ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. १६ - विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सवर रॉयल चॅलेंजर्स बॅँगलोरने ९ गड्यांनी विराट विजय मिळवत स्पर्धेतील आपले आव्हान जिवंत ठेवले . केकेआरने दिलेले १८४ धावांचे आव्हान आरसीबीने १९ षटकात ९ गड्यांच्या मोबदल्यात पार केले.
कर्णधार विराट कोहलीने शानदार फटकेबाजी करताना ५१ चेंडूत ३ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ७५धावांची तुफानी खेळी केली. ख्रिस गेल आणि विराट यांनी ७.३ षटकात ७१ धावांची धमाकेदार सलामी दिली. गेलने आज प्रथमच दोन आकडी धावसंख्या पार केली. त्याने ३१ चेंडूत ४ गगनचुंबी षटकार आणि ५ खणखणीत चौकार लगावत ४९ धावांचे योगदान दिले. गेल बाद झाल्यानंतर केकेआरच्या विजयाच्या आश्या एबीने धुळीस मिळवल्या. एबीने कोहलीसोबतत दुसऱ्या विकेटसाठी नाबाद ११ षटकात ११५ धावांची भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिली. एबीने ३१ चेंडूत ५९ धावांची खेळी करत धमाका केला.
त्यापुर्वी, कोलकाता नाईट रायडर्स संघाने निर्धारित २० षटकात ५ गड्यांच्या मोबदल्यात १८३ धावांचा डोंगर उभा केला. कडून कर्णधार गौतम गंभारने ३४ चेंडूत ५१ धावांची खेळी केली. त्याचप्रमाणे मनिष पांडे यांने आपला झंझावत दाखवताना ३५ चेंडूत २ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ५० धावा झळकावल्या. केकेआर २०० धावांचा टप्पा पार करणार असे वाटत असतानाच मोक्याच्या वेळी फलंदाजांनी आपल्या विकेट गांदाजांना बहाल केल्यामुळे १८३ धावापर्यंतच मजल मारता आली. अष्टपैलू रसेलने हाणामारीच्या षटकात १९ चेंडूत ३ गगनचुंबी षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने ३९ धावांचे म्हत्वपुर्ण योगदान दिले. उथप्पा २, पठाण ६ आणि सुर्यकुमार ५ यांना आपल्या लौक्कास साजेशी खेळी करण्यात अपयश आले. शकिबने ११ चेंडूत १८ धावांचे योगदान दिले. आरसीबीकडून एस. अरविंद २ आणि इक्बाल अब्दुला , चहलने प्रत्येकी एक विकेट घेतली.