शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
6
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
7
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
8
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
9
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
10
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
11
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
12
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
13
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
14
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
15
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
16
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
17
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

विराटच्या नाबाद शतकामुळे पहिल्या दिवसाचा खेळ २६७ वर थांबला

By admin | Updated: October 8, 2016 19:02 IST

कर्णधार कोहलीचे शतक (१०२) व रहाणेच्या (७९) संयमी खेळीमुळे न्युझीलंडविरुद्धच्या तिस-या कसोटीत भारताने पहिल्या दिवशी ३ गडी गमावून २६७ धावा केल्या.

ऑनलाइन लोकमत 

इंदूर, दि. ८ -  कर्णधार कोहलीचे शतक (१०२) व रहाणेच्या (७९) संयमी खेळीमुळे न्युझीलंडविरुद्धच्या तिस-या कसोटीत भारताने पहिल्या दिवशी ३ गडी गमावून २६७ धावा केल्या आहेत. कर्णधार विराट कोहलीनेअजिंक्य रहाणेच्या साथीने भारताच्या डावाला आकार दिला. कोहलीचं कसोटी कारकीर्दीतलं हे एकूण तेरावं आणि न्यूझीलंडविरुद्धचं तिसरं शतक ठरलं आहे. कोहली आणि अजिंक्य रहाणेने चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचून भारताच्या डावाला आकार दिला. पहिल्या दिवसाच्या अखेर भारताने 3 विकेट्स गमावत 267 धावा केल्या आहेत.
 
नाणफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणा-या भारताला चौथ्या षटकातच मुरली विजयच्या रुपाने (१०) पहिला धक्का बसला. त्यानंतर गंभीर व चेतेश्वर पुजारा सेट झालेले असतानाचा २९ धावांवर खेळणार गंभीरही बाद झाला.  कर्णधार विराट कोहलीने  चेतेश्वर पूजाराच्या सहाय्याने डाव सावरला, मात्र पुजारा ४१ धावांवर खेळत असतानाच डावखुरा फिरकी गोलंदाज सँटनरने एका अप्रतिम चेंडूवर त्याला क्लीन बोल्ड केले.  न्युझीलंडतर्फे बोल्ट, पटेल व सँटनरने प्रत्येकी एक बळी टिपला. 
 
मालिकेत २-० अशी विजयी आघाडी असणा-या भारतीय संघाला क्लीनस्वीप विजय मिळवण्याची संधी आहे. सलग दोन विजयांमुळे पाकिस्तानला पिछाडीवर सोडत भारताने कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले आहे. न्यूझीलंडच्या फिरकीपटूंना भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवता आले नाही.