शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
3
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
4
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
5
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
6
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
7
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
8
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
9
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
10
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
11
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
12
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
13
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
14
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
15
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
16
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
17
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
18
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
19
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
20
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत

भारत करणार 2032 च्या ऑलिम्पिक यजमानपदासाठी दावा?

By admin | Updated: June 16, 2017 22:49 IST

जगातील शक्तिशाली देशांपैकी एक असूनही भारतात अद्याप ऑलिम्पिकचे आयोजन झालेले नाही. आता

  ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 16 - जगातील सर्वात मोठी आणि मानाची क्रीडा स्पर्धा म्हणजे ऑलिम्पिक. पण  जगातील शक्तिशाली देशांपैकी एक असूनही भारतात अद्याप ऑलिम्पिकचे आयोजन झालेले नाही. आता 2032 साली होणाऱ्या ऑलिम्पिकच्या यजमानपदासाठी भारताकडून दावा करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. 
भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए) अध्यक्ष एन. रामचंद्रन यांनी 2032च्या ऑलिम्पिकच्या यजमानपदासाठी दावेदारी सादर करण्याबाबत चाचपणी करण्यास केंद्र सरकारने सहमती दर्शवल्याचे सांगितले. तामिळनाडू ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रामचंद्रन म्हणाले, सरकारने 2032  ऑलिम्पिक यजमानपदाच्या दावेदारीबाबत  शक्यता पडताळण्यासाठी प्राथमिक परवानगी दिली आहे. मात्र हे खूप प्राथमिक अवस्थेत आहे. प्रत्यक्ष यजमानपदासाठी दावेदारी सादर करण्यासाठी आपल्याला खूप परवानग्या मिळवाव्या लागतील. 
2020 साली ऑलिम्पिकचे आयोजन जपानमधील टोकियो येथे होणार आहे, तर 2024 ची ऑलिम्पिक फ्रान्समधील पॅरिस येथे आयोजित होणार आहे. भारताकडून ऑलिम्पिक यजमानपदासाठी दावेदारी करण्यात येण्याच्या चर्चा सुरू असतात. मात्र भारत आतापर्यंत ऑलिम्पिक यजमानपदाच्या शर्यतीत उतरलेला नाही.