शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

...तर भारत पोडियमवर दिसेल- जावेद शेख

By admin | Updated: July 29, 2016 01:27 IST

भारतीय संघाची सध्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये असून आॅलिम्पिकमध्ये सहज उपांत्य फेरी गाठेल. आॅस्ट्रेलियाविरुद्ध वर्चस्व गाजवल्यास भारतीय संघ पोडियमवर आपले स्थान निश्चित

- महेश चेमटे,  मुंबई

भारतीय संघाची सध्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये असून आॅलिम्पिकमध्ये सहज उपांत्य फेरी गाठेल. आॅस्ट्रेलियाविरुद्ध वर्चस्व गाजवल्यास भारतीय संघ पोडियमवर आपले स्थान निश्चित पक्के करेल, असा विश्वास रिओ आॅलिम्पिकसाठी निवड झालेले एकमेव भारतीय पंच जावेद शेख यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला. विशेष म्हणजे मुंबईकर असलेले जावेद यांच्याव्यतिरीक्त चीनचे चँन डि कँग यांचीही आॅलिम्पिकसाठी निवड झाली असून आशिया खंडातून हे दोघेच रिओमध्ये पंच म्हणून दाखल होणार आहेत.भारतीय हॉकी संघाविषयी जावेद म्हणाले, ‘‘एकेकाळी भारताचा हॉकीमध्ये दबदबा होता. मात्र युरोपियन देशांना हॉकीत सहज प्रवेश मिळावा यासाठी हॉकी अ‍ॅस्ट्रोटर्फवर खेळविण्यात आली. माती - गवत अशा मैदानावर खेळणे आणि टर्फवर खेळणे यात फरक असतो. त्याचा फटका भारताला बसल्याने आपल्या वर्चस्वालाउतरती कळा लागली. मात्र विद्यमान टीम इंडिया परिपूर्ण संघ असून प्रत्यक्ष सामन्यात सर्वोत्कृष्ट खेळ केल्यास भारत नक्कीच सुवर्णपदकाला गवसणी घालेल.’’४० वर्षीय जावेद शेख यांनी राष्ट्रकुल, विश्वचषक स्पर्धेत अचूक निर्णयाच्या जोरावर मैदाने गाजवली आहेत. हॉकीच्या बॅडपॅच बाबत सांगताना शेख म्हणाले, ‘‘म्युनिक आॅलिंपिकमध्ये हॉकी ग्रासवर न करता अ‍ॅस्ट्रोटर्फवर खेळविण्यात आली. भारतीयांना याची सवय नसल्याने मोठा फटका बसला. त्यामुळे भारतीय हॉकी ला उतरती कळा लागली. याला मॉस्कोतील सुवर्णपदक विजेता संघ केवळ अपवाद आहे. पण आता काळ बदलला असून पुन्हा एकदा आपण वर्चस्व मिळवू शकतो.’’ ‘‘भारतीयांसाठी ‘बचाव’ नेहमीच दुखरी बाजू ठरली आहे. मात्र सध्या हीच बाजू टीम इंडियाचे बलस्थान आहे. शिवाय फॉरवर्ड लाईन, आक्रमण यामध्येही संघ सरस आहे. त्यामुळेच, बऱ्याच कालावधीनंतर एक परिपूर्ण संघ रिओत खेळेल. त्यामुळेच या संघाकडून पदकाची अपेक्षा करणे गैर ठरणार नाही,’’ असेही शेख यांनी सांगितले. मुंबई पोर्टचा ‘ट्रस्ट’ सार्थ ठरवणारहॉकीमध्ये खेळाडूंपेक्षा पंच अधिक तंदुरुस्त असावा लागतो. त्यामुळे साहजिकंच खर्च वाढतो. मदत मिळवण्यासाठी माझ्या सरावाचा आणि प्रवासाचा संपूर्ण तपशील सरकारकडे सादर केला होता. मात्र आमच्याकडे केवळ खेळाडूंना रक्कम देण्याची तरतूद असल्याचे सांगून अर्ज फेटाळण्यात आला. त्यांनतर मी मुंबई पोर्ट ट्रस्टकडे अर्ज सादर केला आणि त्यांनी तातडीने दखल करत मला मदत केली. म्हणूनच मी आज रिओसाठी जावू शकल, असे जावेद यांनी ‘लोकमत’ला सांगितले.आतापर्यंत आॅलिंपिकला गेलेले भारतीय पंचरघु प्रसाद, बंगळूरु (लंडन आॅलिंपिक २०१२)सतिंदर शर्मा, पंजाब (सिडनी आॅलिंपिक २०००, अ‍ॅथेन्स आॅलिंपिक २००४, बीजिंग आॅलिंपिक २००८)सरदार सिंग आणि श्रीजेश हे दोघेही उत्तम असुन दोघांमध्येही संघहित जोपासण्याचा गुण आहे. मुळात हॉकीमध्ये कर्णधार हा नाममात्र असतो. शिवाय गेली तीन-चार वर्षांच्या तुलनेत सध्याचा भारतीय संघ एकत्र खेळत आहे. त्यामुळे संघात योग्य ताळमेळ आहे. त्यामुळे कर्णधार बदलल्याचा विशेष फरक पडणार नाही.- जावेद शेख