शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

पुन्हा एकदा ‘आॅलिम्पियाड’ खेळण्यास उत्सुक : विश्वनाथन आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 01:15 IST

‘मी १९८७ मध्ये भारताचा पहिला ग्रँडमास्टर झालो आणि आता भारतामध्ये ५० ग्रँडमास्टर आहेत. राखीव खेळाडू किंवा युवा खेळाडूंच्या दृष्टीने पाहिल्यास भारत जगातील एक मजबूत संघ आहे.

मुंबई : ‘मी १९८७ मध्ये भारताचा पहिला ग्रँडमास्टर झालो आणि आता भारतामध्ये ५० ग्रँडमास्टर आहेत. राखीव खेळाडू किंवा युवा खेळाडूंच्या दृष्टीने पाहिल्यास भारत जगातील एक मजबूत संघ आहे. त्यामुळे या सर्व खेळाडूंसाठी चांगल्या संधी निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे,’ असे नुकताच वर्ल्ड रॅपिड ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेचे जागतिक जेतेपद पटकावलेल्या विश्वनाथन आनंद याने सांगितले.रविवारी झालेल्या तिस-या मुंबई आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम दिवशी पारितोषिक समारंभाला उपस्थित असलेल्या आनंदने या वेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यंदा जॉर्जिया येथे होणा-या बुद्धिबळ आॅलिम्पियाड स्पर्धेत आनंद सहभागी होणार आहे. याआधी आनंदने २००६ मध्ये या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. यानंतर तो पहिल्यांदाच खेळणार आहे. याविषयी विचारले असता आनंदने म्हटले, ‘नक्कीच भारताला या स्पर्धेत पदकाची आशा आहे. या स्पर्धेतील आघाडीच्या ५-६ संघामध्ये भारताचा समावेश आहे. तरी आॅलिम्पियाड स्पर्धेचे स्वरूप आणि स्विस फॉर्मेटमुळे छोटी चूकही महागात पडू शकते. नक्कीच आपल्या पदक जिंकण्याची संधी आहे, पण एक संघ म्हणून खूप गोष्टी साध्य कराव्या लागतील.’सध्याच्या बुद्धिबळविषयी आनंदन म्हटले, ‘मी किशोरवयात असताना देशभरात सब-ज्युनिअर किंवा ज्युनिअर स्पर्धा खेळण्यासाठी टेÑनने प्रवास करायचो. नशिबाने मी वरिष्ठ पुरुष गटासाठी लवकर पात्रता मिळवली. सध्या आपल्याकडे युवा खेळाडूंची भक्कम फळी असून त्यांनी आपल्याहून सरस आणि मजबूत खेळाडूंविरुद्ध खेळण्याची परंपरा जपली आहे.’नुकताच झालेल्या वर्ल्ड रॅपिड ब्लिट्झ स्पर्धेतील जेतेपदाविषयी आनंदने म्हटले, ‘खरं सांगायचं तर या स्पर्धेआधी झालेल्या रॅपिड स्पर्धेतील माझ्या कामगिरीवर मी निराश होतो. मी जास्त रॅपिड स्पर्धा खेळलो नव्हतो, कारण मी क्लासिक प्रकारावर अधिक लक्ष केंद्रितकेले होते. त्यामुळे माझ्या खेळामध्ये थोडा बदलही झाला होता.त्यामुळे मी प्रयत्न करण्याचे ठरवले होते आणि कुठे चुकतोय हे शोधायचा चंग बांधला. त्यामुळे मला पुनरागमनाची आशा वाटू लागली. मी अनेक रॅपिड स्पर्धा खेळण्याचे ठरवले आणि पहिल्याच स्पर्धेत विजेता ठरल्याचे माझ्यासाठीही आश्चर्याचे ठरले. त्यामुळे प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास मी नेमकं काय केले हे मलाही माहीत नाही.’आॅलिम्पियाड खेळण्यासाठी मी खूप उत्साहित आहे. स्पर्धेत पुनरागमन करीत पुन्हा एकदा येथे खेळायला मिळणार यामुळे मी खूश आहे. या स्पर्धेचे काही नियम मला आवडत नाही, पण असे असले तरी आम्ही एक संघ म्हणून सकारात्मकतेने आॅलिम्पियाडमध्ये खेळू. भारतीय संघातील सर्वच खेळाडू चांगले असून त्यांनी याआधी २०१४ आणि २०१६ मध्ये या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती.