शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

आज भारत विरुद्ध चीन लढत, चायनीज बॉक्सर मैमतअलीशी लढण्यास विजेंदर सिंग सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 01:06 IST

खेळ सर्वांना एकत्रित आणतो आणि तेच काम मी करणार आहे. सध्या भारत आणि चीन यांच्यामध्ये बॉर्डरवर गंभीर वातावरण आहे. परंतु, हा खेळ आहे.

मुंबई : खेळ सर्वांना एकत्रित आणतो आणि तेच काम मी करणार आहे. सध्या भारत आणि चीन यांच्यामध्ये बॉर्डरवर गंभीर वातावरण आहे. परंतु, हा खेळ आहे. जुल्फिकरविरुद्धची लढत भारत विरुध्द चीन अशीच आहे. मी देशासाठी लढणार असून रिंगमध्ये नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास भारताचा स्टार व्यावसायिक बॉक्सर विजेंदर सिंगने व्यक्त केला.व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये पदार्पण केल्यापासून सलग आठ लढती जिंकलेला भारताच्या स्टार बॉक्सर विजेंदर सिंग रविवारी सलग नववी लढत जिंकण्याच्या निर्धाराने मुंबईत रिंगमध्ये उतरेल. यावेळी चीनचा अव्वल बॉक्सर जुल्फिकर मैमतअली याला नमविण्याचे कडवे आव्हान विजेंदरपुढे असेल. विशेष म्हणजे दोन्ही बॉक्सर या लढतीमध्ये आपले वैयक्तिक विजेतेपद पणाला लावणार असल्याने या लढतीची उत्सुकता वाढली आहे. या लढतीआधी दोन्ही खेळाडूंचे वजन तपासण्यात आले. यावेळी विजेंदरने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.मुंबईतील वरळी येथील एनएससीआय स्टेडियममध्ये रंगणाºया या लढतीमध्ये भारताचा माजी आॅलिम्पिक कांस्य पदक विजेता विजेंदर आपले डब्ल्यूबीओ एशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट जेतेपद स्वत:कडे ठेवण्यासह जुल्फिकरचे डब्ल्यूबीओ ओरिएंटल सुपर मिडलवेट जेतेपदही मिळवण्यासाठी उत्सुक आहे.विजेंदरने यावेळी म्हटले की, ‘रविवारच्या लढतीसाठी मी पुर्णपणे सज्ज असून मला विजयाचा विश्वास आहे. हा भारत विरुद्ध चीन असा सामना आहे आणि याविषयी अधिक काही बोलण्याची मला गरज नाही. मी खूप उत्साहित असून संपुर्ण देश माझ्या पाठिशी आहे. ही लढत नक्कीच शानदार होईल आणि यामध्ये भारत विजयी होईल. शुक्रवारी माझे वजन ७८ किलो होते. लढतीसाठी वजन ७६.२ किलो असणे आवश्यक होते. त्यामुळे मी काहीच खाल्ले नाही. शनिवारी वजन तपासले तेव्हा ७६ किलो होते. त्यामुळे आता मी भरपूर खाणार आहे.’आपल्या योजनांविषयी विजेंदर म्हणाला की, ‘प्रतिस्पर्धी बॉक्सरच्या खेळानुसार मी माझ्या योजना ठरवेल. मी त्याच्यानुसार खेळ करेल. या लढतीसाठी मी माझ्या तंत्रामध्ये अनेक बदल केले आहेत.’ दरम्यान रविवारी मुंबईत एकूण सात लढती होणार असून यावेळी आॅलिम्पियन अखिल कुमार आणि जितेंदर कुमार व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये पदार्पण करतील.......................................मी महाराष्ट्रात याआधी लढलोय, पण मुंबईत पहिल्यांदाच लढणार आहे. आॅलिम्पिक पदक मिलवल्यानंतर पहिल्यांदा मुंबईत आलो होतो. मुंबईकर क्रीडाप्रेमी आहेत. ते खेळावर प्रेम करतात. तिकिट खरेदीवर मुंबईकर खर्च करतात. त्यांचा पाठिंबा माझ्यासाठी खूप मोलाचा ठरणार आहे.- विजेंदर सिंग............................