शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

पुन्हा एकदा ‘आॅलिम्पियाड’ खेळण्यास उत्सुक : विश्वनाथन आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 01:15 IST

‘मी १९८७ मध्ये भारताचा पहिला ग्रँडमास्टर झालो आणि आता भारतामध्ये ५० ग्रँडमास्टर आहेत. राखीव खेळाडू किंवा युवा खेळाडूंच्या दृष्टीने पाहिल्यास भारत जगातील एक मजबूत संघ आहे.

मुंबई : ‘मी १९८७ मध्ये भारताचा पहिला ग्रँडमास्टर झालो आणि आता भारतामध्ये ५० ग्रँडमास्टर आहेत. राखीव खेळाडू किंवा युवा खेळाडूंच्या दृष्टीने पाहिल्यास भारत जगातील एक मजबूत संघ आहे. त्यामुळे या सर्व खेळाडूंसाठी चांगल्या संधी निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे,’ असे नुकताच वर्ल्ड रॅपिड ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेचे जागतिक जेतेपद पटकावलेल्या विश्वनाथन आनंद याने सांगितले.रविवारी झालेल्या तिस-या मुंबई आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम दिवशी पारितोषिक समारंभाला उपस्थित असलेल्या आनंदने या वेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यंदा जॉर्जिया येथे होणा-या बुद्धिबळ आॅलिम्पियाड स्पर्धेत आनंद सहभागी होणार आहे. याआधी आनंदने २००६ मध्ये या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. यानंतर तो पहिल्यांदाच खेळणार आहे. याविषयी विचारले असता आनंदने म्हटले, ‘नक्कीच भारताला या स्पर्धेत पदकाची आशा आहे. या स्पर्धेतील आघाडीच्या ५-६ संघामध्ये भारताचा समावेश आहे. तरी आॅलिम्पियाड स्पर्धेचे स्वरूप आणि स्विस फॉर्मेटमुळे छोटी चूकही महागात पडू शकते. नक्कीच आपल्या पदक जिंकण्याची संधी आहे, पण एक संघ म्हणून खूप गोष्टी साध्य कराव्या लागतील.’सध्याच्या बुद्धिबळविषयी आनंदन म्हटले, ‘मी किशोरवयात असताना देशभरात सब-ज्युनिअर किंवा ज्युनिअर स्पर्धा खेळण्यासाठी टेÑनने प्रवास करायचो. नशिबाने मी वरिष्ठ पुरुष गटासाठी लवकर पात्रता मिळवली. सध्या आपल्याकडे युवा खेळाडूंची भक्कम फळी असून त्यांनी आपल्याहून सरस आणि मजबूत खेळाडूंविरुद्ध खेळण्याची परंपरा जपली आहे.’नुकताच झालेल्या वर्ल्ड रॅपिड ब्लिट्झ स्पर्धेतील जेतेपदाविषयी आनंदने म्हटले, ‘खरं सांगायचं तर या स्पर्धेआधी झालेल्या रॅपिड स्पर्धेतील माझ्या कामगिरीवर मी निराश होतो. मी जास्त रॅपिड स्पर्धा खेळलो नव्हतो, कारण मी क्लासिक प्रकारावर अधिक लक्ष केंद्रितकेले होते. त्यामुळे माझ्या खेळामध्ये थोडा बदलही झाला होता.त्यामुळे मी प्रयत्न करण्याचे ठरवले होते आणि कुठे चुकतोय हे शोधायचा चंग बांधला. त्यामुळे मला पुनरागमनाची आशा वाटू लागली. मी अनेक रॅपिड स्पर्धा खेळण्याचे ठरवले आणि पहिल्याच स्पर्धेत विजेता ठरल्याचे माझ्यासाठीही आश्चर्याचे ठरले. त्यामुळे प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास मी नेमकं काय केले हे मलाही माहीत नाही.’आॅलिम्पियाड खेळण्यासाठी मी खूप उत्साहित आहे. स्पर्धेत पुनरागमन करीत पुन्हा एकदा येथे खेळायला मिळणार यामुळे मी खूश आहे. या स्पर्धेचे काही नियम मला आवडत नाही, पण असे असले तरी आम्ही एक संघ म्हणून सकारात्मकतेने आॅलिम्पियाडमध्ये खेळू. भारतीय संघातील सर्वच खेळाडू चांगले असून त्यांनी याआधी २०१४ आणि २०१६ मध्ये या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती.