शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

महिला बॉक्सिंगमध्ये खूप सुधारणा झाली, पण खेळाडूंचे काय? ‘सुपरमॉम’ मेरीकोमचा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 18:17 IST

टोकियो आॅलिम्पिकच्या तयारीला केली सुरुवात

मुंबई : ‘महिला बॉक्सिंगमध्ये आज खूप सुधारणा झाली आहे, पण खेळाडूंचे काय? त्यांच्या कामगिरीमध्ये कधी सुधारणा होणार,’ असा प्रश्न सहा वेळची जागतिक विजेती बॉक्सर मेरीकोम हिने उपस्थित केला. इंडियन फेडरेशन आॅफ स्पोर्ट गेमिंगच्या (आयएफएसजी) वतीने भारताच्या विविध युवा खेळाडूंना ‘स्टार्स आॅफ टुमॉरो’ (एसओटू) या उपक्रमांतर्गत मेरीकोमच्या हस्ते गौरविण्यात आले.बुधवारी मुंबईत झालेल्या या कार्यक्रमामध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मेरीकोमने म्हटले की, ‘आज खेळामध्ये सोईसुविधांच्या बाबतीत मोठी सुधारणा झाली आहे. मात्र, त्या तुलनेत खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा झाली नाही. खेळाडूंसाठी चांगले साहित्य उपलब्ध असून खेळाडूंना मोठा पाठिंबाही मिळत आहे, परंतु तरीही कामगिरीत सुधारणा झालेली पाहण्यास मिळत नाही. खेळाडूंनी खेळताना विचारात्मक खेळ करावा. त्यांनी मानसिकरीत्या अधिक सक्षम होणे गरजेचे आहे, पण या गोष्टी त्यांच्यामध्ये पाहण्यास मिळत नाही. अनेक खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा मोठा अनुभव असूनही, त्यांच्या खेळाचा स्तर मात्र म्हणावा तसा उंचावलेला नाही.’मेरीकोम पुढे म्हणाली की, ‘मी जेव्हा जागतिक स्पर्धेत पहिले दोन सुवर्ण पदक जिंकले, तेव्हाही अनेकांना माझ्या बाबतीत किंवा माझ्या कामगिरीची माहिती नव्हती. कोणतीही मदत मिळत नसल्याने मी एकटीच वाटचाल करत होती. बस, रेल्वेने प्रवास होत होता. एखाद्या स्पर्धेदरम्यान राहण्यासाठी साधी खोली मिळायची, पण या सर्व गोष्टी माझ्यासाठी एकप्रकारे चांगल्या ठरल्या. कारण यामुळे मला प्रतिकूल परिस्थितीतून पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली. जर मी एखाद्या श्रीमंत घरातील असते, तर मला कदाचित संघर्ष काय असतो, हे कळालेच नसते. त्यामुळे एका साधारण कुटुंबातून पुढे आल्याचा मला अभिमान आहे. यानंतर, तिसºयांदा व चौथ्यांदा जागतिक जेतेपद पटकावल्यानंतर मला पुरस्कर्ते मिळाले.’टोकियो २०२० सालच्या आॅलिम्पिक तयारीविषयी मेरीकोमने सांगितले की, ‘यंदाच्या जागतिक स्पर्धेत ५१ किलो वजनी गटात खेळलेल्या खेळाडूंवर मी लक्ष ठेवून होते. यापैकी एक-दोन खेळाडू आव्हानात्मक वाटले, पण इतर खेळाडू सर्वसाधारण असल्याने माझ्याकडे संधी आहे. या सर्व खेळाडूंचा आता व्यवस्थित अभ्यास करून, त्यानुसार मी योजना तयार करेन, शिवाय तयारी करताना योग्य साथीदार मिळणेही खूप आवश्यक असते, पण त्याची कमतरता आपल्याकडे भासते. इतर वजनी गटातील खेळाडूंकडूनही अपेक्षित मदत होत नाही. त्यांचे केवळ त्यांच्या खेळावर प्रेम आहे. देशाचा विचार त्यांच्याकडून झाला, तरच आपल्याला यश मिळू शकेल.’

 

सहावे जागतिक सुवर्ण पदक मिळविण्यात काहीच अडचण आली नाही. मला माझ्या तयारीवर पूर्ण विश्वास होता. आशियाई स्पर्धेतही मला विशेष स्पर्धा मिळाली नाही. पोलंडमध्ये झालेल्या स्पर्धेत मात्र तुलनेत चांगली लढत मिळाली. या स्पर्धेत जागतिक स्पर्धेत सहभाग घेतलेल्या बहुतेक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यामुळे तयारी चांगली झाली होती.

- एम. सी. मेरीकोम

टॅग्स :Mary Komमेरी कोमMumbaiमुंबई