शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पहिलीच वन डे धोक्यात, वेस्ट इंडीज संघ संपावर जाणार ?

By admin | Updated: October 8, 2014 11:13 IST

कोची येथील एकदिवसीय सामना सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच वेस्ट इंडीज संघातील खेळाडूंनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

ऑनलाइन लोकमत

कोची, दि. ८ - कोची येथील एकदिवसीय सामना सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच वेस्ट इंडीज संघातील खेळाडूंनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने करारात मानधनामध्ये कपात केल्याच्या निषेधार्थ वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी संपाचे अस्त्र उगारले आहे. वेस्ट इंडीज क्रिकेटपटू संपावर गेल्यास या मालिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. 

वेस्ट इंडीज संघ पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात आला आहे. पुढील वर्षी होणा-या विश्वचषकाच्या संघ निवडीसाठी ही मालिका भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची समजली जात आहे. मात्र या मालिकेच्या सुरुवातीलाच वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड व खेळाडूंमध्ये करारावरुन संघर्ष निर्माण झाला आहे. क्रिकेट बोर्डाने केलेल्या नवीन करारात वेस्ट इंडिज क्रिकेटपटूंच्या मानधनामध्ये भरभक्कम कपात करण्यात आली आहे.  बोर्डाच्या या करारामुळे संघाचे मनोबल घटले असून परिस्थितीवर तोडगा निघाला नाही तर खेळाडू स्वतःच्या हातात सूत्र घेतील असे वेस्ट इंडिजचा कर्णधार ड्वेन ब्राव्होने एका पत्रात म्हटले आहे. वेस्ट इंडीज संघाने मंगळवारी सरावही केला नव्हता तसेच त्यांनी पत्रकार परिषदेला येणे टाळले होते. वेस्ट इंडीज क्रिकेटपटूंनी संपाचा इशारा दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डानेही बीसीसीआयला पत्र पाठवून माफी मागितल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. आमचे खेळाडू पहिल्या सामन्यात सहभागी होणार नसून यामुळे होणा-या नुकसानासाठी चाहते व बीसीसीआयची आम्ही माफी मागतो असा स्पष्ट उल्लेख केल्याचे समजते.