शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
4
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
5
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
6
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
7
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
8
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
9
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
10
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
11
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
12
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
13
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
15
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
16
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
17
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
18
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
19
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
20
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

संघव्यवस्थापनाने मानसिकता बदलावी

By admin | Updated: January 13, 2015 02:34 IST

विदेशातील दौ-यात अंतिम एकादशमध्ये गोलंदाजांची निवड करताना बीसीसीआयच्या संघव्यवस्थापनाने स्वत:च्या मानसिकतेत बदल करण्याची गरज असल्याचे भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे याने म्हटले आहे.

नवी दिल्ली : विदेशातील दौ-यात अंतिम एकादशमध्ये गोलंदाजांची निवड करताना बीसीसीआयच्या संघव्यवस्थापनाने स्वत:च्या मानसिकतेत बदल करण्याची गरज असल्याचे भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे याने म्हटले आहे.आॅस्ट्रेलियाविरुद्ध संपलेल्या ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय गोलंदाजांची कामगिरी ढिसाळ झाली; त्यामुळे संघावर टीका झाली होती. ही टीका ग्राह्य असल्याचे सांगून कुंबळे म्हणाला, ‘‘आमच्याकडे अनेक चांगले गोलंदाज आहेत. त्यांपैकी कसोटी सामन्यात कोण सामंजस्य राखून मारा करू शकतो, हे समजण्याची गरज आहे. २० गडी बाद करू शकतील, अशा ४ सर्वश्रेष्ठ गोलंदाजांची निवड करावी. विदेशात अंतिम एकादशची निवड करताना लवचिकता आवश्यक आहे. प्रत्येक वेळी ३ वेगवान आणि १ फिरकी गोलंदाज यशस्वी होतीलच असे नाही.’’ देशासाठी कसोटी आणि वन डेत सर्वाधिक बळी घेणारा कुंबळे पुढे म्हणाला, ‘‘विमानात बसतानाच आम्ही मनात निर्धार करतो, की ३ वेगवान आणि एका फिरकीपटूची अंतिम संघात निवड करणार! ही मानसिकता योग्य नव्हे. दोन वेगवान आणि दोन फिरकीपटू २० बळी घेण्यास सक्षम असतील, तर तो फार्म्युला अमलात आणण्यास काय हरकत आहे?’’अ‍ॅडिलेड कसोटीचे उदाहरण देऊन कुंबळेने सांगितले, की सुरुवातीला येथे फलंदाजांना मदत मिळत होती, तर सामना पुढे गेल्यानंतर फिरकी गोलंदाज प्रभावी ठरले. भारतीय संघात त्या वेळी कर्ण शर्मा हाच एकमेव फिरकीपटू होता. आॅस्ट्रेलियाचा आॅफस्पिनर नाथन लियॉन याने मालिकेत सर्वाधिक २३ बळी घेतले आहेत. वन डे क्रिकेट अधिक खेळल्यामुळे भारतीय गोलंदाज कसोटीत बळी घेण्यात अपयशी ठरत असल्याचे कुंबळेचे मत आहे. फलंदाज आपले शॉट खेळेल, असा अंदाज बांधून गोलंदाजी करणे घातक असते. वन-डे क्रिकेटमुळे ही धारणा निर्माण होते. कसोटी क्रिकेटमध्ये अनुभव लागतो. सातत्याने खेळल्यानंतरच अनुभवात भर पडते. कसोटीत दबाव बनविणे गरजेचे असते. जितका वेळ दबाव वाढवाल, तितकीच विकेट मिळण्याची अधिक शक्यता असेल, असे कुंबळेने स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)> गोलंदाजीत सुधारणा आवश्यक : द्रविडभारतीय संघाची सध्या गोलंदाजांची बाजू कमकुवत आहे. जर आपली गोलंदाजी सातत्याने कमकुवत होत असेल आणि आपल्याकडे जागतिकस्तरावरील वेगवान आणि फिरकी गोलंदाज नसतील तर आपण गोलंदाजी मानांकनात नक्कीच खालच्या क्रमांकावर जाऊ. गोलंदाजीत सुधारणा करणे आवश्यक आहे. परदेशात आपण कसोटी सामने जिंकणे महत्त्वाचे आहे. आपल्या देशात आपण चांगली कामगिरी करतो, फलंदाजांची चांगली फौज आहे. काही फिरकी गोलंदाजसुद्धा चांगले आहेत, की जे परदेशात चांगली गोलंदाजी करू शकतील. मी मानांकनाला जास्त महत्त्व देत नाही. ते मानांकन पाचवे असो किंवा सहावे असो त्यात काही फरक पडत नाही. अधिक काळ जर आपण परदेशात खेळलो नाही तर आपल्या मानांकनात नक्कीच फरक पडणार आहे. विराटची ही सुरूवात आहे. त्याने दाखवून दिले आहे की तो कर्णधारपद सांभाळू शकतो. त्याने या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी केली हे सुद्धा महत्त्वाचे आहे, असे राहुल द्रविड शेवटी म्हणाला.