शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

संघव्यवस्थापनाने मानसिकता बदलावी

By admin | Updated: January 13, 2015 02:34 IST

विदेशातील दौ-यात अंतिम एकादशमध्ये गोलंदाजांची निवड करताना बीसीसीआयच्या संघव्यवस्थापनाने स्वत:च्या मानसिकतेत बदल करण्याची गरज असल्याचे भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे याने म्हटले आहे.

नवी दिल्ली : विदेशातील दौ-यात अंतिम एकादशमध्ये गोलंदाजांची निवड करताना बीसीसीआयच्या संघव्यवस्थापनाने स्वत:च्या मानसिकतेत बदल करण्याची गरज असल्याचे भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे याने म्हटले आहे.आॅस्ट्रेलियाविरुद्ध संपलेल्या ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय गोलंदाजांची कामगिरी ढिसाळ झाली; त्यामुळे संघावर टीका झाली होती. ही टीका ग्राह्य असल्याचे सांगून कुंबळे म्हणाला, ‘‘आमच्याकडे अनेक चांगले गोलंदाज आहेत. त्यांपैकी कसोटी सामन्यात कोण सामंजस्य राखून मारा करू शकतो, हे समजण्याची गरज आहे. २० गडी बाद करू शकतील, अशा ४ सर्वश्रेष्ठ गोलंदाजांची निवड करावी. विदेशात अंतिम एकादशची निवड करताना लवचिकता आवश्यक आहे. प्रत्येक वेळी ३ वेगवान आणि १ फिरकी गोलंदाज यशस्वी होतीलच असे नाही.’’ देशासाठी कसोटी आणि वन डेत सर्वाधिक बळी घेणारा कुंबळे पुढे म्हणाला, ‘‘विमानात बसतानाच आम्ही मनात निर्धार करतो, की ३ वेगवान आणि एका फिरकीपटूची अंतिम संघात निवड करणार! ही मानसिकता योग्य नव्हे. दोन वेगवान आणि दोन फिरकीपटू २० बळी घेण्यास सक्षम असतील, तर तो फार्म्युला अमलात आणण्यास काय हरकत आहे?’’अ‍ॅडिलेड कसोटीचे उदाहरण देऊन कुंबळेने सांगितले, की सुरुवातीला येथे फलंदाजांना मदत मिळत होती, तर सामना पुढे गेल्यानंतर फिरकी गोलंदाज प्रभावी ठरले. भारतीय संघात त्या वेळी कर्ण शर्मा हाच एकमेव फिरकीपटू होता. आॅस्ट्रेलियाचा आॅफस्पिनर नाथन लियॉन याने मालिकेत सर्वाधिक २३ बळी घेतले आहेत. वन डे क्रिकेट अधिक खेळल्यामुळे भारतीय गोलंदाज कसोटीत बळी घेण्यात अपयशी ठरत असल्याचे कुंबळेचे मत आहे. फलंदाज आपले शॉट खेळेल, असा अंदाज बांधून गोलंदाजी करणे घातक असते. वन-डे क्रिकेटमुळे ही धारणा निर्माण होते. कसोटी क्रिकेटमध्ये अनुभव लागतो. सातत्याने खेळल्यानंतरच अनुभवात भर पडते. कसोटीत दबाव बनविणे गरजेचे असते. जितका वेळ दबाव वाढवाल, तितकीच विकेट मिळण्याची अधिक शक्यता असेल, असे कुंबळेने स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)> गोलंदाजीत सुधारणा आवश्यक : द्रविडभारतीय संघाची सध्या गोलंदाजांची बाजू कमकुवत आहे. जर आपली गोलंदाजी सातत्याने कमकुवत होत असेल आणि आपल्याकडे जागतिकस्तरावरील वेगवान आणि फिरकी गोलंदाज नसतील तर आपण गोलंदाजी मानांकनात नक्कीच खालच्या क्रमांकावर जाऊ. गोलंदाजीत सुधारणा करणे आवश्यक आहे. परदेशात आपण कसोटी सामने जिंकणे महत्त्वाचे आहे. आपल्या देशात आपण चांगली कामगिरी करतो, फलंदाजांची चांगली फौज आहे. काही फिरकी गोलंदाजसुद्धा चांगले आहेत, की जे परदेशात चांगली गोलंदाजी करू शकतील. मी मानांकनाला जास्त महत्त्व देत नाही. ते मानांकन पाचवे असो किंवा सहावे असो त्यात काही फरक पडत नाही. अधिक काळ जर आपण परदेशात खेळलो नाही तर आपल्या मानांकनात नक्कीच फरक पडणार आहे. विराटची ही सुरूवात आहे. त्याने दाखवून दिले आहे की तो कर्णधारपद सांभाळू शकतो. त्याने या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी केली हे सुद्धा महत्त्वाचे आहे, असे राहुल द्रविड शेवटी म्हणाला.