शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

Tokyo Olympics 2020: टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत पी व्ही सिंधू पटकावणार 'गोल्ड'; पुल्लेला गोपिचंद यांना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 17:07 IST

Tokyo Olympics 2020: टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत  भारतीय खेळाडू दुहेरी आकड्यात पदक पटकावतील असा विश्वास भारताच्या बॅडमिंटन संघाचे प्रमुख पुल्लेला गोपिचंद यांनी व्यक्त केला आहे.

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत  भारतीय खेळाडू दुहेरी आकड्यात पदक पटकावतील असा विश्वास भारताच्या बॅडमिंटन संघाचे प्रमुख पुल्लेला गोपिचंद यांनी व्यक्त केला आहे. या पदक विजेत्या खेळाडूंमध्ये जागतिक विजेती पी व्ही सिंधू ही 'गोल्ड'ची मानकरी असेल असा दावा त्यांनी केला. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे आतापर्यंतचे सर्वात मोठे ( 120 खेळाडू) पथक दाखल झाले आहे. शुक्रवारपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

गोपिचंद म्हणाले,''आतापर्यंत झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धांपेक्षा यंदा भारताची पदकसंख्या ही सर्वाधिक असेल, असा विश्वास मला आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये आपण 6 पदकं जिंकली होती आणि तो विक्रम यंदा मोडला जाईल. यंदा पदकांची संख्या दुहेरी होईल, असेही मला वाटते. कारण, खेळाडूंना अऩेकांचा पाठींबा आणि सरकारकडून मदत मिळाली आहे. त्यामुळे खेळाडूंनी आणखी पदक पटकावल्यास, हा मदतीचा ओघ आणखी वाढेल.''

''नेमबाजी, कुस्ती, बॉक्सिंग आणि वेटलिफ्टिंग, यांच्याकडून अधिक अपेक्षा आहेत,''  Heartfulness Institute आणि  Dhyana यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित वेबिनारमध्ये ते बोलत होते. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय संघाचे ते अधिकृत मेडिटेशन पार्टनर आहेत. गोपिचंद यांनी सायना नेहवाल व सिंधू यांना मार्गदर्शन दिले. सायनानं ऑलिम्पिकमध्ये कांस्य, तर सिंधूनं रौप्यपदकाची कमाई केली. यंदाही सिंधूला सुवर्ण जिंकण्याची संधी आहे.

''रिओ आणि लंडन ऑलिम्पिकपेक्षा यंदा बॅडमिंटनमध्ये अधिक चांगली संधी आहे. सिंधू यंदा सुवर्णपदक जिंकेल, याची मला खात्री आहे. चिराग आणि सात्विक यांना आव्हानात्मक ड्रॉ मिळाला आहे, परंतु त्यांच्यातही पदक जिंकण्याची क्षमता आहे. साई प्रणिथसमोर खडतर आव्हान आहे, परंतु त्यानं जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत चांगली कामगिरी करून दाखवली आमि त्याची पुनरावृत्ती त्याच्याकडून होईल, अशी आशा आहे,''असे गोपिचंद म्हणाले,  

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021BadmintonBadmintonPV Sindhuपी. व्ही. सिंधू