शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

आम्हाला भारतानं नाही, अंपायर्सनी हरवलं - बांग्लादेशच्या पंतप्रधान

By admin | Updated: March 21, 2015 16:59 IST

बांग्लादेशविरुद्धचा सामना भारत पंचांच्या एतकर्फी निर्णयांमुळेच जिंकला असा आरोप आता बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनीही केला आहे.

ऑनलाइन लोकमत
ढाका, दि. २१ - बांग्लादेशविरुद्धचा सामना भारत पंचांच्या एतकर्फी निर्णयांमुळेच जिंकला असा आरोप आता बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनीही केला आहे. याआधी आयसीसीचे बांग्लादेशी अध्यक्ष मुस्तफा कमाल यांनीही असेच वक्तव्य करून वादाला तोंड फोडले होते. जर पंचांनी चुका केल्या नसत्या तर भारत बांग्लादेशला हरवू शकला नसता असं हसीना म्हणतात.
भारत बांग्लादेश दरम्यानची मॅच फिक्स होती की काय असं सुचवताना कमाल यांनी शुक्रवारी आयसीसी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच विचारही व्यक्त केला होता. आयसीसीच्या पुढील बैठकीच्यावेळी हा मुद्दा ते मांडणार असून अंपायर्सनी दिलेले निकाल आधीच ठरवल्यासारखे वाटल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
आयसीसीच्या बैठकीत आपण आपली बाजू मांडू आणि नंतर गरज वाटल्यास राजीनामा देऊ असे कमाल यांनी म्हटले आहे. बांग्लादेशचा भारताने १०९ धावांनी पराभव केल्यानंतर बांग्लादेशमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला आणि पंचांच्या सुमार कामगिरीबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. बांग्लादेशचा फलंदाज महमुद्दुल्लाहचा झेल शिखर धवनने सीमारेषेनजीक पकडला, त्यावेळी त्याचा पाय रोपला लागल्याचा दावा बांग्लादेशप्रेमींनी केला आहे. तर रोहीत शर्मा ९० धावांवर असताना झेलबाद झाला होता, परंतु तो चेंडू नोबॉल ठरवण्यात आला. रोहीतने नंतर शतक झळकावले होते. बांग्लादेशच्या इतिहासातील तो सर्वात मोठा सामना होता आणि संपूर्ण देश त्याकडे डोळे लावून बसला होता. मात्र, बांग्लादेश हरल्यानंतर या पंचांच्या चुकांमुळेच तो हरल्याची भावना व्यक्त होत असून मुस्तफा कमाल व शेख हसीना दोघेही त्याच मताला आले आहेत.
याला असलेला आणखी एक पदर म्हणजे या सामन्यातील एक पंच आलीम दार होते, जे पाकिस्तानचे असून बांग्लादेशाच्या द्वेषापोटी त्यांनी भारताला अनुकूल अंपायरिंग केल्याचा बांग्लादेशींचा आक्षेप आहे. या सामन्याचे पडसाद बांग्लादेशमधल्या वृत्तपत्रांमध्येही उमटले आहेत. एका वृत्तपत्राने वादग्रस्त निर्णयांना वाघ बळी पडले असा मथळा दिलाय तर दुस-या एका वृत्तपत्राने पंचांच्या हेराफेरीमुळे स्वप्नवत वाटचाल भंगल्याचा मथळा दिला आहे.