शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

आम्हाला भारतानं नाही, अंपायर्सनी हरवलं - बांग्लादेशच्या पंतप्रधान

By admin | Updated: March 21, 2015 16:59 IST

बांग्लादेशविरुद्धचा सामना भारत पंचांच्या एतकर्फी निर्णयांमुळेच जिंकला असा आरोप आता बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनीही केला आहे.

ऑनलाइन लोकमत
ढाका, दि. २१ - बांग्लादेशविरुद्धचा सामना भारत पंचांच्या एतकर्फी निर्णयांमुळेच जिंकला असा आरोप आता बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनीही केला आहे. याआधी आयसीसीचे बांग्लादेशी अध्यक्ष मुस्तफा कमाल यांनीही असेच वक्तव्य करून वादाला तोंड फोडले होते. जर पंचांनी चुका केल्या नसत्या तर भारत बांग्लादेशला हरवू शकला नसता असं हसीना म्हणतात.
भारत बांग्लादेश दरम्यानची मॅच फिक्स होती की काय असं सुचवताना कमाल यांनी शुक्रवारी आयसीसी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच विचारही व्यक्त केला होता. आयसीसीच्या पुढील बैठकीच्यावेळी हा मुद्दा ते मांडणार असून अंपायर्सनी दिलेले निकाल आधीच ठरवल्यासारखे वाटल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
आयसीसीच्या बैठकीत आपण आपली बाजू मांडू आणि नंतर गरज वाटल्यास राजीनामा देऊ असे कमाल यांनी म्हटले आहे. बांग्लादेशचा भारताने १०९ धावांनी पराभव केल्यानंतर बांग्लादेशमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला आणि पंचांच्या सुमार कामगिरीबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. बांग्लादेशचा फलंदाज महमुद्दुल्लाहचा झेल शिखर धवनने सीमारेषेनजीक पकडला, त्यावेळी त्याचा पाय रोपला लागल्याचा दावा बांग्लादेशप्रेमींनी केला आहे. तर रोहीत शर्मा ९० धावांवर असताना झेलबाद झाला होता, परंतु तो चेंडू नोबॉल ठरवण्यात आला. रोहीतने नंतर शतक झळकावले होते. बांग्लादेशच्या इतिहासातील तो सर्वात मोठा सामना होता आणि संपूर्ण देश त्याकडे डोळे लावून बसला होता. मात्र, बांग्लादेश हरल्यानंतर या पंचांच्या चुकांमुळेच तो हरल्याची भावना व्यक्त होत असून मुस्तफा कमाल व शेख हसीना दोघेही त्याच मताला आले आहेत.
याला असलेला आणखी एक पदर म्हणजे या सामन्यातील एक पंच आलीम दार होते, जे पाकिस्तानचे असून बांग्लादेशाच्या द्वेषापोटी त्यांनी भारताला अनुकूल अंपायरिंग केल्याचा बांग्लादेशींचा आक्षेप आहे. या सामन्याचे पडसाद बांग्लादेशमधल्या वृत्तपत्रांमध्येही उमटले आहेत. एका वृत्तपत्राने वादग्रस्त निर्णयांना वाघ बळी पडले असा मथळा दिलाय तर दुस-या एका वृत्तपत्राने पंचांच्या हेराफेरीमुळे स्वप्नवत वाटचाल भंगल्याचा मथळा दिला आहे.