शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

तिरंगी

By admin | Updated: January 23, 2015 01:03 IST

विश्वकप क्रिकेट

विश्वकप क्रिकेट
भारताच्या तयारीला धक्का
सिडनी : तिंरगी मालिका म्हणजे पुढच्या महिन्यात प्रारंभ होणाऱ्या वन-डे विश्वकप स्पर्धेची पूर्वतयारी मानल्या जात होते, पण भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड व ऑस्ट्रेलियाचा समावेश असलेल्या या तिरंगी मालिकेत संघाची निवड करण्याच्या मुद्यावर संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वन-डे विश्वकप स्पर्धेसाठी संघाचा समतोल साधण्यात अद्याप भारतीय संघाला यश आलेले नाही. ऑस्ट्रेलिया व इंग्लंडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघाच्या विश्वकप स्पर्धेच्या तयारीला धक्का बसला आहे.
तिंरगी मालिका म्हणजे विश्वकप स्पर्धेची पूर्वतयारी मानल्या जात होते, पण सध्याची स्थिती लक्षात घेता भारतीय संघ तिरंगी मालिकेच्या अंतिम लढतीत स्थान मिळविण्यासाठी संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे. वन-डे क्रिकेटमध्ये दोन नव्या चेंडूंचा नियम लागू झाल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी संघात सात फलंदाजांना संधी देण्यासाठी घाबरत आहे. आता भिस्त पाच स्पेशालिस्ट गोलंदाजांवर असून कामचलावू गोलंदाजांवर विसंबून राहणे आता कमी झाले आहे. आता भारतीय संघ वन-डेमध्ये सहा फलंदाजांसह खेळणारा संघ म्हणून ओळख निर्माण करीत आहे. त्यामुळे धोनी सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना सामना संपविण्याच्या क्षमतेवर लक्ष केंद्रित करीत आहे. सुरेश रैनावर पाचव्या क्रमांवर फलंदाजी करताना दडपण वाढले आहे. भारताने मधल्या फळीमध्ये काही बदल केले आहेत. विराट कोहलीला त्याच्या आवडीच्या तिसऱ्या क्रमांकाऐवजी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठविण्यात येत आहे. आघाडीच्या फळीची जबाबदारी शिखर धवन, रोहित शर्मा व अजिंक्य रहाणे यांच्यावर आहे. त्यापैकी केवळ रोहित शर्मा हाच चांगल्या फॉर्मात आहे. भारताला दुखापग्रस्त रवींद्र जडेजाची उणीव भासत आहे. गेल्या दोन वर्षांत संघव्यवस्थापनने जडेजाला सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी तयार केले आहे. त्यानंतर आर. अश्विन व भुवनेश्वर कुमार फलंदाजीला येतात. ते फलंदाजीमध्ये थोडे योगदान देण्यास सक्षम आहेत, अष्टपैलू जडेजा फिट झाल्यानंतरच पुनरागमन करू शकेल. त्यामुळे युवा अक्षर पटेलची जडेजाचा पर्याय म्हणून चाचपणी करण्यात येत आहे.