शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

विराटसेनेला फाजील आत्मविश्वास नडला!

By admin | Updated: June 19, 2017 00:52 IST

शेवटी ज्याची भीती वाटत होती तेच झालं. फॉर्मने दगा दिला, नशिबानं साथ सोडली. अन् नजरेसमोर असलेली चॅम्पियन्स ट्रॉफी आपण गमावली

बाळकृष्ण परब, ऑनलाइन लोकमतशेवटी ज्याची भीती वाटत होती तेच झालं. फॉर्मने दगा दिला, नशिबानं साथ सोडली. अन् नजरेसमोर असलेली चॅम्पियन्स ट्रॉफी आपण गमावली. बेभरवशाचा आणि धोकादायक असलेल्या पाकिस्तानी संघाने आपल्याला धोबीपछाड दिला. कुणाच्या ध्यानिमनी नसलेला पाकिस्तानी संघ खेळाच्या तिन्ही क्षेत्रात आपल्याला वरचढ ठरला. पाकिस्तानला हरवूच असा विश्वास असल्याने सेलिब्रेशनची जंगी तयारी झाली होती, पण घात झाला. संपूर्ण देश दुःखात बुडाला. अंतिम लढतीत पराभव, तोही पाकिस्तानकडून स्वीकारावा लागल्याने हा पराभव जिव्हारी लागलाय. भारत ही लढत पराभूत होऊ शकतो, असे कुणाच्या मनातही आले नसेल,पण विराटसेनेसाठी या लढतीत काहीच चांगले झाले नाही. अंतिम लढतीपूर्वी आपला आत्मविश्वास शिखरावर होता. संपूर्ण संघात चिंता करावी अशी काहीच गोष्ट नव्हती. नाणेफेकीचा कौलही आपल्या बाजूने लागला. इथपर्यंत सारे काही आलबेल होते. पण पुढे भारतीय खेळाडू काहीसे बेफिकीरपणे खेळले. त्यात बुमराहच्या गोलंदाजीवर फकर जमानला नोबॉलमुळे जीवदान मिळाले आणि आपले नशीब फिरले. नोबॉल पडले, गोलंदाजी स्वैर झाली. फलंदाजी करताना चुकीच्या वेळी विकेट पडल्या. ओव्हलच्या खेळपट्टीत चिंता करण्यासारखे काहीच नव्हते. पण फलंदाजीतील अतिआत्मविश्वास नडला. मग एक दोन विकेट पडताच धावांच्या दबावासमोर आपले फलंदाज कोलमडले. सुरुवातीलाच सेनापती धारातीर्थी पडल्यावर आपल्या फलंदाजांनी हरी ओम विठ्ठला म्हणत खेळपट्टी ते पॅव्हेलियनची वारी सुरू केली. फटकेबाजी करत असलेल्या पांड्याला जडेजाने सात जन्माचे वैर असल्यासारखे धावचीत करून घातले. बाकी पाकिस्तानने फायनलमध्ये चांगला खेळ केला. त्यांची क्षमता जोखण्यात आपण कमी पडलो. ते या लढतीत फेवरेट नव्हते, त्यामुळे बिनधास्त खेळले. त्यांचा फकर जमान मियाँदादची बॅट घेऊन आल्यासारखा खेळला, तर मोहम्मद आमीरच्या भन्नाट स्पेलने अक्रम, वकारच्या स्पेलची आठवण ताजी केली. पाकिस्तानी खेळाडू भारताविरुद्ध जिद्दीने खेळतात, हे आज त्यांनी पुन्हा एटदा दाखवून दिले. यात विशेष कौतुक करावे लागेल ते पाकिस्ताचा कर्णधार सर्फराझ अहमदचे. सलामीलाच भारताकडून हरल्यावर त्याने संघाला उभारी दिली. गरज असताना स्वतःही चांगली फलंदाजी केली. डीआरएसचा चातूर्याने वापर केला आणि अखेर पाकिस्तानला पहिल्यांदाच चॅम्पियन्स करंडक जिंकून दिला.आजच्या सामन्याने अधोरेखित केलेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे क्रिकेटमध्ये खेळापेक्षा मोठा कुणीच होऊ शकत नाही. तुम्ही कुणाला गृहित धरू शकत नाही आणि अमकाच संघ जिंकेल, असे छातीठोकपणे सांगू शकत नाही. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ संपूर्ण स्पर्धेत चांगला खेळला. पण आजचा दिवस आपला नव्हताच. आपण आज हरलो म्हणून आपल्या खेळाडूंवर राग काढण्यात काहीच अर्थ नाही. खेळ आहे, जय-पराजय काय होतच राहतील. सध्या गरज आहे ती विराटसेनेला साथ देण्याची.