शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

‘त्या’ तिघींची प्रकृती स्थिर

By admin | Updated: May 9, 2015 00:43 IST

केरळमधील अलपुझा येथे असणाऱ्या स्पोर्ट्स अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया (साई) अर्थात भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या केंद्रामध्ये वरिष्ठांच्या छळाला कंटाळून

नवी दिल्ली : केरळमधील अलपुझा येथे असणाऱ्या स्पोर्ट्स अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया (साई) अर्थात भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या केंद्रामध्ये वरिष्ठांच्या छळाला कंटाळून सामूहिक आत्महत्येच्या प्रयत्नातून वाचलेल्या तिघी महिला अ‍ॅथलिटची प्रकृती गंभीर असली, तरी स्थिर आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मेडिकल बोर्डची स्थापना केली आहे. केंद्रीय क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी दिल्ली येथे एका पत्रकार परिषदेत सांगितले की, आत्महत्येच्या प्रयत्नातून वाचलेल्या तिघींचा जीव वाचविणे हे आमचे प्राथमिक लक्ष्य आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मेडिकल बोर्ड स्थापन करण्यात आले आहे. केरळमधील अलपुझा येथे असणाऱ्या स्पोर्ट्स अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया (साई) अर्थात भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या केंद्रामध्ये वॉटर स्पोर्ट्सचे प्रशिक्षण घेत असलेल्या चार मुलींनी विष प्राशन केले होते. यातील १५ वर्षीय अपर्णा या मुलीचा मृत्यू झाला, तर इतर तिघींवर अलपुझा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. या चौघींनी ‘ओथालांगा’ हे विषारी फळ खाल्ले होते. अलपुझा मेडिकल कॉलेज रुग्णालयाचे अधिष्ठाता संतोष राघवन यांनी सांगितले की, तिघींची प्रकृती गंभीर असली, तरी स्थिर आहे. त्यांनी खाल्लेल्या ‘ओथालांगा’ या विषारी फळावर कोणतेही विषनाशक नाही, त्यामुळे उपचारांवर मर्यादा येत आहेत. तरीही आम्ही शर्तीचे प्रयत्न करीत आहोत. दरम्यान, केरळचे गृहमंत्री रमेश चेन्निथला यांनी शुक्रवारी रुग्णालयाला भेट देऊन त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली. या वेळी त्यांनी या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची ग्वाही दिली. (वृत्तसंस्था)