शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

संघव्यवस्थापनाने मानसिकता बदलावी

By admin | Updated: January 13, 2015 02:34 IST

विदेशातील दौ-यात अंतिम एकादशमध्ये गोलंदाजांची निवड करताना बीसीसीआयच्या संघव्यवस्थापनाने स्वत:च्या मानसिकतेत बदल करण्याची गरज असल्याचे भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे याने म्हटले आहे.

नवी दिल्ली : विदेशातील दौ-यात अंतिम एकादशमध्ये गोलंदाजांची निवड करताना बीसीसीआयच्या संघव्यवस्थापनाने स्वत:च्या मानसिकतेत बदल करण्याची गरज असल्याचे भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे याने म्हटले आहे.आॅस्ट्रेलियाविरुद्ध संपलेल्या ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय गोलंदाजांची कामगिरी ढिसाळ झाली; त्यामुळे संघावर टीका झाली होती. ही टीका ग्राह्य असल्याचे सांगून कुंबळे म्हणाला, ‘‘आमच्याकडे अनेक चांगले गोलंदाज आहेत. त्यांपैकी कसोटी सामन्यात कोण सामंजस्य राखून मारा करू शकतो, हे समजण्याची गरज आहे. २० गडी बाद करू शकतील, अशा ४ सर्वश्रेष्ठ गोलंदाजांची निवड करावी. विदेशात अंतिम एकादशची निवड करताना लवचिकता आवश्यक आहे. प्रत्येक वेळी ३ वेगवान आणि १ फिरकी गोलंदाज यशस्वी होतीलच असे नाही.’’ देशासाठी कसोटी आणि वन डेत सर्वाधिक बळी घेणारा कुंबळे पुढे म्हणाला, ‘‘विमानात बसतानाच आम्ही मनात निर्धार करतो, की ३ वेगवान आणि एका फिरकीपटूची अंतिम संघात निवड करणार! ही मानसिकता योग्य नव्हे. दोन वेगवान आणि दोन फिरकीपटू २० बळी घेण्यास सक्षम असतील, तर तो फार्म्युला अमलात आणण्यास काय हरकत आहे?’’अ‍ॅडिलेड कसोटीचे उदाहरण देऊन कुंबळेने सांगितले, की सुरुवातीला येथे फलंदाजांना मदत मिळत होती, तर सामना पुढे गेल्यानंतर फिरकी गोलंदाज प्रभावी ठरले. भारतीय संघात त्या वेळी कर्ण शर्मा हाच एकमेव फिरकीपटू होता. आॅस्ट्रेलियाचा आॅफस्पिनर नाथन लियॉन याने मालिकेत सर्वाधिक २३ बळी घेतले आहेत. वन डे क्रिकेट अधिक खेळल्यामुळे भारतीय गोलंदाज कसोटीत बळी घेण्यात अपयशी ठरत असल्याचे कुंबळेचे मत आहे. फलंदाज आपले शॉट खेळेल, असा अंदाज बांधून गोलंदाजी करणे घातक असते. वन-डे क्रिकेटमुळे ही धारणा निर्माण होते. कसोटी क्रिकेटमध्ये अनुभव लागतो. सातत्याने खेळल्यानंतरच अनुभवात भर पडते. कसोटीत दबाव बनविणे गरजेचे असते. जितका वेळ दबाव वाढवाल, तितकीच विकेट मिळण्याची अधिक शक्यता असेल, असे कुंबळेने स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)> गोलंदाजीत सुधारणा आवश्यक : द्रविडभारतीय संघाची सध्या गोलंदाजांची बाजू कमकुवत आहे. जर आपली गोलंदाजी सातत्याने कमकुवत होत असेल आणि आपल्याकडे जागतिकस्तरावरील वेगवान आणि फिरकी गोलंदाज नसतील तर आपण गोलंदाजी मानांकनात नक्कीच खालच्या क्रमांकावर जाऊ. गोलंदाजीत सुधारणा करणे आवश्यक आहे. परदेशात आपण कसोटी सामने जिंकणे महत्त्वाचे आहे. आपल्या देशात आपण चांगली कामगिरी करतो, फलंदाजांची चांगली फौज आहे. काही फिरकी गोलंदाजसुद्धा चांगले आहेत, की जे परदेशात चांगली गोलंदाजी करू शकतील. मी मानांकनाला जास्त महत्त्व देत नाही. ते मानांकन पाचवे असो किंवा सहावे असो त्यात काही फरक पडत नाही. अधिक काळ जर आपण परदेशात खेळलो नाही तर आपल्या मानांकनात नक्कीच फरक पडणार आहे. विराटची ही सुरूवात आहे. त्याने दाखवून दिले आहे की तो कर्णधारपद सांभाळू शकतो. त्याने या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी केली हे सुद्धा महत्त्वाचे आहे, असे राहुल द्रविड शेवटी म्हणाला.