शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
4
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
5
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
7
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
8
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
9
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
10
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
11
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
12
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
13
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
14
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
15
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
16
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
17
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
18
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
19
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
20
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा

जेव्हा क्रिकेटलाही राष्ट्रकुल स्पर्धेपुढे झुकावे लागले होते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 20:53 IST

बीसीसीआयने यावेळी क्वालालंपुरमध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेला जास्त महत्व दिले नाही आणि त्यांनी चांगला संघ कॅनडाला पाठवायचे ठरवले होते. या संघात सचिन तेंडुलकरसारखे नावाजलेले खेळाडू होते.

ठळक मुद्देबीसीसीआयला पाकिस्तानविरुद्धचे सामने महत्वाचे वाटत असल्यामुळे भारतीय संघाने राष्ट्रकुल स्पर्धेत चांगली कामगिरी केली नाही, असे त्यावेळी म्हटले जात होते.

नवी दिल्ली : क्रिकेट हा भारतामध्ये धर्म मानला जातो. त्याच्यापुढे अन्य खेळांना जास्त भाव दिला जात नाही. पण एकदा अशीही गोष्ट घडली आहे की, जेव्हा क्रिकेटला राष्ट्रकुल स्पर्धेपुढे झुकावे लागले होते.

हा गोष्ट आहे 20 वर्षांपूर्वीची, म्हणजेच 1998 सालची. त्यावेळी राष्ट्रकुल स्पर्धा क्वालालंपुर येथे खेळवली जाणार गेली होती आणि या स्पर्धेत क्रिकेटचाही सहभाग करण्यात आला होता. त्याचवेळी भारत आणि पाकिस्तान यांचे कॅनडामध्ये सहारा चषकाचे सामने होणार होते. बीसीसीआयने यावेळी क्वालालंपुरमध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेला जास्त महत्व दिले नाही आणि त्यांनी चांगला संघ कॅनडाला पाठवायचे ठरवले होते. या संघात सचिन तेंडुलकरसारखे नावाजलेले खेळाडू होते. ही गोष्ट भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांना समजली. त्यांनी बीसीसीआयला फटकारले आणि आपला सर्वोत्तम संघ राष्ट्रकुल स्पर्धेला पाठवण्यासाठी सांगितले. त्यावेळी बीसीसीआयला त्यांच्यापुढे नमते घ्यावे लागले होते आणि संघातील नामांकित खेळाडूंना बीसीसीआयने क्वालालंपुरला पाठवले.

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची कामगिरी चांगली झाली नाही. त्यांना प्राथमिक फेरीचा अडथळाही पार करता आला नाही. राष्ट्रकुल स्पर्धेतून झटपट बाहेर पडल्यावर भारतीय खेळाडूंनी थेट कॅनडा गाठलं आणि पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळले. बीसीसीआयला पाकिस्तानविरुद्धचे सामने महत्वाचे वाटत असल्यामुळे भारतीय संघाने राष्ट्रकुल स्पर्धेत चांगली कामगिरी केली नाही, असे त्यावेळी म्हटले जात होते.

टॅग्स :Sachin Tendulkarसचिन तेंडूलकरCricketक्रिकेट