शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

VIDEO: विराटच अव्वल, संघासाठी ड्रिंक्स घेऊन मैदानात धाव

By admin | Updated: March 25, 2017 13:06 IST

ऑस्ट्रिलेयाविरोधात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात जेव्हा ड्रिंक्स ब्रेक पुकारण्यात आला तेव्हा स्टेडिअमवर उपस्थित असलेल्या सर्वांचं लक्ष भारतीय संघासाठी ड्रिंक्स घेऊन धावणा-या विराट कोहलीकडे होतं

ऑनलाइन लोकमत
धरमशाला, दि. 25 - ऑस्ट्रिलेयाविरोधात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात जेव्हा ड्रिंक्स ब्रेक पुकारण्यात आला तेव्हा हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर उपस्थित असलेल्या सर्वांचं लक्ष भारतीय संघासाठी ड्रिंक्स घेऊन धावणा-या खेळाडूकडे होतं. कारण तो दुसरा कोणी नाही तर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली होता. आपली ही नवीन भूमिका विराट कोहलीला आवडली असून त्याचा फायदा तो संघासाठी करत आहे. 
 
 
खांद्याला दुखापत झाल्याने ऑस्ट्रेलियाविरोधातील चौथ्या कसोटी सामन्यातून माघार घेतलेल्या भारतीय कर्णधार विराट कोहलीने यावरुन पुन्हा एकदा आपणच अव्वल असल्याचं सिद्ध केलं आहे. आपण खेळत नसलो तरी संघाला वेळोवेळी लागणारे सल्ले तसंच आपलं योगदान देण्यामध्ये विराट अजिबात मागे नाही. यासाठीच जेव्हा ड्रिंक्स ब्रेक झाला तेव्हा संघासाठी ड्रिंक्स घेऊन विराट कोहलीने मैदानात धाव घेतली. ड्रिंक्स ब्रेकचा फायदा घेत विराट कोहलीने अजिंक्य रहाणेला काही महत्वाचे सल्लेही दिले. यावरुन विराट कोहलीची खेळभावना दिसत असून एक कर्णधार म्हणून तो किती योग्य आहे हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. 

 
इतकंच नाही तर त्याच्या जागी स्थान मिळालेल्या कुलदीप यादवने जेव्हा डेव्हिड वॉर्नरची विकेट घेत आपल्या टेस्ट करिअरमधली पहिली विकेट मिळवली. तेव्हा सीमारेषेवर उभ्या असलेल्या कुलदीप यादवसाठी विराट ड्रिंक्स घेऊन गेला आणि महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. 
 
मालिकेचा निकाल ठरवणा-या चौथ्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का लवकर बसला पण त्यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथ (79) आणि सलामीवीर डेव्हीड वॉर्नर (56) यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. दोघांनी दुस-या विकेटसाठी134 धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाने आपल्या तीन विकेट्स गमावल्या आहेत. 
 
चार सामन्यांच्या मालिकेचा निकाल ठरविणा-या निर्णायक कसोटी सामन्याआधीच विराट कोहली खेळणार नसल्याने भारताला खूप मोठा धक्का बसला. खांद्याच्या दुखापतीमुळे त्याला आराम देण्यात आला आहे. विराट कोहली खेळणार नसल्याने उप कर्णधार अजिंक्य रहाणेकडे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान विराट कोहलीऐवजी भारतीय संघात गोलंदाज कुलदीप यादवला संधी देण्यात आली. या सामन्यातून कुलदीप यादवने पदार्पण केलं आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.