शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

विश्वचषक फुटबॉल पात्रता स्पर्धा: भारतापुढे आज कतारचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 06:31 IST

सुनील छेत्रीवर मुख्य मदार

दोहा : पहिल्याच सामन्यात निराशाजनक पराभवाला सामोरे गेलेल्या भारतीय फुटबॉल संघापुढे फिफा विश्वचषक पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात मंगळवारी आशियाई चॅम्पियन कतारचे कडवे आव्हान असेल.

ओमानविरुद्ध गुवाहाटीत ५ सप्टेंबर रोजी झालेल्या पहिल्या लढतीत सुरुवातीच्या आघाडीनंतरही अखरेच्या आठ मिनिटात पकड शिथिल केल्याने पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. २०२२ च्या विश्वचषकाचा यजमान असलेल्या कतारने गेल्या काही वर्षांत खेळात लक्षणीय सुधारणा घडवून आणली. कतारने यंदा यूएईत आशिया चषक जिंकला. तसेच, यानंतर आमंत्रण मिळाल्यानंतर कोपा अमेरिका चषकात द. अमेरिकेतील संघांनाही कडवे आव्हान दिले होते.

भारताने जानेवारीत आशिया चषक स्पर्धेत यूएई आणि बहरीनसारख्या संघांना त्रस्त केले होते. मात्र बाद फेरी गाठण्यात भारताला अपयश आले. भारताविरुद्ध कतारचे पारडे जड आहे. चारपैकी तीन सामने या संघाने जिंकले असून एक सामना बरोबरीत सुटला होता. दोन्ही संघांतील मागचा अधिकृत सामना सप्टेंबर २००७ ला विश्वचषक पात्रता फेरीत झालेला. त्यावेळी कतारने भारताला ६-० ने पराभूत केले होते.

भारताने २०११ मध्ये दोहा येथे कतारविरुद्ध झालेल्या मैत्री सामन्यात २-१ ने बाजी मारली होती, पण तो अधिकृत सामना नव्हता. त्यावेळी भारताने नियमबाह्यपणे अधिक बदली खेळाडू खेळविले होते. 

‘चुका टाळण्यावर लक्ष’ओमानविरुद्ध भारताकडून एकमेव गोल नोंदविणारा कर्णधार सुनील छेत्री म्हणाला,‘आम्ही या सामन्याबाबत उत्सुक आहोत. आम्ही कुठल्याही संघाविरुद्ध खेळणार असलो तरी कडवा संघर्ष करणारच. लहान-लहान चुकांची पुनरावृत्ती टाळावी लागेल. अशा चुकांमुळेच ओमानविरुद्ध आम्ही तीन गुण गमावले, हे ध्यानात ठेवूनच कतारविरुद्ध खेळावे लागणार आहे.’

टॅग्स :Footballफुटबॉल