शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

जेव्हा क्रिकेटलाही राष्ट्रकुल स्पर्धेपुढे झुकावे लागले होते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 20:53 IST

बीसीसीआयने यावेळी क्वालालंपुरमध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेला जास्त महत्व दिले नाही आणि त्यांनी चांगला संघ कॅनडाला पाठवायचे ठरवले होते. या संघात सचिन तेंडुलकरसारखे नावाजलेले खेळाडू होते.

ठळक मुद्देबीसीसीआयला पाकिस्तानविरुद्धचे सामने महत्वाचे वाटत असल्यामुळे भारतीय संघाने राष्ट्रकुल स्पर्धेत चांगली कामगिरी केली नाही, असे त्यावेळी म्हटले जात होते.

नवी दिल्ली : क्रिकेट हा भारतामध्ये धर्म मानला जातो. त्याच्यापुढे अन्य खेळांना जास्त भाव दिला जात नाही. पण एकदा अशीही गोष्ट घडली आहे की, जेव्हा क्रिकेटला राष्ट्रकुल स्पर्धेपुढे झुकावे लागले होते.

हा गोष्ट आहे 20 वर्षांपूर्वीची, म्हणजेच 1998 सालची. त्यावेळी राष्ट्रकुल स्पर्धा क्वालालंपुर येथे खेळवली जाणार गेली होती आणि या स्पर्धेत क्रिकेटचाही सहभाग करण्यात आला होता. त्याचवेळी भारत आणि पाकिस्तान यांचे कॅनडामध्ये सहारा चषकाचे सामने होणार होते. बीसीसीआयने यावेळी क्वालालंपुरमध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेला जास्त महत्व दिले नाही आणि त्यांनी चांगला संघ कॅनडाला पाठवायचे ठरवले होते. या संघात सचिन तेंडुलकरसारखे नावाजलेले खेळाडू होते. ही गोष्ट भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांना समजली. त्यांनी बीसीसीआयला फटकारले आणि आपला सर्वोत्तम संघ राष्ट्रकुल स्पर्धेला पाठवण्यासाठी सांगितले. त्यावेळी बीसीसीआयला त्यांच्यापुढे नमते घ्यावे लागले होते आणि संघातील नामांकित खेळाडूंना बीसीसीआयने क्वालालंपुरला पाठवले.

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची कामगिरी चांगली झाली नाही. त्यांना प्राथमिक फेरीचा अडथळाही पार करता आला नाही. राष्ट्रकुल स्पर्धेतून झटपट बाहेर पडल्यावर भारतीय खेळाडूंनी थेट कॅनडा गाठलं आणि पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळले. बीसीसीआयला पाकिस्तानविरुद्धचे सामने महत्वाचे वाटत असल्यामुळे भारतीय संघाने राष्ट्रकुल स्पर्धेत चांगली कामगिरी केली नाही, असे त्यावेळी म्हटले जात होते.

टॅग्स :Sachin Tendulkarसचिन तेंडूलकरCricketक्रिकेट