शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

दुर्दैव... 'बजरंगा'ची कमाल, पण विराटची झाली धमाल; कुस्तीपेक्षा क्रिकेटलाच झुकतं माप

By स्वदेश घाणेकर | Updated: September 21, 2018 16:58 IST

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन. खेलरत्न विराट कोहली वगळता. त्याला कारणच तस आहे...

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन. खेलरत्न विराट कोहली वगळता. त्याला कारणच तस आहे... पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड ( ऑलिम्पिक पदकविजेते) हे देशात क्रीडा क्रांती घडवू पाहात आहेत. त्यासाठी त्यांनी ' Khelo India' या गोड नावाची संकल्पना आणली.. खेळाडूंच्या प्रत्येक पदकाचे कौतुक समारंभ केले. आशियाई स्पर्धेतील पदकविजेत्या खेळाडूंना एका समारंभात बोलावून त्यांना ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न पाहण्यास सांगितले... परंतु काल जाहीर झालेल्या राष्ट्रीय पुरस्काराच्या घोषणेनंतर जरा शंका उपस्थित करण्यास भाग पाडले.. 

२०१८ च्या राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी वेटलिफ्टर मीराबाई चानू आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आपल्याला मिळावा असे प्रत्येकाला वाटते आणि त्यासाठी प्रत्येक जण प्रचंड मेहनत घेतो. त्यामुळे या पुरस्कारासाठी ही दोन नाव जाहीर झाल्यावर कोणीतरी दुखी होणं साहजिकच होते. तसे झालेही... राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदकविजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया नाराज झाला आणि त्याने त्वरित न्यायालयात जाण्याची भाषा केली.. 

त्याने मीराबाई किंवा विराट यापैकी कोणावरही आक्षेप नोंदवला नाही, परंतु यंदाचा पुरस्कार हा त्याला मिळायला हवा होता.. ही भावना खरी आहे. राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेत त्याने भारताला सुवर्णपदक जिंकून दिले. ही कामगिरी या पदकासाठीच्या नियमानुसार पुरेशी आहे. पण या देशात अजूनही क्रिकेटला महत्त्व आहे आणि विराटला मिळालेला हा पुरस्कार हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे.. ऑलिम्पिक, आशियाई, राष्ट्रकुल, विश्वचषक आणि जागतिक अजिंक्यपद अशा चार वर्षांतून एकदा घेतल्या जाणाऱ्या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला हा पुरस्कार प्राधान्याने मिळायला हवा. मग विराटने यापैकी कोणते पुरस्कार जिंकले?? चला ऑलिम्पिक, आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेट नाही असे ग्राह्य धरूया.. या व्यतिरिक्त विराट कोणत्या कामगिरीच्या जोरावर खेलरत्न साठी पात्र ठरला? त्याने भारताला कोणती ऐतिहासिक स्पर्धी जिंकून दिली? जरा विचार करा आणि खर सांगा, की विराट कोहली या 'ब्रँड'समोर बजरंग पुनियाचे उल्लेखनीय कर्तृत्व खुजे ठरले का? 

टॅग्स :Virat Kohliविराट कोहलीWrestlingकुस्ती