शहरं
Join us  
Trending Stories
1
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
2
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
3
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
4
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
5
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
6
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
7
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
8
Rana Daggubati Weight Loss: नॉनव्हेज पूर्ण बंद, मीठ कमी आणि...; तब्बल ३० किलो वजन घटवण्याचा 'भल्लालदेव' फॉर्म्युला
9
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
10
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
11
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
12
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
13
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
14
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
15
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
16
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
17
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
18
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
19
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
20
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
Daily Top 2Weekly Top 5

विराटसेनेला फाजील आत्मविश्वास नडला!

By admin | Updated: June 19, 2017 00:52 IST

शेवटी ज्याची भीती वाटत होती तेच झालं. फॉर्मने दगा दिला, नशिबानं साथ सोडली. अन् नजरेसमोर असलेली चॅम्पियन्स ट्रॉफी आपण गमावली

बाळकृष्ण परब, ऑनलाइन लोकमतशेवटी ज्याची भीती वाटत होती तेच झालं. फॉर्मने दगा दिला, नशिबानं साथ सोडली. अन् नजरेसमोर असलेली चॅम्पियन्स ट्रॉफी आपण गमावली. बेभरवशाचा आणि धोकादायक असलेल्या पाकिस्तानी संघाने आपल्याला धोबीपछाड दिला. कुणाच्या ध्यानिमनी नसलेला पाकिस्तानी संघ खेळाच्या तिन्ही क्षेत्रात आपल्याला वरचढ ठरला. पाकिस्तानला हरवूच असा विश्वास असल्याने सेलिब्रेशनची जंगी तयारी झाली होती, पण घात झाला. संपूर्ण देश दुःखात बुडाला. अंतिम लढतीत पराभव, तोही पाकिस्तानकडून स्वीकारावा लागल्याने हा पराभव जिव्हारी लागलाय. भारत ही लढत पराभूत होऊ शकतो, असे कुणाच्या मनातही आले नसेल,पण विराटसेनेसाठी या लढतीत काहीच चांगले झाले नाही. अंतिम लढतीपूर्वी आपला आत्मविश्वास शिखरावर होता. संपूर्ण संघात चिंता करावी अशी काहीच गोष्ट नव्हती. नाणेफेकीचा कौलही आपल्या बाजूने लागला. इथपर्यंत सारे काही आलबेल होते. पण पुढे भारतीय खेळाडू काहीसे बेफिकीरपणे खेळले. त्यात बुमराहच्या गोलंदाजीवर फकर जमानला नोबॉलमुळे जीवदान मिळाले आणि आपले नशीब फिरले. नोबॉल पडले, गोलंदाजी स्वैर झाली. फलंदाजी करताना चुकीच्या वेळी विकेट पडल्या. ओव्हलच्या खेळपट्टीत चिंता करण्यासारखे काहीच नव्हते. पण फलंदाजीतील अतिआत्मविश्वास नडला. मग एक दोन विकेट पडताच धावांच्या दबावासमोर आपले फलंदाज कोलमडले. सुरुवातीलाच सेनापती धारातीर्थी पडल्यावर आपल्या फलंदाजांनी हरी ओम विठ्ठला म्हणत खेळपट्टी ते पॅव्हेलियनची वारी सुरू केली. फटकेबाजी करत असलेल्या पांड्याला जडेजाने सात जन्माचे वैर असल्यासारखे धावचीत करून घातले. बाकी पाकिस्तानने फायनलमध्ये चांगला खेळ केला. त्यांची क्षमता जोखण्यात आपण कमी पडलो. ते या लढतीत फेवरेट नव्हते, त्यामुळे बिनधास्त खेळले. त्यांचा फकर जमान मियाँदादची बॅट घेऊन आल्यासारखा खेळला, तर मोहम्मद आमीरच्या भन्नाट स्पेलने अक्रम, वकारच्या स्पेलची आठवण ताजी केली. पाकिस्तानी खेळाडू भारताविरुद्ध जिद्दीने खेळतात, हे आज त्यांनी पुन्हा एटदा दाखवून दिले. यात विशेष कौतुक करावे लागेल ते पाकिस्ताचा कर्णधार सर्फराझ अहमदचे. सलामीलाच भारताकडून हरल्यावर त्याने संघाला उभारी दिली. गरज असताना स्वतःही चांगली फलंदाजी केली. डीआरएसचा चातूर्याने वापर केला आणि अखेर पाकिस्तानला पहिल्यांदाच चॅम्पियन्स करंडक जिंकून दिला.आजच्या सामन्याने अधोरेखित केलेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे क्रिकेटमध्ये खेळापेक्षा मोठा कुणीच होऊ शकत नाही. तुम्ही कुणाला गृहित धरू शकत नाही आणि अमकाच संघ जिंकेल, असे छातीठोकपणे सांगू शकत नाही. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ संपूर्ण स्पर्धेत चांगला खेळला. पण आजचा दिवस आपला नव्हताच. आपण आज हरलो म्हणून आपल्या खेळाडूंवर राग काढण्यात काहीच अर्थ नाही. खेळ आहे, जय-पराजय काय होतच राहतील. सध्या गरज आहे ती विराटसेनेला साथ देण्याची.