शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

वेस्ट इंडिज अंतिम फेरीत, भारतावर सात गडी राखून मात

By admin | Updated: March 31, 2016 23:01 IST

फलंदाज जॉन्सन चार्ल्स आणि लेंडल सिमन्स यांनी केलेल्या फलंदाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजने अंतिम फेरीत धकड मारली आहे. टी-२० वर्ल्डकपमधील उपांत्य फेरीत भारताचा धावांनी वेस्ट

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३१ - फलंदाज जॉन्सन चार्ल्स आणि लेंडल सिमन्स यांनी केलेल्या फलंदाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजने अंतिम फेरीत धडक मारली आहे. टी-२० वर्ल्डकपमधील उपांत्य फेरीत भारताचा वेस्ट इंडिजने सात गडी राखून पराभव केला. या पराभवामुऴे भारताचे टी-२० वर्ल्डकमधील आव्हान संपुष्टात आले आहे. आता अंतिम सामना वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. या सामन्यात भारताने दिलेल्या २० षटकात १९२ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने १९. ४ षटकात तीन बाद १९६ धावा केल्या. वेस्ट इंडिजचा सलामीवीर फलंदाज जॉन्सन चार्ल्स आणि लेंडल सिमन्स यांनी शानदार खेळी केली. लेंडल सिमन्सने सर्वाधिक जास्त धावा केल्या. त्याने ५३ चेंडूत पाच षटकार आणि सात चौकारांची खेळी करत नाबाद ८३ धावा केल्या, तर जॉन्सन चार्ल्सने ३६ चेंडूत दोन षटकारांसह सात चौकार लगावत ५२ धावा केल्या. ख्रिस गेल हे वादळ या सामन्यात चालले नाही, ख्रिस गेलला गोलंदाज बुमराहने यार्करवर बाद केले. आंद्रे रस्सेलने ४३ आणि सॅम्युअल्सने ८ धावा केल्या.
आक्रमक फलंदाज विराट कोहलीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिज समोर १९३ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र विराटची ही खेळी अयशस्वी ठरली. भारताकडून भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात २ गड्याच्या मोबदल्यात १९२ धावा केल्या. विराटने ४७ चेंडूत एक षटकार आणि ११ चौकाराच्या मदतीने नाबाद ८९ धावा केल्या. त्याला रहाणे (४०) आणि धोनीने (१५) चांगली साथ दिली. तर गोलंदाज आशिष नेहरा, बुमराह आणि विराटने प्रत्येकी एक बळी टिपले.