शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

तिरंगी

By admin | Updated: January 23, 2015 01:03 IST

विश्वकप क्रिकेट

विश्वकप क्रिकेट
भारताच्या तयारीला धक्का
सिडनी : तिंरगी मालिका म्हणजे पुढच्या महिन्यात प्रारंभ होणाऱ्या वन-डे विश्वकप स्पर्धेची पूर्वतयारी मानल्या जात होते, पण भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड व ऑस्ट्रेलियाचा समावेश असलेल्या या तिरंगी मालिकेत संघाची निवड करण्याच्या मुद्यावर संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वन-डे विश्वकप स्पर्धेसाठी संघाचा समतोल साधण्यात अद्याप भारतीय संघाला यश आलेले नाही. ऑस्ट्रेलिया व इंग्लंडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघाच्या विश्वकप स्पर्धेच्या तयारीला धक्का बसला आहे.
तिंरगी मालिका म्हणजे विश्वकप स्पर्धेची पूर्वतयारी मानल्या जात होते, पण सध्याची स्थिती लक्षात घेता भारतीय संघ तिरंगी मालिकेच्या अंतिम लढतीत स्थान मिळविण्यासाठी संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे. वन-डे क्रिकेटमध्ये दोन नव्या चेंडूंचा नियम लागू झाल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी संघात सात फलंदाजांना संधी देण्यासाठी घाबरत आहे. आता भिस्त पाच स्पेशालिस्ट गोलंदाजांवर असून कामचलावू गोलंदाजांवर विसंबून राहणे आता कमी झाले आहे. आता भारतीय संघ वन-डेमध्ये सहा फलंदाजांसह खेळणारा संघ म्हणून ओळख निर्माण करीत आहे. त्यामुळे धोनी सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना सामना संपविण्याच्या क्षमतेवर लक्ष केंद्रित करीत आहे. सुरेश रैनावर पाचव्या क्रमांवर फलंदाजी करताना दडपण वाढले आहे. भारताने मधल्या फळीमध्ये काही बदल केले आहेत. विराट कोहलीला त्याच्या आवडीच्या तिसऱ्या क्रमांकाऐवजी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठविण्यात येत आहे. आघाडीच्या फळीची जबाबदारी शिखर धवन, रोहित शर्मा व अजिंक्य रहाणे यांच्यावर आहे. त्यापैकी केवळ रोहित शर्मा हाच चांगल्या फॉर्मात आहे. भारताला दुखापग्रस्त रवींद्र जडेजाची उणीव भासत आहे. गेल्या दोन वर्षांत संघव्यवस्थापनने जडेजाला सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी तयार केले आहे. त्यानंतर आर. अश्विन व भुवनेश्वर कुमार फलंदाजीला येतात. ते फलंदाजीमध्ये थोडे योगदान देण्यास सक्षम आहेत, अष्टपैलू जडेजा फिट झाल्यानंतरच पुनरागमन करू शकेल. त्यामुळे युवा अक्षर पटेलची जडेजाचा पर्याय म्हणून चाचपणी करण्यात येत आहे.