शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
3
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
4
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
5
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
7
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
8
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
9
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
10
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
11
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
12
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
13
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
14
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
15
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
16
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
18
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
19
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
20
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री

दुसरा ‘फ्लार्इंग सिख’ पाहण्याची इच्छा : मिल्खा सिंग

By admin | Updated: May 10, 2016 02:46 IST

रोम आॅलिम्पिकमधील माझ्या कामगिरीला आता सुमारे ५० वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. आपल्या भारत देशाची लोकसंख्या सुमारे १२० कोटींपर्यंत गेली, पण अजूनही दुसरा मिल्खा सिंग निर्माण होऊ शकला नाही

पुणे : रोम आॅलिम्पिकमधील माझ्या कामगिरीला आता सुमारे ५० वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. आपल्या भारत देशाची लोकसंख्या सुमारे १२० कोटींपर्यंत गेली, पण अजूनही दुसरा मिल्खा सिंग निर्माण होऊ शकला नाही, याची मला सारखी खंत वाटते आणि दु:ख होते. मी आता नव्वदीच्या घरात आहे. हे जग सोडण्यापूर्वी एखादा तरुण किंवा तरुणी मिल्खा सिंग बनेल आणि ट्रॅक अ‍ॅण्ड फिल्ड क्रीडाप्रकारात आपल्या देशाचा तिरंगा फडकावेल, अशी इच्छा आहे. हा सुदिन उजाडण्याचीच मी वाट पाहत आहे, असे भावपूर्ण उद्गार ‘फ्लार्इंग सिख’ मिल्खा सिंग यांनी काढले.कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित पुणे इंटरनॅशनल स्पोर्टस् एक्स्पोचा (पीआयएसई) रविवारी समारोप झाला. यानिमित्त रिओ आॅलिंपिकसाठी स्पर्धकांना शुभेच्छा देण्याचा, तसेच यशस्वी खेळाडू व प्रशिक्षकांचा सत्कार त्यांच्या हस्ते झाला. या वेळी मिल्खा यांनी आपल्या आयुष्यातील हृदयद्रावक आणि हृदयस्पर्शी आठवणींना उजाळा देताना उपस्थितांना हेलावून सोडले. व्यासपीठावर विशाल चोरडिया, मंदार ताम्हाणे उपस्थित होते.खेळाडूंना सल्ला देताना ते म्हणाले, की आमच्या पिढीने, तसेच पी. टी. उषा, अंजू जॉर्ज अशा खेळाडूंनी खूप मेहनत केली. आजच्या पिढीला मात्र झटपट यश हवे आहे आणि म्हणून अनेक जण ड्रग्ज घेतात, हे योग्य नाही. यामुळे अनेक स्पर्धांत आपली पदके काढून घेतली गेली. देशाची नाचक्की झाली. तरुण खेळाडूंनी ड्रग्जचा नव्हे, मेहनतीचा पर्याय निवडावा. पैशासाठी मॅच-फिक्सिंगही करू नये. फाळणीच्या रक्तरंजित इतिहासाचे साक्षीदार असलेल्या मिल्खा सिंग यांनी देशप्रेमाचा सल्ला दिला. जेथे जाल तेथे देशाचा लौकिक उंचावणारी कामगिरी करा. आपण फार मोठ्या संघर्षानंतर देश स्वतंत्र केला आहे. देशाच्या प्रतिमेला तडा जाऊ देऊ नका, असे ते म्हणाले.मिल्खा यांच्या हस्ते रिओ आॅलिंपिकला पात्र ठरलेला मल्ल नरसिंग यादव, रोर्इंगपटू दत्तू भोकनाळ यांच्यासह ईशा करवडे, तेजस्विनी मुळे, बालकल्याण संस्थेची गौरी गाडगीळ, वैष्णवी जगताप, पॅरा खेळाडू माधवी लता, भरत चव्हाण, बालकल्याणचे प्रशिक्षक अभिजित तांबे, अशोक नांगरे, गजानन पाटील, प्रवीण ढगे, राजेंद्र सापटे, धीरज मिश्रा, दीपाली निकम, बीईजीचे जगन्नाथ लकडे, सी. प्रकाश, सागर ठाकूर, अँथनी दास परेरा, तसेच राजू दाभाडे, राहुल राणे यांचा सत्कार करण्यात आला.नरसिंगने सांगितले, की रिओ आॅलिंपिकसाठी माझी चांगली तयारी सुरू आहे. देशासाठी सुवर्णपदक जिंकणे हेच एकमेव ध्येय आहे. दत्तू म्हणाला, की आॅलिंपिक म्हणून वेगळी स्पर्धा असा माझा दृष्टिकोन नाही. महाराष्ट्राचे आणि देशाचे नाव उंचावणारी कामगिरी करायची हाच निर्धार आहे. डॉ. विश्वजित कदम यांनी स्वागतपर भाषणात सांगितले, की आपल्या देशाचे अनेक खेळाडू कौटुंबिक पार्श्वभूमी खेळाची नसताना आणि उलट ती प्रतिकूल असताना यश मिळवित आहेत. अशा पराक्रमी खेळाडूंचा प्रातिनिधीक सत्कार करणे हा पीआयएसईचा बहुमान आहे. (क्रीडा प्रतिनिधी)