शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

सुशीलपासून प्रेरणा घेऊन दोन वेळा आॅलिम्पिक पदक जिंकायचे : साक्षी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 20:23 IST

रिओ आॅलिम्पिकमध्ये कास्यपदक जिंकणारी साक्षी मलिक हिची भारताचा स्टार मल्ल सुशीलकुमार याच्याकडून प्रेरणा घेत त्याच्याप्रमाणेच आॅलिम्पिकमध्ये सलग दोन वेळेस पदक जिंकण्याची इच्छा आहे.

इंदौर : रिओ आॅलिम्पिकमध्ये कास्यपदक जिंकणारी साक्षी मलिक हिची भारताचा स्टार मल्ल सुशीलकुमार याच्याकडून प्रेरणा घेत त्याच्याप्रमाणेच आॅलिम्पिकमध्ये सलग दोन वेळेस पदक जिंकण्याची इच्छा आहे.साक्षी येथे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सहभागी झाली आहे. ती म्हणाली, ‘‘सुशील माझ्यासाठी मोठा प्रेरणास्रोत राहिला आहे. त्याला खेळताना पाहून आपणही आॅलिम्पिक खेळू आणि देशासाठी पदक जिंकू, असा विचार करीत होते. तथापि, मी आता आॅलिम्पिकपदक विजेती आहे; परंतु मला त्याच्यासारखे बनायचे आहे आणि आॅलिम्पिकमध्ये दोन पदक जिंकण्याचा विक्रम कायम करायचा आहे.’’२00८ च्या बीजिंग आणि २0१२ च्या लंडन आॅलिम्पिकमध्ये अनुक्रमे कास्य आणि रौप्यपदक जिंकणाºया सुशीलने तीन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर येथे राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिपद्वारे मॅटवर पुनरागमन केले आहे. या स्पर्धेत कुस्तीप्रेमींचे लक्ष हे सुशील आणि साक्षी यांच्यावरच जास्त आहे.साक्षी म्हणाली, ‘‘माझ्या मते, सर्वच वरिष्ठ खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी व्हायला हवे. या स्पर्धेद्वारे आम्ही खेळाच्या जवळ राहतो आणि आम्हाला खूप काही शिकायला मिळते. आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी आम्हाला या अनुभवाचा लाभ मिळतो. मी प्रत्येक छोट्या-छोट्या स्पर्धेत सहभागी होते. कारण मी कुस्ती खेळापासून दूर राहू इच्छित नाही.’’२0२0 मध्ये टोकियोत होणाºया आगामी आॅलिम्पिक स्पर्धेच्या तयारीविषयी विचारल्यावर ती म्हणाली, ‘‘वेळ कसा जातो हे लक्षात येत नाही. मला रिओ आॅलिम्पिक खेळून एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. पुढील आॅलिम्पिकची उलटी गणतीदेखील सुरू झाली आहे. याविषयी थोडा दबावही आहे; परंतु मी माझ्या मनात प्रत्येक दिवशी पुढील आॅलिम्पिकसाठी चांगली तयारी करायची आहे, ज्यामुळे मी आपल्या पदकाचा रंग बदलू शकेल याची मनात गाठ बांधली आहे.’’साक्षीने आंतरराष्ट्रीय स्पर्धेची तयारी लक्षात घेऊन पहिलवानांसाठी उपलब्ध सुविधांविषयी समाधान व्यक्त केले. ती म्हणाली, ‘‘भारतीय कुस्ती महासंघाच्या प्रयत्नांमुळे देशातील पहिलवानांना आधीपेक्षा चांगल्या सुविधा आहेत.’’ तथापि, सुविधांबाबत देशात प्रत्येक खेळ आणि खेळाडूंना एकसारखे महत्त्व द्यायला हवे, यावरही तिने जोर दिला. ती म्हणाली, ‘‘ क्रिकेटला जास्त आणि कुस्तीला कमी महत्त्व मिळावे, अथवा बॅडमिंटनला जास्त आणि टेबल टेनिसला कमी महत्त्व दिले जावे असे घडायला नको. सर्वच खेळ आणि खेळाडूंना समान महत्त्व द्यायला हवे.’’