शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

तेजस्विनीने मिळवून दिला भारताला ऑलिम्पिक कोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 03:19 IST

२००८, २०१२ आणि २०१६ च्या ऑलिम्पिक संघात स्थान मिळविण्यापासून वंचित राहिलेल्या या कोल्हापूरच्या कन्येने शनिवारी स्वप्नपूर्ती करीत देशाला ऑलिम्पिकचा १२ वा कोटा मिळवून दिला.

दोहा : अनुभवी नेमबाज तेजस्वनी सावंत हिने अखेर ऑलिम्पिकचा दरवाजा ठोठावलाच. २००८, २०१२ आणि २०१६ च्या ऑलिम्पिक संघात स्थान मिळविण्यापासून वंचित राहिलेल्या या कोल्हापूरच्या कन्येने शनिवारी स्वप्नपूर्ती करीत देशाला ऑलिम्पिकचा १२ वा कोटा मिळवून दिला. येथे सुरू असलेल्या १४ व्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात मात्र ती पदाकापासून वंचित राहिली.माजी विश्वविजेत्या तेजस्विनीने ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात अंतिम फेरी गाठून पुढील वर्षीच्या टोकियो आॅलिम्पिकची पात्रता मिळविली. आठ फायनलिस्टपैकी पाच नेमबाजांनी आधीच पात्रता गाठली असून, उपलब्ध असलेल्या तीनपैकी एका जागेवर भारतीय खेळाडूने नाव कोरले. ३९ वर्षांच्या तेजस्विनीने पात्रता फेरीत ११७१ गुणांसह पाचवे स्थान मिळवून अंतिम फेरीत धडक दिली. अंतिम फेरीत मात्र ४३५.८ गुणांसह तिला चौथ्या स्थानावर समाधानी राहावे लागले.अंतिम फेरीच्या दुसऱ्या टप्प्यात ती तिसºया स्थानी होती; पण ८.८ गुणांचा नेम साधताच ती पिछाडीवर पडली. पुढील वर्षी टोकियो आॅलिम्पिकसाठी संघात निवड झाल्यास तेजस्विनीचे हे पहिलेच आॅलिम्पिक असणार आहे. २०१० साली म्युनिच येथे ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात विश्वविक्रमाशी बरोबरी साधून तेजस्विनी जागतिक चॅम्पियन बनली. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी देशाची ती पहिली नेमबाज ठरली होती.>सातत्याने प्रयत्न करणाºया तेजूला यंदा टोकियोमध्ये अचूक सुवर्ण वेध घेता येईल. त्यादृष्टीने ती कसून सराव करीत आहे. तिचे आॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविण्याचे स्वप्न आहे. तिची वाटचालही त्याकडेच सुरू आहे.- सुनीता सावंत, तेजस्विनीची आई