाजनक पराभवाला सामोरे गेलेल्या भारतीय फुटबॉल संघापुढे फिफा विश्वचषक पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात मंगळवारी आशियाई चॅम्पियन कतारचे कडवे आव्हान असेल.

ओमानविरुद्ध गुवाहाटीत ५ सप्टेंबर रोजी झालेल्या पहिल्या लढतीत सुरुवातीच्या आघाडीनंतरही अखरेच्या आठ मिनिटात पकड शिथिल केल्याने पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. २०२२ च्या विश्वचषकाचा यजमान असलेल्या कतारने गेल्या काही वर्षांत खेळात लक्षणीय सुधारणा घडवून आणली. कतारने यंदा यूएईत आशिया चषक जिंकला. तसेच, यानंतर आमंत्रण मिळाल्यानंतर कोपा अमेरिका चषकात द. अमेरिकेतील संघांनाही कडवे आव्हान दिले होते.

भारताने जानेवारीत आशिया चषक स्पर्धेत यूएई आणि बहरीनसारख्या संघांना त्रस्त केले होते. मात्र बाद फेरी गाठण्यात भारताला अपयश आले. भारताविरुद्ध कतारचे पारडे जड आहे. चारपैकी तीन सामने या संघाने जिंकले असून एक सामना बरोबरीत सुटला होता. दोन्ही संघांतील मागचा अधिकृत सामना सप्टेंबर २००७ ला विश्वचषक पात्रता फेरीत झालेला. त्यावेळी कतारने भारताला ६-० ने पराभूत केले होते.

भारताने २०११ मध्ये दोहा येथे कतारविरुद्ध झालेल्या मैत्री सामन्यात २-१ ने बाजी मारली होती, पण तो अधिकृत सामना नव्हता. त्यावेळी भारताने नियमबाह्यपणे अधिक बदली खेळाडू खेळविले होते. 

‘चुका टाळण्यावर लक्ष’ओमानविरुद्ध भारताकडून एकमेव गोल नोंदविणारा कर्णधार सुनील छेत्री म्हणाला,‘आम्ही या सामन्याबाबत उत्सुक आहोत. आम्ही कुठल्याही संघाविरुद्ध खेळणार असलो तरी कडवा संघर्ष करणारच. लहान-लहान चुकांची पुनरावृत्ती टाळावी लागेल. अशा चुकांमुळेच ओमानविरुद्ध आम्ही तीन गुण गमावले, हे ध्यानात ठेवूनच कतारविरुद्ध खेळावे लागणार आहे.’

टॅग्स :Footballफुटबॉल