शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

विंडीज पदाधिकाऱ्यांनी पावले उचलणे आवश्यक

By admin | Updated: July 2, 2017 00:10 IST

पहिली लढत पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाल्यानंतर खेळल्या गेलेल्या दोन लढतींमध्ये भारताने अपेक्षेप्रमाणे वर्चस्व गाजवले. विंडीज क्रिकेटच्या

-सौरव गांगुली  पहिली लढत पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाल्यानंतर खेळल्या गेलेल्या दोन लढतींमध्ये भारताने अपेक्षेप्रमाणे वर्चस्व गाजवले. विंडीज क्रिकेटच्या समृद्ध भूतकाळाचा विचार केल्यानंतर त्यांचा घसरत जाणारा आलेख बघणे जागतिक क्रिकेटसाठी चांगली बाब नाही. येथील क्रिकेट बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांनी विंडीज क्रिकेटला पुन्हा रुळावर आणण्यासाठी कंबर कसून कामाला लागण्याची गरज आहे. विंडीजच्या नैसर्गिक आक्रमक क्रिकेटविना जागतिक क्रिकेटची रंगत काही प्रमाणात नक्कीच ओसरेल. विंडीज क्रिकेटचा आलेख उंचावण्यासाठी काय करता येईल, यासाठी कॅरेबियन क्रिकेट बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांनी लवकर पावले उचलण्याची गरज आहे. दोन लढतींमध्ये अजिंक्य रहाणेची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. पाचही लढतींमध्ये आपण खेळणार आहोत, याची त्याला चांगली कल्पना आहे आणि त्याची झलक त्याच्या खेळामध्ये दिसून आली. कोहलीने रहाणेसारख्या खेळाडूसोबत चर्चा करायला हवी आणि त्याला संघातील त्याची भूमिका समजावून सांगायला हवी. त्यामुळे रहाणेसारख्या खेळाडूला आपला खेळ उंचावता येईल आणि त्याला त्याचे संघातील महत्त्वही कळेल. चर्चेचा दुसरा मुद्दा म्हणजे कुलदीप यादव आहे. त्याच्या गोलंदाजीमध्ये विविधता आहे. विशेषत: पाटा खेळपट्टीवर त्याची गोलंदाजी संघासाठी जमेची बाजू ठरू शकते. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेदरम्यान पाटा खेळपट्ट्यांवर भारतीय फिरकीपटू निष्प्रभ भासले. त्यामुळे फिरकीला अनुकूल नसलेल्या खेळपट्ट्यांवर संघात कुलदीपसारख्या गोलंदाजाची गरज असते. गोलंदाजीतील विविधतेमुळे कुलदीप भारतीय वन-डे संघातील महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो. सध्याची परिस्थिती बघता भारतीय संघाने या मालिकेत ४-० ने बाजी मारली तर आश्चर्य वाटणार नाही. वेस्ट इंडिज संघाबाबत अधिक चर्चा करण्यासारखे नाही. सध्याचा विंडीज संघ या मालिकेत काही चमत्कार घडवेल, असे वाटत नाही. विंडीजचे क्रिकेट प्रेम जगजाहीर असताना स्टेडियममधील रिकाम्या खुर्च्या बघितल्यानंतर दु:ख वाटते. अनेक लोककला लाभलेल्या या बेटांवर कॅलिस्पोचे धुंद करणारे बिट कानावर पडले नाहीत तर चुकल्यासारखे वाटते. (गेमप्लॅन)