शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

वेस्ट इंडिजकडून भारतीय गोलंदाजांची धुलाई, भारतासमोर 246 धावांचं आव्हान

By admin | Updated: August 27, 2016 21:04 IST

वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी प्रथम फलंदाजी मिळाल्याचा पुरेपूर फायदा घेत भारतीय गोलंदाजांची जोरदार धुलाई केली, भारतासमोर जिंकण्यासाठी भारतासमोर 246 धावांचं आव्हान आहे

- ऑनलाइन लोकमत 
फ्लोरिडा, दि. 27 - वेस्ट इंडीजला त्यांच्या मैदानावर कसोटी मालिकेत २-० ने नमविणारी टीम इंडिया टी 20 सामना जिंकण्याच्या हेतून मैदानात उतरली आहे. टॉस जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी प्रथम फलंदाजी मिळाल्याचा पुरेपूर फायदा घेत भारतीय गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. वेस्ट इंडिजने भारतासमोर 246 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताला जिंकण्यासाठी वेस्ट इंडिजप्रमाणेच स्फोटक फलंदाजी करावी लागणार आहे. 
 
वेस्ट इंडिजने सुरुवातीपासून भारतीय गोलंदाजांना वरचढ होऊ दिलं नाही. ओपनिंग करणा-या चार्ल्स आणि लुईसने पहिल्या विकेटसाठी 126 धावांची भागीदारी केली. पाचव्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवरच वेस्ट इंडिजच्या 50 धावा पुर्ण झाल्या होत्या. लुईसने तर फक्त 48 चेंडूत शतक पुर्ण केलं. वेस्ट इंडिजने 246 धावा केल्या आहेत. सुरुवातीला स्फोटक फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभारणारे वेस्ट इंडिजचे फलंदाज शेवटच्या ओव्हर्समध्ये धावा करण्यात अपयशी ठरले. शेवटच्या ओव्हरमध्ये वेस्ट इंडिजने आपल्या तीन विकेट्स गमावल्या. 245 धावांसोबत वेस्ट इंडिजने टी 20 मध्ये भारताविरोधातील सर्वोच्च धावसंख्येचा रेकॉर्ड केला आहे. 
 
भारतीय गोलंदाजांची कामगिरी निराशाजनक राहिली. रवींद्र जाडेजा आणि बुमराहने प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या तर भुवनेश्वरने एक विकेट घेतली.
 
शनिवार आणि रविवारी फ्लोरिडात दोन सामन्यांची मालिका होत असून दोन्ही संघांमधील रेकॉर्डवर नजर टाकल्यास आकडेवारीत विंडीजला झुकते माप आहे. दुसरीकडे कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ विजयी रथावर स्वार झालेला दिसतो. दोन्ही संघांत पाच टी-२० सामने झाले. त्यातील तीन विंडीजने तर २ भारताने जिंकले आहेत.
 
यंदा भारतात झालेल्या विश्वचषकात विंडीजकडून मुंबईत भारताला पराभवाचा धक्का बसला होता. त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी टीम इंडिया जखमी वाघाप्रमाणे तुटून पडणार आहे. भारताकडे दिग्गज खेळाडूंची उणीव नाही. कसोटी मालिका जिंकल्यानंतर आत्मविश्वास देखील उंचावला. विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन हे खेळाडू झटपट प्रकारातही उपयुक्त ठरू शकतात. भारताने अलीकडे आॅस्ट्रेलिया आणि लंकेविरुद्ध टी-२० त देखणी कामगिरी केली आहे. १४ सदस्यांच्या भारतीय संघात झालेला सर्वांत मोठा बदल म्हणजे कर्णधार बदलणे हा आहे. त्यामुळे विंडीजकडून विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये झालेल्या पराभवाची परतफेड यानिमित्ताने भारत करणार आहे.
 
अमेरिकेत मोठ्या संख्येने भारतीय लोक राहतात. यामुळे भारताला व्यापक पाठिंबा मिळेल. दुसरीकडे चांगल्या कामगिरीचेही दडपण राहणार आहे. धोनी आव्हान समर्थपणे पेलतो, पण गेल्या काही महिन्यांपासून तो मैदानाबाहेर होता, हे देखील नाकारता येणार नाही.