शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

...तर भारत पोडियमवर दिसेल- जावेद शेख

By admin | Updated: July 29, 2016 01:27 IST

भारतीय संघाची सध्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये असून आॅलिम्पिकमध्ये सहज उपांत्य फेरी गाठेल. आॅस्ट्रेलियाविरुद्ध वर्चस्व गाजवल्यास भारतीय संघ पोडियमवर आपले स्थान निश्चित

- महेश चेमटे,  मुंबई

भारतीय संघाची सध्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये असून आॅलिम्पिकमध्ये सहज उपांत्य फेरी गाठेल. आॅस्ट्रेलियाविरुद्ध वर्चस्व गाजवल्यास भारतीय संघ पोडियमवर आपले स्थान निश्चित पक्के करेल, असा विश्वास रिओ आॅलिम्पिकसाठी निवड झालेले एकमेव भारतीय पंच जावेद शेख यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला. विशेष म्हणजे मुंबईकर असलेले जावेद यांच्याव्यतिरीक्त चीनचे चँन डि कँग यांचीही आॅलिम्पिकसाठी निवड झाली असून आशिया खंडातून हे दोघेच रिओमध्ये पंच म्हणून दाखल होणार आहेत.भारतीय हॉकी संघाविषयी जावेद म्हणाले, ‘‘एकेकाळी भारताचा हॉकीमध्ये दबदबा होता. मात्र युरोपियन देशांना हॉकीत सहज प्रवेश मिळावा यासाठी हॉकी अ‍ॅस्ट्रोटर्फवर खेळविण्यात आली. माती - गवत अशा मैदानावर खेळणे आणि टर्फवर खेळणे यात फरक असतो. त्याचा फटका भारताला बसल्याने आपल्या वर्चस्वालाउतरती कळा लागली. मात्र विद्यमान टीम इंडिया परिपूर्ण संघ असून प्रत्यक्ष सामन्यात सर्वोत्कृष्ट खेळ केल्यास भारत नक्कीच सुवर्णपदकाला गवसणी घालेल.’’४० वर्षीय जावेद शेख यांनी राष्ट्रकुल, विश्वचषक स्पर्धेत अचूक निर्णयाच्या जोरावर मैदाने गाजवली आहेत. हॉकीच्या बॅडपॅच बाबत सांगताना शेख म्हणाले, ‘‘म्युनिक आॅलिंपिकमध्ये हॉकी ग्रासवर न करता अ‍ॅस्ट्रोटर्फवर खेळविण्यात आली. भारतीयांना याची सवय नसल्याने मोठा फटका बसला. त्यामुळे भारतीय हॉकी ला उतरती कळा लागली. याला मॉस्कोतील सुवर्णपदक विजेता संघ केवळ अपवाद आहे. पण आता काळ बदलला असून पुन्हा एकदा आपण वर्चस्व मिळवू शकतो.’’ ‘‘भारतीयांसाठी ‘बचाव’ नेहमीच दुखरी बाजू ठरली आहे. मात्र सध्या हीच बाजू टीम इंडियाचे बलस्थान आहे. शिवाय फॉरवर्ड लाईन, आक्रमण यामध्येही संघ सरस आहे. त्यामुळेच, बऱ्याच कालावधीनंतर एक परिपूर्ण संघ रिओत खेळेल. त्यामुळेच या संघाकडून पदकाची अपेक्षा करणे गैर ठरणार नाही,’’ असेही शेख यांनी सांगितले. मुंबई पोर्टचा ‘ट्रस्ट’ सार्थ ठरवणारहॉकीमध्ये खेळाडूंपेक्षा पंच अधिक तंदुरुस्त असावा लागतो. त्यामुळे साहजिकंच खर्च वाढतो. मदत मिळवण्यासाठी माझ्या सरावाचा आणि प्रवासाचा संपूर्ण तपशील सरकारकडे सादर केला होता. मात्र आमच्याकडे केवळ खेळाडूंना रक्कम देण्याची तरतूद असल्याचे सांगून अर्ज फेटाळण्यात आला. त्यांनतर मी मुंबई पोर्ट ट्रस्टकडे अर्ज सादर केला आणि त्यांनी तातडीने दखल करत मला मदत केली. म्हणूनच मी आज रिओसाठी जावू शकल, असे जावेद यांनी ‘लोकमत’ला सांगितले.आतापर्यंत आॅलिंपिकला गेलेले भारतीय पंचरघु प्रसाद, बंगळूरु (लंडन आॅलिंपिक २०१२)सतिंदर शर्मा, पंजाब (सिडनी आॅलिंपिक २०००, अ‍ॅथेन्स आॅलिंपिक २००४, बीजिंग आॅलिंपिक २००८)सरदार सिंग आणि श्रीजेश हे दोघेही उत्तम असुन दोघांमध्येही संघहित जोपासण्याचा गुण आहे. मुळात हॉकीमध्ये कर्णधार हा नाममात्र असतो. शिवाय गेली तीन-चार वर्षांच्या तुलनेत सध्याचा भारतीय संघ एकत्र खेळत आहे. त्यामुळे संघात योग्य ताळमेळ आहे. त्यामुळे कर्णधार बदलल्याचा विशेष फरक पडणार नाही.- जावेद शेख