शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

दुसऱ्या कसोटीसाठी खेळपट्टीवर हिरवळ नसेल : क्युरेटर

By admin | Updated: November 15, 2016 01:20 IST

राजकोट कसोटी सामना अनिर्णीत संपल्यानंतर आता सर्वांची नजर विशाखपट्टणम येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या खेळपट्टीवर केंद्रित झाली आहे.

विशाखापट्टणम : राजकोट कसोटी सामना अनिर्णीत संपल्यानंतर आता सर्वांची नजर विशाखपट्टणम येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या खेळपट्टीवर केंद्रित झाली आहे. इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी असलेल्या खेळपट्टीवर अधिक हिरवळ राहणार नसल्याचे बीसीसीआयचे क्युरेटर कस्तुरी श्रीराम यांनी स्पष्ट केले. दुसऱ्या दिवसापासून येथे चेंडू वळतील, असेही त्यांनी सांगितले.पहिल्या कसोटी सामन्यात खेळपट्टी फिरकीला अनुकूल न ठरल्यामुळे भारताचा अव्वल फिरकीपटू रविचंद्रन आश्विनला छाप पाडता आली नाही. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात यजमान संघाला अनुकूल खेळपट्टी तयार करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्याचा आश्विनला लाभ मिळेल.राजकोटप्रमाणे येथेही प्रथमच कसोटी सामन्याचे आयोजन होत आहे. याच मैदानावर भारताने न्यूझीलंडला पाचव्या व अखेरच्या लढतीत ७९ धावांत गुंडाळून ५ सामन्यांच्या मालिकेत ३-२ ने विजय मिळविला होता. एसीएचे सचिव व बीसीसीआयचे उपाध्यक्ष गोकाराजू गंगराजू यांनी सावध प्रतिक्रिया देताना सांगितले, ‘‘आम्ही स्पोर्टिंग खेळपट्टी तयार केली आहे. यात उभय संघांना समान संधी असेल. आम्हाला निकालाची अपेक्षा आहे.’’ येथील खेळपट्टी वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत होती. राजस्थानने रणजी ट्रॉफी लढतीत दुसऱ्या डावात आसामचा ६९ धावांत धुव्वा उडवला होता. ही लढत तीन दिवसांमध्ये संपली होती.गंगराजू म्हणाले, ‘‘कसोटी खेळपट्टीची तुलना रणजी सामन्याच्या खेळपट्टीशी करायला नको. आसामविरुद्धच्या लढतीतील खेळपट्टी वेगळी होती आणि संवाद नसल्यामुळे हे घडले होते.’’न्यूझीलंडविरुद्धच्या वन-डे लढतीबाबत ते म्हणाले, ‘‘भारत-न्यूझीलंड लढतीदरम्यान खेळपट्टीमध्ये थोडा ओलावा होता; पण फलंदाजाच चुकीच्या पद्धतीने बाद झाले.’’फिरकीला अनुकूल खेळपट्टी राहणार असल्याचे संकेत मिळत असल्यामुळे नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरेल. कारण राजकोटमध्ये पाहुण्या संघाच्या फिरकीपटूंनी वर्चस्व गाजवून आपला निर्धार स्पष्ट केला आहे. मोईन अली, आदिल राशीद व जफर अन्सारी या इंग्लंडच्या फिरकी त्रिकुटाने १३ बळी घेतले होते. (वृत्तसंस्था)