शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

विराटसेनेला फाजील आत्मविश्वास नडला!

By admin | Updated: June 19, 2017 00:52 IST

शेवटी ज्याची भीती वाटत होती तेच झालं. फॉर्मने दगा दिला, नशिबानं साथ सोडली. अन् नजरेसमोर असलेली चॅम्पियन्स ट्रॉफी आपण गमावली

बाळकृष्ण परब, ऑनलाइन लोकमतशेवटी ज्याची भीती वाटत होती तेच झालं. फॉर्मने दगा दिला, नशिबानं साथ सोडली. अन् नजरेसमोर असलेली चॅम्पियन्स ट्रॉफी आपण गमावली. बेभरवशाचा आणि धोकादायक असलेल्या पाकिस्तानी संघाने आपल्याला धोबीपछाड दिला. कुणाच्या ध्यानिमनी नसलेला पाकिस्तानी संघ खेळाच्या तिन्ही क्षेत्रात आपल्याला वरचढ ठरला. पाकिस्तानला हरवूच असा विश्वास असल्याने सेलिब्रेशनची जंगी तयारी झाली होती, पण घात झाला. संपूर्ण देश दुःखात बुडाला. अंतिम लढतीत पराभव, तोही पाकिस्तानकडून स्वीकारावा लागल्याने हा पराभव जिव्हारी लागलाय. भारत ही लढत पराभूत होऊ शकतो, असे कुणाच्या मनातही आले नसेल,पण विराटसेनेसाठी या लढतीत काहीच चांगले झाले नाही. अंतिम लढतीपूर्वी आपला आत्मविश्वास शिखरावर होता. संपूर्ण संघात चिंता करावी अशी काहीच गोष्ट नव्हती. नाणेफेकीचा कौलही आपल्या बाजूने लागला. इथपर्यंत सारे काही आलबेल होते. पण पुढे भारतीय खेळाडू काहीसे बेफिकीरपणे खेळले. त्यात बुमराहच्या गोलंदाजीवर फकर जमानला नोबॉलमुळे जीवदान मिळाले आणि आपले नशीब फिरले. नोबॉल पडले, गोलंदाजी स्वैर झाली. फलंदाजी करताना चुकीच्या वेळी विकेट पडल्या. ओव्हलच्या खेळपट्टीत चिंता करण्यासारखे काहीच नव्हते. पण फलंदाजीतील अतिआत्मविश्वास नडला. मग एक दोन विकेट पडताच धावांच्या दबावासमोर आपले फलंदाज कोलमडले. सुरुवातीलाच सेनापती धारातीर्थी पडल्यावर आपल्या फलंदाजांनी हरी ओम विठ्ठला म्हणत खेळपट्टी ते पॅव्हेलियनची वारी सुरू केली. फटकेबाजी करत असलेल्या पांड्याला जडेजाने सात जन्माचे वैर असल्यासारखे धावचीत करून घातले. बाकी पाकिस्तानने फायनलमध्ये चांगला खेळ केला. त्यांची क्षमता जोखण्यात आपण कमी पडलो. ते या लढतीत फेवरेट नव्हते, त्यामुळे बिनधास्त खेळले. त्यांचा फकर जमान मियाँदादची बॅट घेऊन आल्यासारखा खेळला, तर मोहम्मद आमीरच्या भन्नाट स्पेलने अक्रम, वकारच्या स्पेलची आठवण ताजी केली. पाकिस्तानी खेळाडू भारताविरुद्ध जिद्दीने खेळतात, हे आज त्यांनी पुन्हा एटदा दाखवून दिले. यात विशेष कौतुक करावे लागेल ते पाकिस्ताचा कर्णधार सर्फराझ अहमदचे. सलामीलाच भारताकडून हरल्यावर त्याने संघाला उभारी दिली. गरज असताना स्वतःही चांगली फलंदाजी केली. डीआरएसचा चातूर्याने वापर केला आणि अखेर पाकिस्तानला पहिल्यांदाच चॅम्पियन्स करंडक जिंकून दिला.आजच्या सामन्याने अधोरेखित केलेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे क्रिकेटमध्ये खेळापेक्षा मोठा कुणीच होऊ शकत नाही. तुम्ही कुणाला गृहित धरू शकत नाही आणि अमकाच संघ जिंकेल, असे छातीठोकपणे सांगू शकत नाही. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ संपूर्ण स्पर्धेत चांगला खेळला. पण आजचा दिवस आपला नव्हताच. आपण आज हरलो म्हणून आपल्या खेळाडूंवर राग काढण्यात काहीच अर्थ नाही. खेळ आहे, जय-पराजय काय होतच राहतील. सध्या गरज आहे ती विराटसेनेला साथ देण्याची.