शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

सुशीलपासून प्रेरणा घेऊन दोन वेळा आॅलिम्पिक पदक जिंकायचे : साक्षी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 20:23 IST

रिओ आॅलिम्पिकमध्ये कास्यपदक जिंकणारी साक्षी मलिक हिची भारताचा स्टार मल्ल सुशीलकुमार याच्याकडून प्रेरणा घेत त्याच्याप्रमाणेच आॅलिम्पिकमध्ये सलग दोन वेळेस पदक जिंकण्याची इच्छा आहे.

इंदौर : रिओ आॅलिम्पिकमध्ये कास्यपदक जिंकणारी साक्षी मलिक हिची भारताचा स्टार मल्ल सुशीलकुमार याच्याकडून प्रेरणा घेत त्याच्याप्रमाणेच आॅलिम्पिकमध्ये सलग दोन वेळेस पदक जिंकण्याची इच्छा आहे.साक्षी येथे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सहभागी झाली आहे. ती म्हणाली, ‘‘सुशील माझ्यासाठी मोठा प्रेरणास्रोत राहिला आहे. त्याला खेळताना पाहून आपणही आॅलिम्पिक खेळू आणि देशासाठी पदक जिंकू, असा विचार करीत होते. तथापि, मी आता आॅलिम्पिकपदक विजेती आहे; परंतु मला त्याच्यासारखे बनायचे आहे आणि आॅलिम्पिकमध्ये दोन पदक जिंकण्याचा विक्रम कायम करायचा आहे.’’२00८ च्या बीजिंग आणि २0१२ च्या लंडन आॅलिम्पिकमध्ये अनुक्रमे कास्य आणि रौप्यपदक जिंकणाºया सुशीलने तीन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर येथे राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिपद्वारे मॅटवर पुनरागमन केले आहे. या स्पर्धेत कुस्तीप्रेमींचे लक्ष हे सुशील आणि साक्षी यांच्यावरच जास्त आहे.साक्षी म्हणाली, ‘‘माझ्या मते, सर्वच वरिष्ठ खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी व्हायला हवे. या स्पर्धेद्वारे आम्ही खेळाच्या जवळ राहतो आणि आम्हाला खूप काही शिकायला मिळते. आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी आम्हाला या अनुभवाचा लाभ मिळतो. मी प्रत्येक छोट्या-छोट्या स्पर्धेत सहभागी होते. कारण मी कुस्ती खेळापासून दूर राहू इच्छित नाही.’’२0२0 मध्ये टोकियोत होणाºया आगामी आॅलिम्पिक स्पर्धेच्या तयारीविषयी विचारल्यावर ती म्हणाली, ‘‘वेळ कसा जातो हे लक्षात येत नाही. मला रिओ आॅलिम्पिक खेळून एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. पुढील आॅलिम्पिकची उलटी गणतीदेखील सुरू झाली आहे. याविषयी थोडा दबावही आहे; परंतु मी माझ्या मनात प्रत्येक दिवशी पुढील आॅलिम्पिकसाठी चांगली तयारी करायची आहे, ज्यामुळे मी आपल्या पदकाचा रंग बदलू शकेल याची मनात गाठ बांधली आहे.’’साक्षीने आंतरराष्ट्रीय स्पर्धेची तयारी लक्षात घेऊन पहिलवानांसाठी उपलब्ध सुविधांविषयी समाधान व्यक्त केले. ती म्हणाली, ‘‘भारतीय कुस्ती महासंघाच्या प्रयत्नांमुळे देशातील पहिलवानांना आधीपेक्षा चांगल्या सुविधा आहेत.’’ तथापि, सुविधांबाबत देशात प्रत्येक खेळ आणि खेळाडूंना एकसारखे महत्त्व द्यायला हवे, यावरही तिने जोर दिला. ती म्हणाली, ‘‘ क्रिकेटला जास्त आणि कुस्तीला कमी महत्त्व मिळावे, अथवा बॅडमिंटनला जास्त आणि टेबल टेनिसला कमी महत्त्व दिले जावे असे घडायला नको. सर्वच खेळ आणि खेळाडूंना समान महत्त्व द्यायला हवे.’’