शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला भारतानं नाही, अंपायर्सनी हरवलं - बांग्लादेशच्या पंतप्रधान

By admin | Updated: March 21, 2015 16:59 IST

बांग्लादेशविरुद्धचा सामना भारत पंचांच्या एतकर्फी निर्णयांमुळेच जिंकला असा आरोप आता बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनीही केला आहे.

ऑनलाइन लोकमत
ढाका, दि. २१ - बांग्लादेशविरुद्धचा सामना भारत पंचांच्या एतकर्फी निर्णयांमुळेच जिंकला असा आरोप आता बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनीही केला आहे. याआधी आयसीसीचे बांग्लादेशी अध्यक्ष मुस्तफा कमाल यांनीही असेच वक्तव्य करून वादाला तोंड फोडले होते. जर पंचांनी चुका केल्या नसत्या तर भारत बांग्लादेशला हरवू शकला नसता असं हसीना म्हणतात.
भारत बांग्लादेश दरम्यानची मॅच फिक्स होती की काय असं सुचवताना कमाल यांनी शुक्रवारी आयसीसी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच विचारही व्यक्त केला होता. आयसीसीच्या पुढील बैठकीच्यावेळी हा मुद्दा ते मांडणार असून अंपायर्सनी दिलेले निकाल आधीच ठरवल्यासारखे वाटल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
आयसीसीच्या बैठकीत आपण आपली बाजू मांडू आणि नंतर गरज वाटल्यास राजीनामा देऊ असे कमाल यांनी म्हटले आहे. बांग्लादेशचा भारताने १०९ धावांनी पराभव केल्यानंतर बांग्लादेशमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला आणि पंचांच्या सुमार कामगिरीबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. बांग्लादेशचा फलंदाज महमुद्दुल्लाहचा झेल शिखर धवनने सीमारेषेनजीक पकडला, त्यावेळी त्याचा पाय रोपला लागल्याचा दावा बांग्लादेशप्रेमींनी केला आहे. तर रोहीत शर्मा ९० धावांवर असताना झेलबाद झाला होता, परंतु तो चेंडू नोबॉल ठरवण्यात आला. रोहीतने नंतर शतक झळकावले होते. बांग्लादेशच्या इतिहासातील तो सर्वात मोठा सामना होता आणि संपूर्ण देश त्याकडे डोळे लावून बसला होता. मात्र, बांग्लादेश हरल्यानंतर या पंचांच्या चुकांमुळेच तो हरल्याची भावना व्यक्त होत असून मुस्तफा कमाल व शेख हसीना दोघेही त्याच मताला आले आहेत.
याला असलेला आणखी एक पदर म्हणजे या सामन्यातील एक पंच आलीम दार होते, जे पाकिस्तानचे असून बांग्लादेशाच्या द्वेषापोटी त्यांनी भारताला अनुकूल अंपायरिंग केल्याचा बांग्लादेशींचा आक्षेप आहे. या सामन्याचे पडसाद बांग्लादेशमधल्या वृत्तपत्रांमध्येही उमटले आहेत. एका वृत्तपत्राने वादग्रस्त निर्णयांना वाघ बळी पडले असा मथळा दिलाय तर दुस-या एका वृत्तपत्राने पंचांच्या हेराफेरीमुळे स्वप्नवत वाटचाल भंगल्याचा मथळा दिला आहे.