शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

भारत करणार 2032 च्या ऑलिम्पिक यजमानपदासाठी दावा?

By admin | Updated: June 16, 2017 22:49 IST

जगातील शक्तिशाली देशांपैकी एक असूनही भारतात अद्याप ऑलिम्पिकचे आयोजन झालेले नाही. आता

  ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 16 - जगातील सर्वात मोठी आणि मानाची क्रीडा स्पर्धा म्हणजे ऑलिम्पिक. पण  जगातील शक्तिशाली देशांपैकी एक असूनही भारतात अद्याप ऑलिम्पिकचे आयोजन झालेले नाही. आता 2032 साली होणाऱ्या ऑलिम्पिकच्या यजमानपदासाठी भारताकडून दावा करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. 
भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए) अध्यक्ष एन. रामचंद्रन यांनी 2032च्या ऑलिम्पिकच्या यजमानपदासाठी दावेदारी सादर करण्याबाबत चाचपणी करण्यास केंद्र सरकारने सहमती दर्शवल्याचे सांगितले. तामिळनाडू ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रामचंद्रन म्हणाले, सरकारने 2032  ऑलिम्पिक यजमानपदाच्या दावेदारीबाबत  शक्यता पडताळण्यासाठी प्राथमिक परवानगी दिली आहे. मात्र हे खूप प्राथमिक अवस्थेत आहे. प्रत्यक्ष यजमानपदासाठी दावेदारी सादर करण्यासाठी आपल्याला खूप परवानग्या मिळवाव्या लागतील. 
2020 साली ऑलिम्पिकचे आयोजन जपानमधील टोकियो येथे होणार आहे, तर 2024 ची ऑलिम्पिक फ्रान्समधील पॅरिस येथे आयोजित होणार आहे. भारताकडून ऑलिम्पिक यजमानपदासाठी दावेदारी करण्यात येण्याच्या चर्चा सुरू असतात. मात्र भारत आतापर्यंत ऑलिम्पिक यजमानपदाच्या शर्यतीत उतरलेला नाही.